शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

४२ मंडळात अतिवृष्टीने नुकसान, विमा कंपनीला १२ हजार ‘इंटिमेशन’

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 8, 2023 17:18 IST

कंपनीस्तरावर अद्याप पंचनामे नाहीत

अमरावती : जुलै महिन्यात तब्बल ४२ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या बाधित पिकांचे पंचनामे करण्यात यावे व परतावा मिळण्यात यावा, यासाठी तब्बल ११७४० शेतकऱ्यांनी विहित मुदतीत म्हणजे नुकसानीचे ७२ तासांचे आत पीक विमा कंपनीकडे पूर्वसूचना अर्ज (इंटिमेशन) दाखल केले आहेत. अद्याप कंपनी स्तरावरून पंचनामे करण्यात न आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

यंदाच्या खरीप हंगामात मान्सून दोन आठवडे विलंबाने आला व चार आठवड्यांनी सक्रिय झाला. ६ जुलैपासून पावसाची रिपरिप सुरू झाली व जुलैअखेरपर्यंत तब्बल ४२ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. नदी-नाल्यांना पूर आल्याने लगतची ५०० हेक्टर शेतजमीन खरडली गेली. याशिवाय पूर व सततच्या पावसाने बहुतेक शेतात पाणी साचून पिके पाण्याखाली बुडाली.

या सर्व आपत्तींमुळे किमान ७० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अहवाल आहे. या नैसर्गिक आपत्तीसाठी पीकविम्याची भरपाई देय असल्याने पीकविमा योजनेत सहभाग असलेल्या शेतकऱ्यांनी टोल फ्री नंबर व ॲपवर याच्या पूर्वसूचना पीक विमा कंपनीला दिल्या आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCrop Insuranceपीक विमा