शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

४२ मंडळात अतिवृष्टीने नुकसान, विमा कंपनीला १२ हजार ‘इंटिमेशन’

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 8, 2023 17:18 IST

कंपनीस्तरावर अद्याप पंचनामे नाहीत

अमरावती : जुलै महिन्यात तब्बल ४२ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या बाधित पिकांचे पंचनामे करण्यात यावे व परतावा मिळण्यात यावा, यासाठी तब्बल ११७४० शेतकऱ्यांनी विहित मुदतीत म्हणजे नुकसानीचे ७२ तासांचे आत पीक विमा कंपनीकडे पूर्वसूचना अर्ज (इंटिमेशन) दाखल केले आहेत. अद्याप कंपनी स्तरावरून पंचनामे करण्यात न आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

यंदाच्या खरीप हंगामात मान्सून दोन आठवडे विलंबाने आला व चार आठवड्यांनी सक्रिय झाला. ६ जुलैपासून पावसाची रिपरिप सुरू झाली व जुलैअखेरपर्यंत तब्बल ४२ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. नदी-नाल्यांना पूर आल्याने लगतची ५०० हेक्टर शेतजमीन खरडली गेली. याशिवाय पूर व सततच्या पावसाने बहुतेक शेतात पाणी साचून पिके पाण्याखाली बुडाली.

या सर्व आपत्तींमुळे किमान ७० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अहवाल आहे. या नैसर्गिक आपत्तीसाठी पीकविम्याची भरपाई देय असल्याने पीकविमा योजनेत सहभाग असलेल्या शेतकऱ्यांनी टोल फ्री नंबर व ॲपवर याच्या पूर्वसूचना पीक विमा कंपनीला दिल्या आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCrop Insuranceपीक विमा