शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

स्वातंत्र्यदिनाला सायबर क्राईम लॅब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2016 01:13 IST

सायबर गुन्ह्यांवर अंकूश ठेवण्याच्या उद्देशाने राज्यभरात पोलीस विभागात सायबर क्राईम लॅबची स्थापन करण्यास सुरुवात झाली आहे.

आयजींचे निर्देश : सायबर सेलचे काम सुरु अमरावती : सायबर गुन्ह्यांवर अंकूश ठेवण्याच्या उद्देशाने राज्यभरात पोलीस विभागात सायबर क्राईम लॅबची स्थापन करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार येत्या स्वातंत्र्य दिनापासून ग्रामीण पोलिस अधीक्षक , पोलिस आयुक्तालयात सायबर क्राईम लॅब कार्यान्वित होणार आहे. या लॅबमुळे फेसबूक, व्हॉटसअ‍ॅपसह इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास व गुन्हेगारांचा शोध घेण्यास मोठी मदत मिळणार आहे. आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे नागरिकांना बहूतांश दैनदिन व्यवहार सोयीचे झाले आहे. मात्र, याच माध्यमातून सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही आढळून आले आहे. हॅकिंगच्या माध्यमातून आर्थिक फसवणूकीचे प्रकार सातत्याने उघड होत आहेत. महिनाभराची प्रतीक्षा अमरावती : सोशल मिडीयाच्या माध्यमातून आक्षेपार्ह छायाचित्रे, प्रक्षोभक संदेश अपलोड करून सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न समाजकंटक करीत असतात. राज्यात मुंबईत एकच सायबर लॅब असून तेथे कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे अनेक गुन्ह्यांचे तपास प्रलंबित राहतात. त्यादृष्टीने सायबर क्राईमचा तपास करण्यासाठी राज्यातील प्रत्येक शहरात एक सायबर क्राईम लॅब उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी गेल्या वर्षी केली होती. ८ फेब्रुवारी २०१६ रोजी यासंदर्भातील अध्यादेश निघाला असून सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालये आणि पोलीस आयुक्तालयांमध्ये सायबर क्राईम लॅबची सुरुवात करण्यात येणार आहे. येत्या १५ आॅगस्ट रोजी या लॅबची सुरुवात होणार असल्यामुळे स्वतंत्र कक्ष, अत्याधुनिक साहित्य आणि मनुष्यबळाची जुळवाजुळव करण्याची तयारी सुरु झाली आहे. लॅबसाठी उच्च प्रतिचे हार्डवेअर, सॉफ्टवेअर तसेच अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर केला जाणार आहे.