शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

विमा दाव्याचे २ लाख व्याजासह देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:21 IST

विमा दावा नामंजूर करणाऱ्या नॅशनल इंशुरन्स कंपनी लिमिटेडने विधवा शेतकरी महिलेला २ लाख रुपये दसादशे १० टक्के व्याजासह द्यावे, असे आदेश ग्राहक मंचाने दिले. ग्राहक मंचाच्या या निर्णयामुळे शेतकरी महिलेला मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देविधवा शेतकरी महिलेला दिलासा : नॅशनल इंशुरन्स कंपनीला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विमा दावा नामंजूर करणाऱ्या नॅशनल इंशुरन्स कंपनी लिमिटेडने विधवा शेतकरी महिलेला २ लाख रुपये दसादशे १० टक्के व्याजासह द्यावे, असे आदेश ग्राहक मंचाने दिले. ग्राहक मंचाच्या या निर्णयामुळे शेतकरी महिलेला मोठा दिलासा मिळाला आहे.मोर्शीतील लिलाबाई दिलीप सोनारे (४०) यांच्या पती शेतकरी होते. त्यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत २०१५-१६ करिता नॅशनल इंशुरन्स कंपनी लि. चा दोन लाखांचा शासनाने विमा उतरविला होता. दरम्यान लिलाबाई यांचे पती दिलीप सोनारे यांची २३ आॅगस्ट २०१६ रोजी हत्या झाली. पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी नॅशनल इंशुरन्स कंपनी ली.कडे विमा दावा सादर केला. मात्र, तो दावा 'रिजेक्ट ड्यु टू फॅमिली डिस्पुट मर्डर' या शेºयासह नामंजूर करण्यात आला. त्यामुळे लिलाबाई सोनारे यांनी २८ फेबु्रवारी २०१८ रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ च्या कलम १२ अन्वये तक्रार नोंदविली. त्यामध्ये विरुद्ध पक्षाने विमा दाव्याची रक्कम २ लाख व्याजासह द्यावी, तसेच शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी ३० हजार रुपये व तक्रारीचा खर्च १५ हजार रुपये मिळावा, अशी मागणी तक्रारीतून केली. तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीदरम्यान जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष एस.पी.देशमुख, सदस्या शुंभागी कोंडे व दिप्ती बोबडे यांच्या समक्ष दोन्ही बाजू पडताळणी केली. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर ग्राहक मंचाने १९ मार्च २०१९ रोजी निर्णय दिला. विरुद्ध पक्ष पूणे येथील नॅशनल इंशुरन्स कंपनी लि.तर्फे विभागीय व्यवस्थापकांनी तक्रारकर्त्यास विमा दाव्याची रक्कम २ लाख रुपये तक्रार दाखल झाल्याच्या दिनांकापासून दसादशे १० टक्के व्याजासह द्यावी, शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून २० हजार रुपये द्यावे, तक्रारीचा खर्च ५ हजार रुपये द्यावा, असे आदेशित केले. हा निर्णय सदस्या दिप्ती बोबडे यांनी घोषित केला. तक्रारकर्त्यातर्फे अ‍ॅड. उदय क्षीरसागर व विरुद्ध पक्ष १ व २ कडून अ‍ॅड. नितीन बिजवे यांनी बाजू मांडली. या निर्णयामुळे विधवा शेतकरी महिलेला दिलासा मिळाला आहे.