शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

पहिल्याच दिवशी जीवनावश्यक वस्तूसांठी मार्केटमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:11 IST

अमरावती : तीन आठवड्यांच्या कठोर संचारबंदीनंतर रविवारपासून रोज सकाळी ११ पर्यंत मुभा देण्यात आल्याने जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी ...

अमरावती : तीन आठवड्यांच्या कठोर संचारबंदीनंतर रविवारपासून रोज सकाळी ११ पर्यंत मुभा देण्यात आल्याने जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. प्रशासनाद्वारा प्रमुख चौकांत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना अटकाव करण्यात आला. काही ठिकाणी अशा व्यक्तींच्या कोरोना चाचण्यादेखील करताना दिसून आले.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारपासून जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला व दूध डेअरी आदी दुकानांना सकाळी ७ ते दुपारी ११ या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा दिलेली आहे. तीन आठवड्यांपासून जिल्हा लॉकडाऊन असल्याने रविवारी सकाळी आवश्यक ते सामान घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. याशिवाय मुख्य मार्गाच्या व्यतिरिक्त अंतर्गत भागात मनाई असलेली दुकानेदेखील सुरू होती. काही व्यापार संकुलाच्या आतील भागातील दुकाने सुरू असलेली आढळून आली. महापालिकेचा बाजार व परवाना विभाग तसेच अतिक्रमन विभागाच्या पथकांद्वारा अशा काही दुकांनावर कारवाया करण्यात आल्या.

महापालिका आयुक्त, उपायुक्त याशिवाय पोलीस आयुक्त व उपायुक्त यांनी प्रामुख्याने सर्वाधिक गर्दी असणाऱ्या चित्रा चौक व इतवारा भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला व पथकांना आवश्यक ते निर्देश दिलेत.

बॉक्स

चित्रा चौक, भाजीबाजारात कोरोना चाचणी

नागरिकांची सर्वाधिक गर्दी राहणाऱ्या चित्रा चौक, इतवारा भागात भाजी विक्रेत्यांसह काही नागरिकांच्या महापालिकेच्या आरोग्य पथकाद्वारा रॅपिड अँन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या. याशिवाय महापालिका व पोलीस पथकांद्वारा रस्त्यांवर व दुकांनामध्ये गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेताना आढळले. सकाळी ११ नंतर उघडी असलेल्या दुकांनांच्या संचालकांना तंबी देऊन बंद करण्यास फर्मावण्यात आले.

बॉक्स

रस्त्यावरील हातगाड्यांना पथकाचा मज्जाव

शहरात भाजीविक्रेत्यांना झोननिहाय जागा देण्यात आलेल्या असल्याने रस्त्यावर भाजीपाल्याच्या हातगाड्या लावण्यास महापालिकेच्या पथकाद्वारा मनाई करण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने व अंतर्गत भागात हातगाडी विक्रेता दिसल्यास त्याला संबंधित ठिकाणी पाठविण्यात आले. याशिवाय या विक्रेत्यांनी कोरोना चाचणी करण्याविषयी सांगण्यात आले.

बॉक्स

सकाळी ११ नंतर फिरण्यास नागरिकांना मनाई

सकाळी ११ नंतर संचारबंदी लागू होत असल्याने रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांना हटकण्यात आले. याशिवाय विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणीदेखील करण्यात आली. विहित कालावधीनंतर सुरू असणाऱ्या दुकानांना महापालिकेच्या पथकांसह पोलिसांनीदेखील तंबी देऊन बंद करायला लावल्याचे दिसून आले.