शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पहिल्याच दिवशी जीवनावश्यक वस्तूसांठी मार्केटमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:11 IST

अमरावती : तीन आठवड्यांच्या कठोर संचारबंदीनंतर रविवारपासून रोज सकाळी ११ पर्यंत मुभा देण्यात आल्याने जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी ...

अमरावती : तीन आठवड्यांच्या कठोर संचारबंदीनंतर रविवारपासून रोज सकाळी ११ पर्यंत मुभा देण्यात आल्याने जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. प्रशासनाद्वारा प्रमुख चौकांत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना अटकाव करण्यात आला. काही ठिकाणी अशा व्यक्तींच्या कोरोना चाचण्यादेखील करताना दिसून आले.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारपासून जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला व दूध डेअरी आदी दुकानांना सकाळी ७ ते दुपारी ११ या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा दिलेली आहे. तीन आठवड्यांपासून जिल्हा लॉकडाऊन असल्याने रविवारी सकाळी आवश्यक ते सामान घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. याशिवाय मुख्य मार्गाच्या व्यतिरिक्त अंतर्गत भागात मनाई असलेली दुकानेदेखील सुरू होती. काही व्यापार संकुलाच्या आतील भागातील दुकाने सुरू असलेली आढळून आली. महापालिकेचा बाजार व परवाना विभाग तसेच अतिक्रमन विभागाच्या पथकांद्वारा अशा काही दुकांनावर कारवाया करण्यात आल्या.

महापालिका आयुक्त, उपायुक्त याशिवाय पोलीस आयुक्त व उपायुक्त यांनी प्रामुख्याने सर्वाधिक गर्दी असणाऱ्या चित्रा चौक व इतवारा भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला व पथकांना आवश्यक ते निर्देश दिलेत.

बॉक्स

चित्रा चौक, भाजीबाजारात कोरोना चाचणी

नागरिकांची सर्वाधिक गर्दी राहणाऱ्या चित्रा चौक, इतवारा भागात भाजी विक्रेत्यांसह काही नागरिकांच्या महापालिकेच्या आरोग्य पथकाद्वारा रॅपिड अँन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या. याशिवाय महापालिका व पोलीस पथकांद्वारा रस्त्यांवर व दुकांनामध्ये गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेताना आढळले. सकाळी ११ नंतर उघडी असलेल्या दुकांनांच्या संचालकांना तंबी देऊन बंद करण्यास फर्मावण्यात आले.

बॉक्स

रस्त्यावरील हातगाड्यांना पथकाचा मज्जाव

शहरात भाजीविक्रेत्यांना झोननिहाय जागा देण्यात आलेल्या असल्याने रस्त्यावर भाजीपाल्याच्या हातगाड्या लावण्यास महापालिकेच्या पथकाद्वारा मनाई करण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने व अंतर्गत भागात हातगाडी विक्रेता दिसल्यास त्याला संबंधित ठिकाणी पाठविण्यात आले. याशिवाय या विक्रेत्यांनी कोरोना चाचणी करण्याविषयी सांगण्यात आले.

बॉक्स

सकाळी ११ नंतर फिरण्यास नागरिकांना मनाई

सकाळी ११ नंतर संचारबंदी लागू होत असल्याने रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांना हटकण्यात आले. याशिवाय विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणीदेखील करण्यात आली. विहित कालावधीनंतर सुरू असणाऱ्या दुकानांना महापालिकेच्या पथकांसह पोलिसांनीदेखील तंबी देऊन बंद करायला लावल्याचे दिसून आले.