शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

सामाजिक न्याय विभागात ‘व्हॅलिडिटी’साठी गर्दी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:12 IST

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नियोजन, विद्यार्थी अन्‌ ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारांसाठी टोकन प्रणाली अमरावती : शाळा, महाविद्यालयीन निकाल आणि ग्रामपंचायत निवडणुकीचे ...

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नियोजन, विद्यार्थी अन्‌ ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारांसाठी टोकन प्रणाली

अमरावती : शाळा, महाविद्यालयीन निकाल आणि ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच आता जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे. त्याअनुषंगाने येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जातवैधता प्रमाणपत्र कार्यालयात गर्दी वाढत आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विद्यार्थी अन्‌ उमेदवारांना टोकन दिले जात आहे.

मार्चपासून कोरोना संसर्ग सुरू होताच समाजकल्याणमध्ये विविध कामांचे नियोजन करण्यात येत आहे. अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी ‘व्हॅलिडिटी’ मिळविण्यासाठी येणाऱ्यांना टोकन देऊन कामांचे स्वरुप निश्चित केले जात आहे. कोरोना काळात ‘व्हॅलिडिटी’साठी ऑनलाईन अर्ज सादर करताना गर्दी नव्हती. मात्र, गत दीड महिन्यांपासून येथे गर्दी वाढत आहे. अशातच ग्रामपंचायत निवडणुकीने यात भर घातली आहे. मुख्य प्रवेशद्धाराबाहेरच उमेदवारांना टोकन आणि वेळ दिला जात असल्याने त्याच काळात ‘व्हॅलिडिटी’ मिळविता येते, असे कामांचे नियोजन आखले आहे. कोरोना संसर्ग पसरू नये, यासाठी कटाक्षाने काळजी घेतली जात आहे. मास्कविना प्रवेश नाही, अशी काटेकोरपणे नियमावली लागू करण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थी आणि उमेदवार यांना एकाच रांगेत टोकन घेण्यासाठी उभे करण्यात येत असल्याने काही विद्यार्थ्यांनी या नियोजनावर आक्षेप घेतला आहे. प्रवेशाची तारीख जवळ येत असल्यामुळे विद्यार्थी ‘व्हॅलिडिटी’साठी गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. यात अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमु्क्त जाती आणि भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

-----------------------------

जातवैधता प्रमाणपत्रासाठी टोकन प्रणाली

‘व्हॅलिडिटी’साठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर ऑफलाईन कागदपत्रे प्रत्यक्षात सादर करावी लागत आहे. मात्र, फेब्रुवारी, मार्चमध्ये अर्ज सादर केले अर्जदारांना आता अर्ज करण्याची गरज नाही, ही बाब जातवैधता प्रमाणपत्र विभागाने स्पष्ट केली आहे. सोमवारी ‘व्हॅलिडिटी’साठी ४२६ अर्ज घेण्यात आले आहे. टोकनशिवाय अर्ज स्वीकारले जात नाही, असे नियोजन आहे.

-----------------------

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. त्याकरिताच टोकन प्रणाली लागू केली आहे. रांगेतील उमेदवारांना टोकन देताना त्यांच्या कामाची वेळदेखील निश्चित केली जाते. त्यामुळे नियोजित वेळेनुसार कामांना प्राधान्य दिले जात आहे.

- सुनील वारे, उपायुक्त, जातवैधता प्रमाणपत्र कार्यालय, अमरावती