शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सामाजिक न्याय विभागात ‘व्हॅलिडिटी’साठी गर्दी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:12 IST

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नियोजन, विद्यार्थी अन्‌ ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारांसाठी टोकन प्रणाली अमरावती : शाळा, महाविद्यालयीन निकाल आणि ग्रामपंचायत निवडणुकीचे ...

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नियोजन, विद्यार्थी अन्‌ ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारांसाठी टोकन प्रणाली

अमरावती : शाळा, महाविद्यालयीन निकाल आणि ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच आता जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे. त्याअनुषंगाने येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जातवैधता प्रमाणपत्र कार्यालयात गर्दी वाढत आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विद्यार्थी अन्‌ उमेदवारांना टोकन दिले जात आहे.

मार्चपासून कोरोना संसर्ग सुरू होताच समाजकल्याणमध्ये विविध कामांचे नियोजन करण्यात येत आहे. अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी ‘व्हॅलिडिटी’ मिळविण्यासाठी येणाऱ्यांना टोकन देऊन कामांचे स्वरुप निश्चित केले जात आहे. कोरोना काळात ‘व्हॅलिडिटी’साठी ऑनलाईन अर्ज सादर करताना गर्दी नव्हती. मात्र, गत दीड महिन्यांपासून येथे गर्दी वाढत आहे. अशातच ग्रामपंचायत निवडणुकीने यात भर घातली आहे. मुख्य प्रवेशद्धाराबाहेरच उमेदवारांना टोकन आणि वेळ दिला जात असल्याने त्याच काळात ‘व्हॅलिडिटी’ मिळविता येते, असे कामांचे नियोजन आखले आहे. कोरोना संसर्ग पसरू नये, यासाठी कटाक्षाने काळजी घेतली जात आहे. मास्कविना प्रवेश नाही, अशी काटेकोरपणे नियमावली लागू करण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थी आणि उमेदवार यांना एकाच रांगेत टोकन घेण्यासाठी उभे करण्यात येत असल्याने काही विद्यार्थ्यांनी या नियोजनावर आक्षेप घेतला आहे. प्रवेशाची तारीख जवळ येत असल्यामुळे विद्यार्थी ‘व्हॅलिडिटी’साठी गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. यात अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमु्क्त जाती आणि भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

-----------------------------

जातवैधता प्रमाणपत्रासाठी टोकन प्रणाली

‘व्हॅलिडिटी’साठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर ऑफलाईन कागदपत्रे प्रत्यक्षात सादर करावी लागत आहे. मात्र, फेब्रुवारी, मार्चमध्ये अर्ज सादर केले अर्जदारांना आता अर्ज करण्याची गरज नाही, ही बाब जातवैधता प्रमाणपत्र विभागाने स्पष्ट केली आहे. सोमवारी ‘व्हॅलिडिटी’साठी ४२६ अर्ज घेण्यात आले आहे. टोकनशिवाय अर्ज स्वीकारले जात नाही, असे नियोजन आहे.

-----------------------

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. त्याकरिताच टोकन प्रणाली लागू केली आहे. रांगेतील उमेदवारांना टोकन देताना त्यांच्या कामाची वेळदेखील निश्चित केली जाते. त्यामुळे नियोजित वेळेनुसार कामांना प्राधान्य दिले जात आहे.

- सुनील वारे, उपायुक्त, जातवैधता प्रमाणपत्र कार्यालय, अमरावती