शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शहरांमध्ये गर्दी, खेड्यांमध्ये पोळ्याच्या आयोजनाला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:16 IST

जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश, सापत्न वागणूक का? शेतकऱ्यांचा सवाल अमरावती : मरणपंथाला लागलेल्या कृषी संस्कृतीतील पोळा या सणाला सरकारने यंदाही परवानगी ...

जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश, सापत्न वागणूक का? शेतकऱ्यांचा सवाल

अमरावती : मरणपंथाला लागलेल्या कृषी संस्कृतीतील पोळा या सणाला सरकारने यंदाही परवानगी दिलेली नाही. लागोपाठ दोन वर्षांपासून युवकही या सणाला गावाकडे फिरकले नाहीत. शहरांमध्ये पोळ्याच्या सणाचा बाजार व राजरोस गर्दी पाहता, खेड्यातील आयोजनानेच कोरोनाचा संसर्ग उसळणार का, असा प्रश्न पशुधनाला जिवापाड जपणाऱ्या शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

ग्रामीण भाग शहरांची झपाट्याने जोडला जात असल्याने राज्यात नागरीकरणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे पशुधन कशासाठी बाळगायचे आणि आणि कुणी निगा राखायची, हे प्रश्न महत्त्वाचे ठरले आहेत. त्याच्या परिणामी अल्पभूधारक असो वा मोठे कास्तकार, त्यांच्याकडे बैलांची संख्या अगदी बोटावर मोजता एवढी आहे. तथापि गृहिणीमुळे कुटुंबाला शोभा, तीच बाब कृषी संस्कृतीत बैलांना लागू आहे. पोळा सण आला की, बैलांच्या अनुषंगाने आपला मान करून घेण्याची शेतकऱ्यांना संधी असते. यंदा ती संधी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हिरावली गेली आहे.

वास्तविक, शेतकऱ्यांशी संबंधित जिल्हा बँकेची रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी प्रचार बैठकी आणि कार्यकर्त्यांचा जमाव होत आहे. याशिवाय शहरातील कुठल्याही भागात रस्त्यावर असणाऱ्या नागरिकांपेक्षा कमीच लोक पोळ्याच्या उत्सवाला आपले बैल तोरणाखाली येतात. तथापि, गावोगावी कोरोनाच्या छायेत भेदरलेल्या, त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना उत्साहाचा डोस देणारा हा सण जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशामुळे यंदा होणार नाही. त्यामुळे शेतकरी एक तर चोरून-लपून आयोजन करतील किंवा घरीच आपल्या लाडक्या सर्जा-राजाचे पूजन करून त्यांना खुंटालाच बांधून ठेवतील अशी स्थिती आहे

......,,

प्रतिक्रिया येत आहे.