शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

मुंबई एक्सप्रेसचे आरक्षण तिकिटाच्या रिफंडसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कोरोना संसर्गाचा परिणाम आणि कडक लॉकडाऊनमुळे अमरावती - मुंबई एक्स्प्रेस १० मेपर्यंत रद्द करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : कोरोना संसर्गाचा परिणाम आणि कडक लॉकडाऊनमुळे अमरावती - मुंबई एक्स्प्रेस १० मेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे २७ एप्रिलपासून दरराेज १२५ ते १५० आरक्षण तिकीट रद्द होत असून, रेल्वेने अंदाजे पावणे दोन लाख रूपये प्रवाशांना परत दिले आहेत. मात्र, ज्या प्रवाशांनी ई-तिकीट बुकिंग केले आहे, त्यांना रेल्वे खिडक्यांवर रक्कम परत दिली जात नाही, अशी माहिती आहे.

अमरावती - मुंबई एक्सप्रेस दिनांक २७ एप्रिल ते १० मे दरम्यान १४ दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी आता बुकिंग केलेले आरक्षण तिकीट रद्द करण्याचा सपाटा चालवला आहे. लॉकडाऊनमुळे मुंबई एक्सप्रेसचे बुकिंग कमी झाल्यामुळे १४ दिवस मुंबई एक्स्प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मुंबईमार्गे ये-जा करण्यासाठी पश्चिम विदर्भात रेल्वे प्रवाशांच्या पसंतीला खरी उतरलेली मुंबई एक्सप्रेस काही दिवसांपासून रिकामी धावत होती. लॉकडाऊनमुळे प्रवाशांनी मुंबईमार्गे प्रवास करणे कमी केले आहे. त्यामुळे या गाडीच्या आरक्षणाची मागणी मंदावली आहे. दररोज निम्मे बर्थ रिकामे घेऊन मुंबई एक्सप्रेसचा प्रवास सुरु होता. एरव्ही नियमित हाऊसफुल्ल धावणारी अमरावती - मुंबई एक्स्प्रेस कोरोना संसगार्मुळे रिकामी धावत आहे. दिनांक २७ एप्रिल ते ३ मे दरम्यान निरंतर येथील मॉडेल रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडक्यांवर रिफंड मिळण्यासाठी प्रवासी रांगेत दिसत आहेत. दरदिवशी आरक्षण तिकीट रद्द करताना प्रवाशांना सव्वा ते दीड लाख रूपये परत करावे लागत आहेत.

----------------

सात दिवसात अशी परत केली रक्कम (रिफंड)

२७ एप्रिल : १ लाख ३४ हजार

२८ एप्रिल : १ लाख २८ हजार

२९ एप्रिल : १ लाख ४७ हजार

३० एप्रिल : १ लाख २९ हजार

१ मे : १ लाख ४६ हजार

२ मे : १ लाख २५ हजार

३ मे : १ लाख ५० हजार

-----------------------

मंबई एक्स्प्रेसचे दरदिवशी सुमारे १५० प्रवासी आरक्षण तिकीट रद्द करत आहेत. त्या अनुषंगाने सव्वा ते दीड लाखांपर्यंत रक्कम परतावा म्हणून परत दिली जात आहे. १० मेपर्यंत मुंबई एक्सप्रेस रद्द केली आहे.

- डी. व्ही. धकाते, आरक्षण प्रमुख, अमरावती रेल्वे स्थानक