शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती-मुंबई एक्स्प्रेस प्रवाशांची रिफंडसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कोरोना संसर्गाचा परिणाम आणि कडक लॉकडाऊनमुळे अमरावती-मुंबई एक्स्प्रेस १० मेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : कोरोना संसर्गाचा परिणाम आणि कडक लॉकडाऊनमुळे अमरावती-मुंबई एक्स्प्रेस १० मेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. २७ एप्रिलपासून दरदिवशी १२५ ते १५० आरक्षण तिकीट रद्द होत असून, अंदाजे पावणेदोन लाख रुपये प्रवाशांना परत करावे लागत आहेत. ज्या प्रवाशांनी ई-तिकीट बूक केले, त्यांना रेल्वे खिडक्यांवरून रक्कम परत दिली जात नाही, अशी माहिती आहे.

अमरावती-मुंबई एक्सप्रेस २७ एप्रिल ते १० मे दरम्यान १४ दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी या कालावधीत आरक्षित केलेली तिकीट रद्द करून रिफंडचा सपाटा चालवला आहे. लॉकडाऊनमुळे बूकिंग कमी झाल्यामुळे मुंबई एक्स्प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. पश्चिम विदर्भातील प्रवाशांच्या पसंतीला खरी उतरलेली ही रेल्वे गाडी काही दिवसांपासून निम्मे बर्थ रिकामे घेऊन धावत होती. २७ एप्रिलपासून अमरावती येथील मॉडेल रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडक्यांवर रिफंड मिळण्यासाठी प्रवाशांची रांग दिसत आहे. दरदिवशी तिकीट रद्द करण्यापोटी प्रवाशांना सव्वा ते दीड लाख रुपये परत करावे लागत आहेत.

----------------

सात दिवसांत अशी परत केली रक्कम (रिफंड)

२७ एप्रिल : १ लाख ३४ हजार

२८ एप्रिल : १ लाख २८ हजार

२९ एप्रिल : १ लाख ४७ हजार

३० एप्रिल : १ लाख २९ हजार

१ मे : १ लाख ४६ हजार

२ मे : १ लाख २५ हजार

३ मे : १ लाख ५० हजार

-----------------------

मुंबई एक्स्प्रेसचे दरदिवशी सुमारे १५० तिकीट रद्द होत आहेत. त्या अनुषंगाने सव्वा ते दीड लाखांपर्यंत रक्कम परतावा म्हणून दिली जात आहे. १० मेपर्यंत ही रेल्वे गाडी रद्द केली आहे.

- डी.व्ही. धकाते, आरक्षणप्रमुख, अमरावती रेल्वे स्थानक,