शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१५ व्या वित्त आयोगाचा कोटयावधीचा निधी ग्रामपंचायतींच्या खात्यात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:13 IST

अमरावती: ग्रामपंचायतींना निवडणूकीपूर्वी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगातंर्गत जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींना आता पर्यत चार टप्यात ३६ कोटी ...

अमरावती: ग्रामपंचायतींना निवडणूकीपूर्वी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगातंर्गत जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींना आता पर्यत चार टप्यात ३६ कोटी २० लाख ४० हजार रूपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मिळालेला पंधराव्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींच्या खात्यावर गत ७ महिन्यापासून पडून आहे.

जिल्हा परिषदेला शासनाकडून पंधराव्या वित्त आयोगाचा चार टप्यात प्रत्येकी ८० टक्याप्रमाणे ३६ कोटी २० लाख ४०हजार रूपयाचा निधी उपलब्ध झाला होता.हा निधी पंचायत विभागाने शासनाचे सूचनेप्रमाणे १४ तालुक्यातील ८३९ ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या प्रमाणात वितरीत केला आहे.सदरचा निधी सर्व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा केलेला आहे. पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना कुठली विकास कामे करता येतात.याबाबत यापूर्वीच शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.त्यानुसार ग्रामपंचायतींनी गाव विकास आराखडयानुसार काही कामे सुध्दा केली आहेत.परंतु यावर होणारा निधी खर्चाचा लेखाजोखा हा पीएफएमएस प्रणालीव्दारेच करणे आवश्यक आहे.परंतु या प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना खर्च करण्यास अडचणी येत आहेत.त्यामुळे कोटयावधी रूपयाचा निधी ग्रामपंचायतींच्या खात्यावर पडून आहे.

बॉक्स

खर्चाची नोंदीची अडचण

ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातंर्गत निधी खर्च करतांना पीएफएमएस या प्रणालीव्दारे खर्च होणार असल्याने या प्रणालीत तांत्रिक अडचणीत येत आहेत.अशातच खर्चाची नोंद होत नाही. परिणामी खर्चाची टक्केवारी कमी होत असल्याचे दिसून येते.

बॉक्स

तालुकानिहाय ग्रा.प.ना उपलब्ध निधी

अमरावती २,८५३५०६६,भातकुली २०८३९६६४,नांदगाव खंडेश्र्वर २३८९८६५८,चांदूर रेल्वे १६१६८७३४,धामनगांव रेल्वे २२४२४४९१,तिवसा १८६८७८८४,मोर्शी २९९५३०९६,वरूड ३०३७०८५०,चांदूर बाजार ३४१८०८५०,अचलपूर ३३१९९७११,अंजनगाव सुजी २०७८६०९३,दर्यापूर २८०९३४४८,धारणी ३३३४३५९१,चिखलदरा २१५५७८६४ या प्रमाणे ग्रामपंचायत निहाय लोकसंख्येच्या प्रमाणात चार टप्यात प्रत्येकी ३६ कोटी २० लाख ४० हजार रूपयानुसार निधी उपलब्ध करून दिला असल्याचे जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.