शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

अतिवृष्टीमुळे ३३ हजार हेक्टरमधील पिके बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:17 IST

अमरावती : जिल्ह्यात ७ व ९ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे नऊ तालुक्यातील ५२० गावे बाधित झाली. यात ३३,०९९ हेक्टरमधील पिकांचे ...

अमरावती : जिल्ह्यात ७ व ९ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे नऊ तालुक्यातील ५२० गावे बाधित झाली. यात ३३,०९९ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला सादर केला.

सप्टेंबर महिन्यात सातत्याने पाऊस सुरूच आहे. ७ व ९ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, अमरावती, भातकुली, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, तिवसा व धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, कापूस व तूर पिकांचा समावेश आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागाच्या माहितीनुसार, ३३ हजार हेक्टरवर क्षेत्रात हे नुकसान झालेले आाहे. महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालात १० हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आलेले होते.

यामध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यात २९ गावांमध्ये ७०० हेक्टर, दर्यापूर तालुक्यात ९० गावांमध्ये ८४८ हेक्टर, अमरावती तालुक्यात ७९ गावांमध्ये १३ हजार हेक्टर, भातकुली तालुक्यात ९८ गावांमध्ये ३,८२१ हेक्टर, चांदूर बाजार तालुक्यात एका गावात ३८ हेक्टर, चांदूर रेल्वे तालुक्यात ५७ गावांमध्ये २,४७५ हेक्टर, तिवसा तालुक्यात ६० गावांमध्ये १,३१३ हेक्टर व धामणगाव रेल्वे तालुक्यात ८१ गावाममध्ये २,८५१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेले आहे.

बॉक्स

१,९३८८ घरांची पडझड, १.५१ कोटींची मागणी

या अतिवृष्टीमध्ये १९३८ घरांची पडझड झालेली आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने १,५१,४९,१०१ रुपयांची मागणी शासनाकडे केलेली आहे. याशिवाय ९४ पशुधनाची हानी झालेली आहे. याकरिता ३,२८,१०० रुपयांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. याशिवाय यंदाच्या पावसाळ्यासह एप्रिल व मे महिन्यातील अवकाळीमुळे ३,५८८ घरांचे नुकसान झालेले आहे. याकरिता २.६७ कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाने केलेली आहे.