शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे ३३ हजार हेक्टरमधील पिके बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:17 IST

अमरावती : जिल्ह्यात ७ व ९ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे नऊ तालुक्यातील ५२० गावे बाधित झाली. यात ३३,०९९ हेक्टरमधील पिकांचे ...

अमरावती : जिल्ह्यात ७ व ९ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे नऊ तालुक्यातील ५२० गावे बाधित झाली. यात ३३,०९९ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला सादर केला.

सप्टेंबर महिन्यात सातत्याने पाऊस सुरूच आहे. ७ व ९ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, अमरावती, भातकुली, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, तिवसा व धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, कापूस व तूर पिकांचा समावेश आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागाच्या माहितीनुसार, ३३ हजार हेक्टरवर क्षेत्रात हे नुकसान झालेले आाहे. महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालात १० हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आलेले होते.

यामध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यात २९ गावांमध्ये ७०० हेक्टर, दर्यापूर तालुक्यात ९० गावांमध्ये ८४८ हेक्टर, अमरावती तालुक्यात ७९ गावांमध्ये १३ हजार हेक्टर, भातकुली तालुक्यात ९८ गावांमध्ये ३,८२१ हेक्टर, चांदूर बाजार तालुक्यात एका गावात ३८ हेक्टर, चांदूर रेल्वे तालुक्यात ५७ गावांमध्ये २,४७५ हेक्टर, तिवसा तालुक्यात ६० गावांमध्ये १,३१३ हेक्टर व धामणगाव रेल्वे तालुक्यात ८१ गावाममध्ये २,८५१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेले आहे.

बॉक्स

१,९३८८ घरांची पडझड, १.५१ कोटींची मागणी

या अतिवृष्टीमध्ये १९३८ घरांची पडझड झालेली आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने १,५१,४९,१०१ रुपयांची मागणी शासनाकडे केलेली आहे. याशिवाय ९४ पशुधनाची हानी झालेली आहे. याकरिता ३,२८,१०० रुपयांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. याशिवाय यंदाच्या पावसाळ्यासह एप्रिल व मे महिन्यातील अवकाळीमुळे ३,५८८ घरांचे नुकसान झालेले आहे. याकरिता २.६७ कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाने केलेली आहे.