शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जाचे पाच वर्षांसाठी होणार फेरपुनर्गठन

By admin | Updated: April 8, 2016 23:56 IST

खरीप- २०१६ हंगामासाठी पीककर्ज वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाने पीककर्ज वाटपासाठी ३० जूनची ‘डेडलाईन’ दिली आहे.

अमरावती : खरीप- २०१६ हंगामासाठी पीककर्ज वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाने पीककर्ज वाटपासाठी ३० जूनची ‘डेडलाईन’ दिली आहे. जिल्ह्यातील १९६७ गावांत शासनाने दुष्काळस्थिती घोषित केली असून शेतीसाठी घेतलेल्या पीककर्ज वसुलीस स्थगिती दिली आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पाच वर्षांसाठी फेरपुनर्गठन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सलग दुष्काळ आहे. पावसाचा लहरीपणा, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यंदा जानेवारी ते मार्च या ९० दिवसांत ८५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. खरिपात नापिकी झाल्याने शासनाने उशिरा का होईना शासनाने जिल्ह्यातील १,९६७ गावांत दुष्काळस्थिती घोषित केली आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच शेतीशी निगडित कर्ज वसुलीस स्थगिती, शेतकऱ्यांकडील पीककर्जाचे फेरपुनर्गठन/ रूपांतरण बँकांमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी बँकांनी संबंधित शेतकऱ्यांची पूर्वसंमती घेणे आवश्यक आहे. हा कर्ज पुनर्गठनाचा कालावधी पाच वर्षांचा राहणार आहे. रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे शेतकऱ्यांकडील पुनर्गठित कर्ज हप्त्याचे फेरपुनर्गठन करण्यात येणार आहे. फेरपुनर्गठनाची कार्यवाही ३० एप्रिल २०१६ पर्यंत करावी लागणार आहे. गतवर्षी दुष्काळ जाहीर केलेल्या जिल्ह्यांमधील पीककर्जाच्या वसुलीस शासनाने स्थगिती देऊन कर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठन केले होते. तसेच नवीन कर्जही शेतकऱ्यांना दिले होते. खरीप २०१५ च्या हंगामात पावसात महिना ते दीड महिना खंड पडल्याने सरासरी उत्पादनात घट आली. सोयाबीन उद्ध्वस्त झाले. सुधारित व अंतिम आणेवारी ५० पैशांच्या आत आली. यावर्षीदेखील पीककर्जाचे पाच वर्षांकरिता पुनर्गठन करून शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यात येणार आहे.पीककर्ज फेरपुनर्गठनाबाबत रिझर्व बँकेने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याअन्वये खरीप पीककर्ज पुनर्गठनाची कार्यवाही ३० एप्रिल २०१६ पर्यंत तसेच रबी पीककर्ज पुनर्गठनाची कार्यवाही बँकांनी ३० जुलै २०१६ पर्यंत करण्याच्या सूचना रिझर्व बँकेने इतर बँकांना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)