शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पीककर्जाचे पाच वर्षांसाठी होणार फेरपुनर्गठन

By admin | Updated: April 8, 2016 23:56 IST

खरीप- २०१६ हंगामासाठी पीककर्ज वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाने पीककर्ज वाटपासाठी ३० जूनची ‘डेडलाईन’ दिली आहे.

अमरावती : खरीप- २०१६ हंगामासाठी पीककर्ज वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाने पीककर्ज वाटपासाठी ३० जूनची ‘डेडलाईन’ दिली आहे. जिल्ह्यातील १९६७ गावांत शासनाने दुष्काळस्थिती घोषित केली असून शेतीसाठी घेतलेल्या पीककर्ज वसुलीस स्थगिती दिली आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पाच वर्षांसाठी फेरपुनर्गठन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सलग दुष्काळ आहे. पावसाचा लहरीपणा, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यंदा जानेवारी ते मार्च या ९० दिवसांत ८५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. खरिपात नापिकी झाल्याने शासनाने उशिरा का होईना शासनाने जिल्ह्यातील १,९६७ गावांत दुष्काळस्थिती घोषित केली आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच शेतीशी निगडित कर्ज वसुलीस स्थगिती, शेतकऱ्यांकडील पीककर्जाचे फेरपुनर्गठन/ रूपांतरण बँकांमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी बँकांनी संबंधित शेतकऱ्यांची पूर्वसंमती घेणे आवश्यक आहे. हा कर्ज पुनर्गठनाचा कालावधी पाच वर्षांचा राहणार आहे. रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे शेतकऱ्यांकडील पुनर्गठित कर्ज हप्त्याचे फेरपुनर्गठन करण्यात येणार आहे. फेरपुनर्गठनाची कार्यवाही ३० एप्रिल २०१६ पर्यंत करावी लागणार आहे. गतवर्षी दुष्काळ जाहीर केलेल्या जिल्ह्यांमधील पीककर्जाच्या वसुलीस शासनाने स्थगिती देऊन कर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठन केले होते. तसेच नवीन कर्जही शेतकऱ्यांना दिले होते. खरीप २०१५ च्या हंगामात पावसात महिना ते दीड महिना खंड पडल्याने सरासरी उत्पादनात घट आली. सोयाबीन उद्ध्वस्त झाले. सुधारित व अंतिम आणेवारी ५० पैशांच्या आत आली. यावर्षीदेखील पीककर्जाचे पाच वर्षांकरिता पुनर्गठन करून शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यात येणार आहे.पीककर्ज फेरपुनर्गठनाबाबत रिझर्व बँकेने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याअन्वये खरीप पीककर्ज पुनर्गठनाची कार्यवाही ३० एप्रिल २०१६ पर्यंत तसेच रबी पीककर्ज पुनर्गठनाची कार्यवाही बँकांनी ३० जुलै २०१६ पर्यंत करण्याच्या सूचना रिझर्व बँकेने इतर बँकांना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)