शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पीककर्जाचे पाच वर्षांसाठी होणार फेरपुनर्गठन

By admin | Updated: April 8, 2016 23:56 IST

खरीप- २०१६ हंगामासाठी पीककर्ज वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाने पीककर्ज वाटपासाठी ३० जूनची ‘डेडलाईन’ दिली आहे.

अमरावती : खरीप- २०१६ हंगामासाठी पीककर्ज वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाने पीककर्ज वाटपासाठी ३० जूनची ‘डेडलाईन’ दिली आहे. जिल्ह्यातील १९६७ गावांत शासनाने दुष्काळस्थिती घोषित केली असून शेतीसाठी घेतलेल्या पीककर्ज वसुलीस स्थगिती दिली आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पाच वर्षांसाठी फेरपुनर्गठन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सलग दुष्काळ आहे. पावसाचा लहरीपणा, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यंदा जानेवारी ते मार्च या ९० दिवसांत ८५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. खरिपात नापिकी झाल्याने शासनाने उशिरा का होईना शासनाने जिल्ह्यातील १,९६७ गावांत दुष्काळस्थिती घोषित केली आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच शेतीशी निगडित कर्ज वसुलीस स्थगिती, शेतकऱ्यांकडील पीककर्जाचे फेरपुनर्गठन/ रूपांतरण बँकांमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी बँकांनी संबंधित शेतकऱ्यांची पूर्वसंमती घेणे आवश्यक आहे. हा कर्ज पुनर्गठनाचा कालावधी पाच वर्षांचा राहणार आहे. रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे शेतकऱ्यांकडील पुनर्गठित कर्ज हप्त्याचे फेरपुनर्गठन करण्यात येणार आहे. फेरपुनर्गठनाची कार्यवाही ३० एप्रिल २०१६ पर्यंत करावी लागणार आहे. गतवर्षी दुष्काळ जाहीर केलेल्या जिल्ह्यांमधील पीककर्जाच्या वसुलीस शासनाने स्थगिती देऊन कर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठन केले होते. तसेच नवीन कर्जही शेतकऱ्यांना दिले होते. खरीप २०१५ च्या हंगामात पावसात महिना ते दीड महिना खंड पडल्याने सरासरी उत्पादनात घट आली. सोयाबीन उद्ध्वस्त झाले. सुधारित व अंतिम आणेवारी ५० पैशांच्या आत आली. यावर्षीदेखील पीककर्जाचे पाच वर्षांकरिता पुनर्गठन करून शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यात येणार आहे.पीककर्ज फेरपुनर्गठनाबाबत रिझर्व बँकेने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याअन्वये खरीप पीककर्ज पुनर्गठनाची कार्यवाही ३० एप्रिल २०१६ पर्यंत तसेच रबी पीककर्ज पुनर्गठनाची कार्यवाही बँकांनी ३० जुलै २०१६ पर्यंत करण्याच्या सूचना रिझर्व बँकेने इतर बँकांना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)