शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

नकाशात अडकले पीक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:01 IST

राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कजार्साठी चतु:सीमा नकाशाची अट टाकली आहे. यामुळे कोरोनाकाळातही भूमिअभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांना चकरा घालाव्या लागत आहेत. गतवर्षी तालुक्यात दहा हजारांच्या जवळपास शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बकांतून कर्ज घेतले होते. यंदा भूमिअभिलेख कार्यालयाने केवळ दीड ते दोन हजार शेतकऱ्यांना शेतजमीन चतु:सीमा नकाशा दिला आहे.

ठळक मुद्देधामणगावात आठ हजार शेतकरी : राष्ट्रीयीकृत बँकेची अट घेतेय जीव

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : सात-बारावर सर्व नोंदी, फेरफाराची नोंद असताना यंदा किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकाद्वारे पीक कजार्साठी चतु:सीमा नकाशा मागितला जात आहे. भूमिअभिलेख कार्यालयात केवळ दोन कर्मचारी असल्याने नकाशाअभावी तालुक्यातील आठ हजार शेतकरी पीक कर्जपासून अद्याप वंचित आहेत.जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांद्वारे शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पीक कर्जवाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी १४ मे २०२० रोजी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या व्यवस्थापकांची बैठक घेतली होती. यामध्ये शेतकऱ्यांना अधिक अडचणी निर्माण होऊ नये म्हणून आधार कार्ड, सात-बारा, ८-अ, फेरफार, छायाचित्रासोबतच तलाठ्याकडून जमिनीचा हातनकाशा किंवा तलाठी यांनी जमिनीची हद्द नमूद करून दिलेला चतु:सीमा नकाशा अशी कागदपत्रे शेतकऱ्यांकडून घ्यावीत, असे आदेश राष्ट्रीयीकृत बँकांना दिले. सोबतच १ लाख ६० हजारांवर कर्ज घ्यायचे असेल, तर ई-करार व लीगल सर्च रिपोर्ट घेण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.एकीकडे एक वर्षापूर्वी जिल्हाधिकाºयांनी आदेश काढून तलाठ्याकडून कोणताही हातनकाशा किंवा जमिनीबाबत हाताने लिहिलेली कागदपत्रे घेतली जाऊ नये, असा आदेश काढले. दुसरीकडे १४ मे रोजी काढलेल्या पत्रात तलाठ्यांमार्फत हातनकाशा घेण्याचे आदेश काढले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कधी तलाठ्याकडे, तर कधी तर तहसील कार्यालयात चकरा घालत आहेत. यादरम्यान काही ठिकाणी खरिपातील दुबार पेरणीही झाली. शेतकºयांना मात्र अपेक्षित कर्ज मिळालेले नाही.भूमिअभिलेख कार्यालयात अर्जांचा ढीगराष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कजार्साठी चतु:सीमा नकाशाची अट टाकली आहे. यामुळे कोरोनाकाळातही भूमिअभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांना चकरा घालाव्या लागत आहेत. गतवर्षी तालुक्यात दहा हजारांच्या जवळपास शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बकांतून कर्ज घेतले होते. यंदा भूमिअभिलेख कार्यालयाने केवळ दीड ते दोन हजार शेतकऱ्यांना शेतजमीन चतु:सीमा नकाशा दिला आहे. हे काम केवळ दोन कर्मचारी करीत असल्याने शेतकऱ्यांना कार्यालयात चकरा घालाव्या लागत आहेत. यामुळे भूमिअभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांची गर्दी एकाच वेळी या कार्यालयात होते. एवढ्या शेतकऱ्यांना नकाशा देणे अवघड होते. एका दिवशी दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांना नकाशा देत आहोत.- व्ही.व्ही. राणेउपअधीक्षकतीन ते चार दिवसांपासून भूमिअभिलेख कार्यालयात गर्दी होत आहे. यामुळे नकाशा मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे ही अट रद्द करणे गरजेचे आहे. या अटीमुळे अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित राहतील.- रामराव अतकरे, शेतकरी

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज