शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

पिके कोमात, चिंतेचे ढग; पेरण्या धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 05:00 IST

जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात सरासरीच्या २२ टक्के पाऊस जास्त झाला. ९ व ११ जूनला जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाची नोंद झाली. शेतकऱ्यांनीदेखील मृग नक्षत्रात पेरण्यांना सुरुवात केली. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिली. पाऊस फक्त काही भागात विखुरल्या स्वरूपात झाला. जमिनीत आर्द्रता असल्याने पिकांना काही काळ तग धरली. आता पावसात खंड असल्याने व तापमानात वाढ झाल्याने कोवळ्या पिकांनी माना टाकल्या आहेत.

ठळक मुद्देसात दिवसांपासून ‘डॉट’, शेतकऱ्यांसमोर नवे संकट, ५० हजार हेक्टरमधील क्षेत्र प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात १ जुलैपासून पावसाची दडी असल्याने सुरुवातीला पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके पावसाअभावी कोमात गेली आहेत. याशिवाय पावसाच्या खंडाअभावी या आठवड्यात झालेल्या ९३ हजार हेक्टरपैकी किमान ५० हजार हेक्टरमधील पेरण्या उलटण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ७ जुलैनंतर पावसाची शक्यता सांगितली असली तरी एकूण स्थिती पाहता चिंतेचे ढग दाटून आले आहेत. जिल्ह्यात १० जूनला झालेल्या सार्वत्रिक पावसानंतर मान्सूनचे वेळेआधी आगमन झाल्याची शुभवार्ता हवामान विभागाने दिली. जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात सरासरीच्या २२ टक्के पाऊस जास्त झाला. ९ व ११ जूनला जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाची नोंद झाली. शेतकऱ्यांनीदेखील मृग नक्षत्रात पेरण्यांना सुरुवात केली. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिली. पाऊस फक्त काही भागात विखुरल्या स्वरूपात झाला. जमिनीत आर्द्रता असल्याने पिकांना काही काळ तग धरली. आता पावसात खंड असल्याने व तापमानात वाढ झाल्याने कोवळ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. त्यामुळे बळराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.पाऊस येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. काही भागातील जमिनीत ओल असल्याने बीजांकुर निघाले. मात्र, कमी आर्द्रतेच्या भागातील सोयाबीन बियाणे जमिनीत कुजायला लागले आहे.  

कोवळ्या पिकांवर माकडांसह वन्यप्राण्यांचे संकट सुरुवातीच्या टप्प्यात पेरणी झालेली पिकांना माकडांच्या टोळ्या व काही भागात हरिण, निलगाय आदी फस्त करीत आहेत. याशिवाय बीजांकुराचा वाणी आदी खुरपड्या फडशा पाडीत आहेत. हे नवे संकट शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे.  मेळघाटातील   शिवारांमध्ये पिकांवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना व्यवस्थापन करावे लागत आहे.

पावसाअभावी वैरणटंचाईपावसाची ओढ असल्याने सध्या वैरणटंचाईचे सावटदेखील पशुपालकांवर आहे. सोयाबीनचे कुटार अलीकडे ब्रिकेटसाठी वापरली जात असल्याने वैरणटंचाईत भर पडली आहे. त्यातच सोयाबीनच्या हंगामात परतीच्या पावसामुळे कुटार खराब झालेले असल्याने पशुपालकांजवळ साठवणूक केलेली वैरण नाही. पावसाअभावी आतापर्यंत शिवारात, धुऱ्यावर चाऱ्याची उगवण झालेली नाही. 

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यांपर्यंत सोयाबीनची पेरणीमूग, उडीद आदी अल्प कालावधीतील पिके या आठवड्यानंतर बाद होतील. मात्र, १५ जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी करता येते. अधिकतम त्यानंतरही एक आठवड्यापर्यंत करता येईल. जुलैअखेरपर्यंत कपाशीची पेरणीदेखील करता येणार आहे. तूर त्यानंतरही पेरणी करता येईल, अशा परिस्थितीत सोयाबीनमध्ये आंतरपीक घेणे महत्त्वाचे आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती