शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅलिफोर्निया’वर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 01:36 IST

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरूड तालुका प्रसिद्ध आहे. तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. तथापि, संत्रा ऐन आंबिया बहराला आला असताना, पाणी टंचाईने तोंड वर काढले. विहिरी कोरड्या पडू लागल्या.

ठळक मुद्देआंबिया बहराला गळती : पाणीटंचाई, वाढत्या तापमानाचा परिणाम

संजय खासबागे।लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरूड तालुका प्रसिद्ध आहे. तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. तथापि, संत्रा ऐन आंबिया बहराला आला असताना, पाणी टंचाईने तोंड वर काढले. विहिरी कोरड्या पडू लागल्या. बोअर बंद पडले. सिंचन प्रकल्प कोरडे पडले. अतिशय तापमान व खालावलेल्या भूजल पातळीमुळे संत्रा वाचविणे कठीण झाले आहे. तापमान वाढल्याने पाने पिवळी पडत आहे, तर कोळी रोगाने आंबिया बहराला मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने संत्रउत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.देशाच्या कानाकोपऱ्यात येथून चवदार संत्र्याची निर्यात केली जाते. तालुक्यात कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग तसेच लघू, मध्यम सिंचन प्रकल्पाची संख्या अधिक आहे. त्यामुळे बागायती पिके आणि संत्र्याचे क्षेत्र मोठे आहे. मात्र, गतवर्षी पाऊस समाधानकारक होऊनसुद्धा मार्चपासूनच भूजल पातळी झपाट्याने खालावल्याने सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील नऊ सिंचन प्रकल्पांमध्ये ठणठणाट असून, शेतातील विहिरी, बोअर आटले. वरूड तालुका ‘ड्राय झोन’ असल्याने नवीन विहिरी, बोअर करण्यावर बंदी आहे. पाणीटंचाईमुळे संत्राउत्पादकांना संत्रा वाचविण्याची चिंता लागली आहे. हजारो हेक्टरमधील संत्राबागा सुकण्याच्या मार्गावर असताना आंबिया बहरालासुद्धा ४४ ते ४५ अंश सेल्सिअस तापमानामुळे गळती लागल्याने पीक हातून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाणीटंचाईमुळे संत्राबागा वाचविण्याकरिता शेतकऱ्यांना लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. यातच आंबिया बहरावर फळझड आणि कोळी हे रोग गेल्याचे सांगण्यात येते. यामुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिक संत्रा गळती झाल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.अति तापमानामुळे आंबिया बहराला गळतीमार्च, एप्रिल महिन्यातच तापमान ४३ ते ४५ अंशावर गेल्याने संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागली आहे. आधीच सुलतानी संकटाने पिचलेल्या संत्राउत्पादकांवर अति तापमानाच्या रुपात नैसर्गिक संकट कोसळले आहे. गळतीमुळे शेतकºयांच्या हाती आलेले संत्र्याचे नगदी पीक वाया जात आहे.संत्रा आंबिया बहाराची फळगळती थांबविण्याकरिता २-४ डी किंवा जिब्रेलिक आम्ल, १५ पी.पी.एम. (१.५ ग्रॅम) एक किलो युरिया व कार्बेन्डॅजिम १०० ग्रॅम १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास या रोगाचा प्रतिबंध करता येऊ शकते. फवारणीने संपूर्ण झाड ओले होणे आवश्यक आहे.- राजीव साबळेकृषी अधिकारी, वरुडतालुक्यात एकीकडे भूजल पातळी खालावली, तर दुसरीकडे अति तापमानाचा फटका बसत असल्याने संत्रा आंबिया बहराला चांगलीच गळती लागली आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक संत्री गळाल्याने उत्पादकांना लाखो रुपये नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. संत्रा उत्पादकांना आर्थिक अनुदान द्यावे.- उद्धवराव फुटाणेसंत्रा उत्पादक, तिवसाघाटअनपेक्षितपणे वाढलेले तापमान, वातावरणातील बदलामुळे माऊट्स आणि थ्रिप्सची लागण झाल्यामुळे प्रचंड फळगळती सुरू आहे. पाण्याची कमतरता आणि जमिनीतील उष्णताही त्यास कारणीभूत आहे. फळगळतीमुळे शेतकºयांना लाखो रुपायंचे नुकसान सहन करावे लागत आहे.- प्रशांत मानकरसंत्रा उत्पादक, गाडेगाव

टॅग्स :agricultureशेती