शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

प्रशासकीय कारवाईसह फौजदारीची तलवार!

By admin | Updated: April 18, 2016 00:02 IST

सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेमधील प्रमुख तीन घटकांमध्ये झालेल्या आर्थिक अनियमिततेसाठी जबाबदार संबंधितांवर प्रशासकीय आणि फौजदारी कारवाईची टांगती तलवार आहे.

महापालिका वर्तुळात खळबळ : आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्षअमरावती : सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेमधील प्रमुख तीन घटकांमध्ये झालेल्या आर्थिक अनियमिततेसाठी जबाबदार संबंधितांवर प्रशासकीय आणि फौजदारी कारवाईची टांगती तलवार आहे. योजनेच्या सहायक प्रकल्प अधिकारी तथा प्रकल्प संचालक वंदना गुल्हाने यांच्या लेखी खुलाशाचे निरीक्षण झाल्यानंतर कारवाईची दिशा निश्चित होणार आहे. लेखापरीक्षण अहवालामध्ये ठेवण्यात आलेला ठपका, आर्थिक अनियमितता आणि लेखी खुलाशाच्या अभ्यासानंतर महापालिका आयुक्त नेमकी कुठली भूमिका घेतात, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेतून १ एप्रिल २००९ ते ३१ डिसेंबर २०१५ याकालावधीत उद्यान विकसित करणे, शाळेतील मुला-मुलींसाठी डेक्स-बेंच खरेदी करणे व मुंबई येथील एक दिवसीय अभ्यास सहलीचे लेखापरीक्षण करण्यात आले. याबाबतचा सविस्तर अहवाल ५ एप्रिल २०१६ मध्ये मुख्य लेखापरीक्षकांनी महापालिका आयुक्तांकडे सुपूर्द केला. त्यानंतर वंदना गुल्हाने यांच्याकडून याबाबत लेखी खुलासा मागविण्यात आला. तो खुलासा महापालिका यंत्रणेकडे पोहोचल्यावर त्यावर बराच खल अपेक्षित आहे. विशेष म्हणजे लेखापरीक्षकांनी विविध कामांमधील अनियमिततेवर बोट ठेऊन प्रशासकीय कारवाई प्रस्तावित केली आहे. अनेकांनी नाकारली जबाबदारीअमरावती : मुख्य लेखापरीक्षकांच्या नेतृत्वात सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेमधील प्रमुख तीन घटकांवरील खर्चाचे लेखापरीक्षण करण्यात आले. गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय अनियमितता उघड झाल्यानंतर आपण निर्दोष आहोत, हे बिंबविण्याचा बहुतेकांनी प्रयत्न चालविला आहे. आपण फक्त ‘रबर स्टॅम्प’ पुरतेच प्रमुख होतो, आपल्याकडे आर्थिक व्यवहार नव्हताच, तर मग आर्थिक अनियमिततेसाठी आपण एकटेच कसे जबाबदार, असा पवित्रा ठपका असणाऱ्यांपैकी बहुतेकांनी घेतल्याने खरे कारणीभूत कोण? हे प्रस्तावित कारवाईनंतरच स्पष्ट होणार आहे.२.३० कोटी रुपयांवर आक्षेपयोजनेची अंमलबजावणी करताना तब्बल २.३० कोटी रुपयांहून अधिक रकमेवर आक्षेप घेण्यात आला. या गंभीर आर्थिक अनियमिततेवर बोट ठेवत संबंधितांकडून ती रक्कम वसूल करण्याच्या व जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना करण्यात आल्याने या कालावधीत कार्यरत काही जणांविरुद्ध तर थेट फौजदारी तक्रार होण्याचे संकेत मिळाले आहेत. मूळ उद्देशाला बगलयोजनेचा अंमलबजावणी काळ आणि त्या कालावधीत कार्यरत संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर लेखापरीक्षण अहवालात गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी शासनाच्या निधीचा दुरुपयोग करण्यात आला, नियमांची अंमलबजावणी चोखपणे करण्यात आली नाही, योजनेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासण्यात आला, असे निरीक्षण नोंदविण्यात आले.महसूल बुडविलाअनेक देयके मंजूर करताना योजनेतील संबंधिताना शासनाचा महसूल बुडविला. योजनेच्या अंमलबजावणीकडे लक्ष घातले नाही. अधिकची देयके दिली. सदोष आणि अतिरिक्त खर्चाची देयके पास करण्यात आली. त्या संबंधिताविरुद्धही प्रशासकीय कारवाई प्रस्तावित केली जाऊ शकते, अशी शक्यता महापालिका वर्तुळातील खास सूत्रांनी व्यक्त केली आहे.