शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

नव्या ४० तलाठी साझांची निर्मिती

By admin | Updated: May 17, 2017 00:07 IST

वाढती लोकसंख्या, वाढते शेतकरी खातेदार आदींमुळे तलाठ्यांवर कामाचा बोजा वाढला आहे.

शासनाची मंजुरी : तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी करणार लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वाढती लोकसंख्या, वाढते शेतकरी खातेदार आदींमुळे तलाठ्यांवर कामाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे तलाठी साझांची संख्यावाढ करण्याचा निर्णय शासनाने सन २०१४ मध्ये घेतला आहे. प्रत्यक्षात १६ मे २०१७ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. शासनाच्या हिरव्या झेंडीमुळे जिल्ह्यात किमान ४० नवीन तलाठी सांझे वाढणार आहेत.यासंदर्भात शिफारस समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने मान्य केला होता. मात्र, अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन न झाल्यामुळे प्रस्ताव प्रलंबित होता. आता मात्र हा प्रस्ताव मार्गी लागला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात ३ हजार १६५ नवीन तलाठी साझांना मंजुरी देण्यात आली असून ५२८ नवीन मंडळ अधिकारी कार्यालये स्थापित होणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात लोकसंख्येच्या प्रमाणात ४० पेक्षा अधिक तलाठी साझांची संख्यावाढ होणार आहे. मागील तीन दशकात लोकसंख्या वेगाने वाढली. मात्र, तलाठी साझांची संख्या तेवढीच राहिली. तलाठ्यांवरील कामाचा ताण वाढल्याने साझांची संख्यावाढ करण्यासाठी नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली व अन्य विभागीय आयुक्तांचा समावेश असणारी समिती गठित करण्यात आली. या समितीचा अहवाल वर्षभरापूर्वीच शासनाला सादर झाला व मंत्रिमंडळाने त्या शिफारसींना मान्यता दिली आहे.राज्यातील सहा महसूल विभागात ३६ जिल्हे, १८४ उपविभाग, ३५८ तालुके, २०९३ मंडळ अधिकारी व १२,३२७ तलाठी साझे आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४०० वर तलाठी साझे आहेत. यामध्ये आता ४० वर साझांची भर पडणार आहे. यामुळे तलाठ्यांच्या कामावरील ताण कमी होणार आहे.कोतवाल, तलाठी पदांची होणार निर्मिती : राज्यात ३१६५ नवीन तलाठी साझे, ५२८ नवीन मंडळ कार्यालयांची निर्मिती करण्यात येणार असल्यामुळे स्वाभाविकच कोतवाल व तलाठीपदांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच मंडळ अधिकाऱ्यांची पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. यामुळे गावपातळीवरील महसूल यंत्रणेचा ताण कमी होणार आहे.सन १९८३ मध्ये झाली होती साझांची निर्मितीराज्यातील तलाठी साझा निर्मितीचे निकष ठरविण्यासाठी सन १९७४ मध्ये कपूर समिती स्थापित करण्यात आली होती. या समितीच्या शिफारसीनुसार सन १९८३ मध्ये तलाठी साझांची निर्मिती करण्यात आली होती. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात साझांची संख्यावाढ करावी, यासाठी तलाठी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला होता व साझांची संख्यावाढ करण्याचा निर्णय सन २०१४ मध्ये शासनाने घेतला होता.असे आहेत नवीन साझा निर्मितीचे निकषनवीन साझा निर्मितीचे विवरण व गुण समितीने निश्चित केले आहेत. त्यानुसार ५०० खातेदार असल्यास ४० गुण,१८०० हेक्टर शेती कार्यक्षेत्र असल्यास ३० गुण, आठ हजार रूपये जमीन महसूल असल्यास १० गुण, तीन हजार लोकसंख्या असल्यास १० गुण व चार गावांची संख्या असल्यास १० गुण असे १०० गुणांचे निकष ठरविण्यात आले होते.