शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नव्या ४० तलाठी साझांची निर्मिती

By admin | Updated: May 17, 2017 00:07 IST

वाढती लोकसंख्या, वाढते शेतकरी खातेदार आदींमुळे तलाठ्यांवर कामाचा बोजा वाढला आहे.

शासनाची मंजुरी : तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी करणार लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वाढती लोकसंख्या, वाढते शेतकरी खातेदार आदींमुळे तलाठ्यांवर कामाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे तलाठी साझांची संख्यावाढ करण्याचा निर्णय शासनाने सन २०१४ मध्ये घेतला आहे. प्रत्यक्षात १६ मे २०१७ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. शासनाच्या हिरव्या झेंडीमुळे जिल्ह्यात किमान ४० नवीन तलाठी सांझे वाढणार आहेत.यासंदर्भात शिफारस समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने मान्य केला होता. मात्र, अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन न झाल्यामुळे प्रस्ताव प्रलंबित होता. आता मात्र हा प्रस्ताव मार्गी लागला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात ३ हजार १६५ नवीन तलाठी साझांना मंजुरी देण्यात आली असून ५२८ नवीन मंडळ अधिकारी कार्यालये स्थापित होणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात लोकसंख्येच्या प्रमाणात ४० पेक्षा अधिक तलाठी साझांची संख्यावाढ होणार आहे. मागील तीन दशकात लोकसंख्या वेगाने वाढली. मात्र, तलाठी साझांची संख्या तेवढीच राहिली. तलाठ्यांवरील कामाचा ताण वाढल्याने साझांची संख्यावाढ करण्यासाठी नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली व अन्य विभागीय आयुक्तांचा समावेश असणारी समिती गठित करण्यात आली. या समितीचा अहवाल वर्षभरापूर्वीच शासनाला सादर झाला व मंत्रिमंडळाने त्या शिफारसींना मान्यता दिली आहे.राज्यातील सहा महसूल विभागात ३६ जिल्हे, १८४ उपविभाग, ३५८ तालुके, २०९३ मंडळ अधिकारी व १२,३२७ तलाठी साझे आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४०० वर तलाठी साझे आहेत. यामध्ये आता ४० वर साझांची भर पडणार आहे. यामुळे तलाठ्यांच्या कामावरील ताण कमी होणार आहे.कोतवाल, तलाठी पदांची होणार निर्मिती : राज्यात ३१६५ नवीन तलाठी साझे, ५२८ नवीन मंडळ कार्यालयांची निर्मिती करण्यात येणार असल्यामुळे स्वाभाविकच कोतवाल व तलाठीपदांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच मंडळ अधिकाऱ्यांची पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. यामुळे गावपातळीवरील महसूल यंत्रणेचा ताण कमी होणार आहे.सन १९८३ मध्ये झाली होती साझांची निर्मितीराज्यातील तलाठी साझा निर्मितीचे निकष ठरविण्यासाठी सन १९७४ मध्ये कपूर समिती स्थापित करण्यात आली होती. या समितीच्या शिफारसीनुसार सन १९८३ मध्ये तलाठी साझांची निर्मिती करण्यात आली होती. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात साझांची संख्यावाढ करावी, यासाठी तलाठी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला होता व साझांची संख्यावाढ करण्याचा निर्णय सन २०१४ मध्ये शासनाने घेतला होता.असे आहेत नवीन साझा निर्मितीचे निकषनवीन साझा निर्मितीचे विवरण व गुण समितीने निश्चित केले आहेत. त्यानुसार ५०० खातेदार असल्यास ४० गुण,१८०० हेक्टर शेती कार्यक्षेत्र असल्यास ३० गुण, आठ हजार रूपये जमीन महसूल असल्यास १० गुण, तीन हजार लोकसंख्या असल्यास १० गुण व चार गावांची संख्या असल्यास १० गुण असे १०० गुणांचे निकष ठरविण्यात आले होते.