शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नव्या ४० तलाठी साझांची निर्मिती

By admin | Updated: May 17, 2017 00:07 IST

वाढती लोकसंख्या, वाढते शेतकरी खातेदार आदींमुळे तलाठ्यांवर कामाचा बोजा वाढला आहे.

शासनाची मंजुरी : तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी करणार लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वाढती लोकसंख्या, वाढते शेतकरी खातेदार आदींमुळे तलाठ्यांवर कामाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे तलाठी साझांची संख्यावाढ करण्याचा निर्णय शासनाने सन २०१४ मध्ये घेतला आहे. प्रत्यक्षात १६ मे २०१७ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. शासनाच्या हिरव्या झेंडीमुळे जिल्ह्यात किमान ४० नवीन तलाठी सांझे वाढणार आहेत.यासंदर्भात शिफारस समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने मान्य केला होता. मात्र, अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन न झाल्यामुळे प्रस्ताव प्रलंबित होता. आता मात्र हा प्रस्ताव मार्गी लागला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात ३ हजार १६५ नवीन तलाठी साझांना मंजुरी देण्यात आली असून ५२८ नवीन मंडळ अधिकारी कार्यालये स्थापित होणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात लोकसंख्येच्या प्रमाणात ४० पेक्षा अधिक तलाठी साझांची संख्यावाढ होणार आहे. मागील तीन दशकात लोकसंख्या वेगाने वाढली. मात्र, तलाठी साझांची संख्या तेवढीच राहिली. तलाठ्यांवरील कामाचा ताण वाढल्याने साझांची संख्यावाढ करण्यासाठी नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली व अन्य विभागीय आयुक्तांचा समावेश असणारी समिती गठित करण्यात आली. या समितीचा अहवाल वर्षभरापूर्वीच शासनाला सादर झाला व मंत्रिमंडळाने त्या शिफारसींना मान्यता दिली आहे.राज्यातील सहा महसूल विभागात ३६ जिल्हे, १८४ उपविभाग, ३५८ तालुके, २०९३ मंडळ अधिकारी व १२,३२७ तलाठी साझे आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४०० वर तलाठी साझे आहेत. यामध्ये आता ४० वर साझांची भर पडणार आहे. यामुळे तलाठ्यांच्या कामावरील ताण कमी होणार आहे.कोतवाल, तलाठी पदांची होणार निर्मिती : राज्यात ३१६५ नवीन तलाठी साझे, ५२८ नवीन मंडळ कार्यालयांची निर्मिती करण्यात येणार असल्यामुळे स्वाभाविकच कोतवाल व तलाठीपदांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच मंडळ अधिकाऱ्यांची पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. यामुळे गावपातळीवरील महसूल यंत्रणेचा ताण कमी होणार आहे.सन १९८३ मध्ये झाली होती साझांची निर्मितीराज्यातील तलाठी साझा निर्मितीचे निकष ठरविण्यासाठी सन १९७४ मध्ये कपूर समिती स्थापित करण्यात आली होती. या समितीच्या शिफारसीनुसार सन १९८३ मध्ये तलाठी साझांची निर्मिती करण्यात आली होती. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात साझांची संख्यावाढ करावी, यासाठी तलाठी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला होता व साझांची संख्यावाढ करण्याचा निर्णय सन २०१४ मध्ये शासनाने घेतला होता.असे आहेत नवीन साझा निर्मितीचे निकषनवीन साझा निर्मितीचे विवरण व गुण समितीने निश्चित केले आहेत. त्यानुसार ५०० खातेदार असल्यास ४० गुण,१८०० हेक्टर शेती कार्यक्षेत्र असल्यास ३० गुण, आठ हजार रूपये जमीन महसूल असल्यास १० गुण, तीन हजार लोकसंख्या असल्यास १० गुण व चार गावांची संख्या असल्यास १० गुण असे १०० गुणांचे निकष ठरविण्यात आले होते.