शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

तरुणांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2016 00:13 IST

जल, जमीन, जंगल, प्राणी आणि प्राणवायू आदी घटक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

पालकमंत्री पोटे : २२ वी विदर्भ पर्यावरण परिषदेचा समारोपअमरावती : जल, जमीन, जंगल, प्राणी आणि प्राणवायू आदी घटक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. संपूर्ण जगभरात पर्यावरण आणि लोकसंस्कृतीचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. जगण्याची श्वाश्वता व सामूहिकता धोक्यात येत आहे. या धोक्यापासून भूतलावरील सजिवांना वाचविण्यासाठी तरूणांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागृकता आणावी, असे आवाहन पर्यावरण राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. प्रभात एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आयोजित २२ व्या विदर्भ पर्यावरण परिषदेत ते बोलत होते.यावेळी महापौर रिना नंदा, प्रभात एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वि.दा. पवार, कविता पवार, प्रयासचे संचालक अविनाश सावजी, प्रकाशचंद लढ्ढा, पाटील, काळकर, श्रीकांत देशपांडे, अस्मिता शिक्षण मंडळाचे प्राचार्य मु.अ. भोंडे, कमल भोंडे, नगरसेवक प्रवीण हरमकर आदी उपस्थित होते.पर्यावरणाला अपायकारक प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करावा. आपल्या घराच्या आवारात तसेच परिसरात मोठया प्रमाणात प्राणवायू देणारी पिंपळ, वड, निम अशी वृक्षे लावावीत जी येणाऱ्या पीढीला प्राणवायू पुरवेल,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पर्यावरण विषयात प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त रजनी आमले यांनी पर्यावरणपुरक सण कसे साजरे करावेत? यासंबंधी मार्गदर्शन केले. हेमंत जुमडे, वि.दा.पवार यांनीसुध्दा पर्यावरणाच्या संवर्धनाबाबतचे महत्त्व व परिषदेच्या आयोजनामागील उद्देश समजावून सांगितला. कार्यक्रमास पर्यावरण विषयातीलतज्ज्ञ व्यक्ती, प्रभात एज्युकेशन सोसायटीचे शिक्षकवृंद, निसर्गस्नेही, विद्यार्थी-विद्यार्थिनी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.