शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

तरुणांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2016 00:13 IST

जल, जमीन, जंगल, प्राणी आणि प्राणवायू आदी घटक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

पालकमंत्री पोटे : २२ वी विदर्भ पर्यावरण परिषदेचा समारोपअमरावती : जल, जमीन, जंगल, प्राणी आणि प्राणवायू आदी घटक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. संपूर्ण जगभरात पर्यावरण आणि लोकसंस्कृतीचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. जगण्याची श्वाश्वता व सामूहिकता धोक्यात येत आहे. या धोक्यापासून भूतलावरील सजिवांना वाचविण्यासाठी तरूणांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागृकता आणावी, असे आवाहन पर्यावरण राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. प्रभात एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आयोजित २२ व्या विदर्भ पर्यावरण परिषदेत ते बोलत होते.यावेळी महापौर रिना नंदा, प्रभात एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वि.दा. पवार, कविता पवार, प्रयासचे संचालक अविनाश सावजी, प्रकाशचंद लढ्ढा, पाटील, काळकर, श्रीकांत देशपांडे, अस्मिता शिक्षण मंडळाचे प्राचार्य मु.अ. भोंडे, कमल भोंडे, नगरसेवक प्रवीण हरमकर आदी उपस्थित होते.पर्यावरणाला अपायकारक प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करावा. आपल्या घराच्या आवारात तसेच परिसरात मोठया प्रमाणात प्राणवायू देणारी पिंपळ, वड, निम अशी वृक्षे लावावीत जी येणाऱ्या पीढीला प्राणवायू पुरवेल,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पर्यावरण विषयात प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त रजनी आमले यांनी पर्यावरणपुरक सण कसे साजरे करावेत? यासंबंधी मार्गदर्शन केले. हेमंत जुमडे, वि.दा.पवार यांनीसुध्दा पर्यावरणाच्या संवर्धनाबाबतचे महत्त्व व परिषदेच्या आयोजनामागील उद्देश समजावून सांगितला. कार्यक्रमास पर्यावरण विषयातीलतज्ज्ञ व्यक्ती, प्रभात एज्युकेशन सोसायटीचे शिक्षकवृंद, निसर्गस्नेही, विद्यार्थी-विद्यार्थिनी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.