शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2016 00:13 IST

जल, जमीन, जंगल, प्राणी आणि प्राणवायू आदी घटक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

पालकमंत्री पोटे : २२ वी विदर्भ पर्यावरण परिषदेचा समारोपअमरावती : जल, जमीन, जंगल, प्राणी आणि प्राणवायू आदी घटक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. संपूर्ण जगभरात पर्यावरण आणि लोकसंस्कृतीचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. जगण्याची श्वाश्वता व सामूहिकता धोक्यात येत आहे. या धोक्यापासून भूतलावरील सजिवांना वाचविण्यासाठी तरूणांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागृकता आणावी, असे आवाहन पर्यावरण राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. प्रभात एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आयोजित २२ व्या विदर्भ पर्यावरण परिषदेत ते बोलत होते.यावेळी महापौर रिना नंदा, प्रभात एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वि.दा. पवार, कविता पवार, प्रयासचे संचालक अविनाश सावजी, प्रकाशचंद लढ्ढा, पाटील, काळकर, श्रीकांत देशपांडे, अस्मिता शिक्षण मंडळाचे प्राचार्य मु.अ. भोंडे, कमल भोंडे, नगरसेवक प्रवीण हरमकर आदी उपस्थित होते.पर्यावरणाला अपायकारक प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करावा. आपल्या घराच्या आवारात तसेच परिसरात मोठया प्रमाणात प्राणवायू देणारी पिंपळ, वड, निम अशी वृक्षे लावावीत जी येणाऱ्या पीढीला प्राणवायू पुरवेल,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पर्यावरण विषयात प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त रजनी आमले यांनी पर्यावरणपुरक सण कसे साजरे करावेत? यासंबंधी मार्गदर्शन केले. हेमंत जुमडे, वि.दा.पवार यांनीसुध्दा पर्यावरणाच्या संवर्धनाबाबतचे महत्त्व व परिषदेच्या आयोजनामागील उद्देश समजावून सांगितला. कार्यक्रमास पर्यावरण विषयातीलतज्ज्ञ व्यक्ती, प्रभात एज्युकेशन सोसायटीचे शिक्षकवृंद, निसर्गस्नेही, विद्यार्थी-विद्यार्थिनी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.