शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

राज्य घटनेविषयी लोकांच्या मनात जागृती निर्माण व्हावी

By admin | Updated: November 27, 2015 00:25 IST

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार करून ती देशाला समर्पित केली.

संविधान दिन : कुलगुरू मोहन खेडकर यांचे प्रतिपादनअमरावती : २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार करून ती देशाला समर्पित केली. या राज्यघटनेविषयी लोकांच्या मनात जागृती निर्माण व्हावी आणि तिचा आदर भारतीयांच्या मनामध्ये असावा, असे प्रतिपादन कुलगुरू मोहन खेडकर यांनी गुरूवारी येथे केले. येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात संविधान दिन कार्यक्रमात ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, कुलसचिव अजय देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व्ही.एस. सपकाळ, परीक्षा नियंत्रक जे.डी. वडते, वित्त व लेखाधिकारी शशीकांत आस्वले यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी व कमर्चारी बहुसंख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना कुलगुरु खेडकर म्हणाले, २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. शासनाने देखील या दिनाचे औचित्य साधून संविधान दिन सर्वत्र साजरा करण्याबाबतचा शासन निर्णय घेतला आहे. देशाचे संविधान हे ग्रंथ म्हणून भारतीयांनी स्वीकार करणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. देशाचे संविधानाने न्याय, समता, बंधुत्व प्रदान केले आहे. सामान्य माणसाला संविधानामुळे जगण्याचा अधिकार बहाल झाला आहे. शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती ही वर्षभर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून संविधान दिन विद्यापिठात साजरा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्रात संविधान दिवस साजराविद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्रात संविधान दिवस साजरा करण्यात आला.यावेळी कुलगुरू मोहन खेडकर, प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, कुलसचिव अजय देशमुख यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्यघटनेचे सुद्धा पूजन करण्यात आले. मुलनिवासी संघ महाराष्ट्र राज्य संघाचे अध्यक्ष निलिमा भटकर, राहुल देशमुख व जिल्हा संघटन सचिव राकेश चौरपगार यांनी यावेळी कुलगुरू मोहन खेडकर, प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, कुलसचिव अजय देशमुख यांना संविधान उद्देशिकेची लॅमिनेटेड प्रत ससन्मान भेट दिली. याशिवाय विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख, कमर्चारी व विद्यार्थ्यांना उद्देशिकेची प्रत वितरीत करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्राचे समन्वयक सचिन गायकवाड, समाजशास्त्र विभाग प्रमुख के.बी. नायक, किशोर राऊत, कायर्कारी अभियंता श्री शशीकांत रोडे जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर, मुलनिवासी संघाचे प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.