शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर अपघातात गारद होताहेत मुकी जनावरे

By admin | Updated: September 29, 2016 00:21 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ असे नामानिधान मिळविणारा अमरावती बायपास रस्ता अलिकडे जीवघणा ठरला आहे.

आयआरबीचा जीवघेणा खेळ : मग टोलवसुली कशासाठी ? संरक्षणात्मक उपाययोजनांची गरज अमरावती : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ असे नामानिधान मिळविणारा अमरावती बायपास रस्ता अलिकडे जीवघणा ठरला आहे.वाहनांच्या अपघातात माणसे मृत्युमुखी पडत असताना मुकी जनावरेही अपघातात गारद होत असल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.बायपास रस्त्यावर जेथे सामान्य जनतेलाच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो,तेथे मुक्या प्राणी अपघातग्रस्त झाल्यास पर्वा कोण करतोय?सुमारे पाच वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आयआरबी या कंपनीशी करार केला. या कंपनीने चौपदरी रस्ते बांधले. रस्ते बांधणीसाठी खर्च केलेला पैसा वसूल करण्यासाठी नागरिकांच्या माथी टोल मारण्यात आला. नांदगाव पेठनजीक टोलनाका उभारून टोलधाड मारण्यात आली. मात्र, टोलच्या स्वरूपात परत मिळणाऱ्या रकमेच्या मोबदल्यात सुविधांशी मात्र फारकत घेण्यात आली. या चौपदरी रस्त्यावर मुकी जनावरे येवू नयेत, त्यांनी रस्त्यांच्या मधोमध येवू नये,यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या आणि व्यापक उंचीच्या कुंपणभिंती उभारणे अनिवार्य आहे. मात्र, या नियमाला आआरबीने हरताळ फासला आहे. अपघात टाळण्यासाठी आयआरबीने कुठल्याही उपाययोजना केल्या नसल्याचे अमरावरीकरांचे निरीक्षण आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचा वेग ताशी १०० ते १२० असा अपघाताला निमंत्रण देणारा असतो. या रस्त्यावरील वाहनांचा राबता पाहता रस्ता बांधणीच्यावेळी प्रधान्याने जनतेच्या संरक्षणार्थ आणि अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करायला हव्या होत्या. मात्र, चिकण्या रस्त्याशिवाय त्याला कुठलाही दिलासा मिळत नाही. या बायपासवर माणसांसोबतच जनावरेही आयआरबीच्या जीवघेण्या खेळाला बळी पडत आहेत.अपघातात म्हैस दगावलीअमरावती बायपास रस्त्यावर २० सप्टेंबरला एका चारचाकी वाहनाच्या धडकेत म्हैस दगावली. यात त्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले.ही म्हैस अचानक रस्त्यावर आल्याने चालकाचा ताबा सुटला .या जोरदार धडकेने त्या म्हशीने तेथेच तडफडत प्राण सोडले. या अपघाताला जबाबदार कोण? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.आयआरबीकडून डोळेडाकराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह आयआरबी या कंपनीने या मार्गावर होणाऱ्या प्राणहानीकडे सोईस्कर दुर्लक्ष चालविले आहे.मोकाट जनावरांमुळे बरेचदा किरकोळ आणि गंभीर अपघात होतात. त्याअनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आयआरबीला विचारणा का केली नाही,असा सवाल मैत्री संघटनेने उपस्थित केला आहे.आयआरबीने रस्त्याच्या दुतर्फा संरक्षण भिंत किंवा कठडे का उभारले नाहीत,असा प्रश्न अमरावतीकरांना पडला आहे.