शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर अपघातात गारद होताहेत मुकी जनावरे

By admin | Updated: September 29, 2016 00:21 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ असे नामानिधान मिळविणारा अमरावती बायपास रस्ता अलिकडे जीवघणा ठरला आहे.

आयआरबीचा जीवघेणा खेळ : मग टोलवसुली कशासाठी ? संरक्षणात्मक उपाययोजनांची गरज अमरावती : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ असे नामानिधान मिळविणारा अमरावती बायपास रस्ता अलिकडे जीवघणा ठरला आहे.वाहनांच्या अपघातात माणसे मृत्युमुखी पडत असताना मुकी जनावरेही अपघातात गारद होत असल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.बायपास रस्त्यावर जेथे सामान्य जनतेलाच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो,तेथे मुक्या प्राणी अपघातग्रस्त झाल्यास पर्वा कोण करतोय?सुमारे पाच वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आयआरबी या कंपनीशी करार केला. या कंपनीने चौपदरी रस्ते बांधले. रस्ते बांधणीसाठी खर्च केलेला पैसा वसूल करण्यासाठी नागरिकांच्या माथी टोल मारण्यात आला. नांदगाव पेठनजीक टोलनाका उभारून टोलधाड मारण्यात आली. मात्र, टोलच्या स्वरूपात परत मिळणाऱ्या रकमेच्या मोबदल्यात सुविधांशी मात्र फारकत घेण्यात आली. या चौपदरी रस्त्यावर मुकी जनावरे येवू नयेत, त्यांनी रस्त्यांच्या मधोमध येवू नये,यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या आणि व्यापक उंचीच्या कुंपणभिंती उभारणे अनिवार्य आहे. मात्र, या नियमाला आआरबीने हरताळ फासला आहे. अपघात टाळण्यासाठी आयआरबीने कुठल्याही उपाययोजना केल्या नसल्याचे अमरावरीकरांचे निरीक्षण आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचा वेग ताशी १०० ते १२० असा अपघाताला निमंत्रण देणारा असतो. या रस्त्यावरील वाहनांचा राबता पाहता रस्ता बांधणीच्यावेळी प्रधान्याने जनतेच्या संरक्षणार्थ आणि अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करायला हव्या होत्या. मात्र, चिकण्या रस्त्याशिवाय त्याला कुठलाही दिलासा मिळत नाही. या बायपासवर माणसांसोबतच जनावरेही आयआरबीच्या जीवघेण्या खेळाला बळी पडत आहेत.अपघातात म्हैस दगावलीअमरावती बायपास रस्त्यावर २० सप्टेंबरला एका चारचाकी वाहनाच्या धडकेत म्हैस दगावली. यात त्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले.ही म्हैस अचानक रस्त्यावर आल्याने चालकाचा ताबा सुटला .या जोरदार धडकेने त्या म्हशीने तेथेच तडफडत प्राण सोडले. या अपघाताला जबाबदार कोण? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.आयआरबीकडून डोळेडाकराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह आयआरबी या कंपनीने या मार्गावर होणाऱ्या प्राणहानीकडे सोईस्कर दुर्लक्ष चालविले आहे.मोकाट जनावरांमुळे बरेचदा किरकोळ आणि गंभीर अपघात होतात. त्याअनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आयआरबीला विचारणा का केली नाही,असा सवाल मैत्री संघटनेने उपस्थित केला आहे.आयआरबीने रस्त्याच्या दुतर्फा संरक्षण भिंत किंवा कठडे का उभारले नाहीत,असा प्रश्न अमरावतीकरांना पडला आहे.