शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

राष्ट्रीय महामार्गावर अपघातात गारद होताहेत मुकी जनावरे

By admin | Updated: September 29, 2016 00:21 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ असे नामानिधान मिळविणारा अमरावती बायपास रस्ता अलिकडे जीवघणा ठरला आहे.

आयआरबीचा जीवघेणा खेळ : मग टोलवसुली कशासाठी ? संरक्षणात्मक उपाययोजनांची गरज अमरावती : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ असे नामानिधान मिळविणारा अमरावती बायपास रस्ता अलिकडे जीवघणा ठरला आहे.वाहनांच्या अपघातात माणसे मृत्युमुखी पडत असताना मुकी जनावरेही अपघातात गारद होत असल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.बायपास रस्त्यावर जेथे सामान्य जनतेलाच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो,तेथे मुक्या प्राणी अपघातग्रस्त झाल्यास पर्वा कोण करतोय?सुमारे पाच वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आयआरबी या कंपनीशी करार केला. या कंपनीने चौपदरी रस्ते बांधले. रस्ते बांधणीसाठी खर्च केलेला पैसा वसूल करण्यासाठी नागरिकांच्या माथी टोल मारण्यात आला. नांदगाव पेठनजीक टोलनाका उभारून टोलधाड मारण्यात आली. मात्र, टोलच्या स्वरूपात परत मिळणाऱ्या रकमेच्या मोबदल्यात सुविधांशी मात्र फारकत घेण्यात आली. या चौपदरी रस्त्यावर मुकी जनावरे येवू नयेत, त्यांनी रस्त्यांच्या मधोमध येवू नये,यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या आणि व्यापक उंचीच्या कुंपणभिंती उभारणे अनिवार्य आहे. मात्र, या नियमाला आआरबीने हरताळ फासला आहे. अपघात टाळण्यासाठी आयआरबीने कुठल्याही उपाययोजना केल्या नसल्याचे अमरावरीकरांचे निरीक्षण आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचा वेग ताशी १०० ते १२० असा अपघाताला निमंत्रण देणारा असतो. या रस्त्यावरील वाहनांचा राबता पाहता रस्ता बांधणीच्यावेळी प्रधान्याने जनतेच्या संरक्षणार्थ आणि अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करायला हव्या होत्या. मात्र, चिकण्या रस्त्याशिवाय त्याला कुठलाही दिलासा मिळत नाही. या बायपासवर माणसांसोबतच जनावरेही आयआरबीच्या जीवघेण्या खेळाला बळी पडत आहेत.अपघातात म्हैस दगावलीअमरावती बायपास रस्त्यावर २० सप्टेंबरला एका चारचाकी वाहनाच्या धडकेत म्हैस दगावली. यात त्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले.ही म्हैस अचानक रस्त्यावर आल्याने चालकाचा ताबा सुटला .या जोरदार धडकेने त्या म्हशीने तेथेच तडफडत प्राण सोडले. या अपघाताला जबाबदार कोण? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.आयआरबीकडून डोळेडाकराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह आयआरबी या कंपनीने या मार्गावर होणाऱ्या प्राणहानीकडे सोईस्कर दुर्लक्ष चालविले आहे.मोकाट जनावरांमुळे बरेचदा किरकोळ आणि गंभीर अपघात होतात. त्याअनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आयआरबीला विचारणा का केली नाही,असा सवाल मैत्री संघटनेने उपस्थित केला आहे.आयआरबीने रस्त्याच्या दुतर्फा संरक्षण भिंत किंवा कठडे का उभारले नाहीत,असा प्रश्न अमरावतीकरांना पडला आहे.