शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

कडकडीत बंद, हिंसक वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:56 IST

भीमा कोरेगाव येथे सोमवारी घडलेल्या अनुचित घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी विविध आंबेडकरी संघटनांनी पुकारलेला बंद यशस्वी ठरला.

ठळक मुद्दे‘भीमा कोरेगाव’चा आक्रोश : जिल्हा कचेरीवर धडक, इर्विन चौकात ऐक्याचे दर्शन

आॅनलाईन लोकमतअमरावती : भीमा कोरेगाव येथे सोमवारी घडलेल्या अनुचित घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी विविध आंबेडकरी संघटनांनी पुकारलेला बंद यशस्वी ठरला. अमरावती शहराने यानिमित्त अभूतपूर्व कडकडीत बंद अनुभवला. स्थानिक इर्विन चौक, राजकमल चौकात आंबेडकरी समुदाय एकत्रित आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले. यावेळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात होता. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी ही आघाडी सांभाळली.माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्यासह विविध दलित संघटनांनी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध वस्त्यांमधील आंबेडकरी महिला-पुरुष इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सकाळपासूनच एकत्रित आले. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास एका समूहाने येथून राजकमल चौकाकडे कूच केली. हातात पंचशील ध्वज घेऊन, ‘एकच साहेब - बाबासाहेब’ अशा बुलंद घोषणा देत मालवीय चौक, जयस्तंभ चौकमार्गे राजकमल चौक गाठला. दरम्यान, यशोदानगर, फ्रेजरपुरा आदी भागांतूनही आंबेडकरी समुदाय राजकमल चौकात दाखल झाला. यावेळी दोन्ही बाजूंनी आलेल्या आंबेडकरी समुदायाने एकत्रित येऊन राजकमल चौकात दिलेल्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. तेथून या अनुयायांनी रेल्वे स्थानक, बस स्थानक, मालटेकडी, गर्ल्स हायस्कूलमार्गे जिल्हा कचेरीचा मार्ग धरला. मार्गातील त्यांच्या हालचालींची माहिती वायरलेसवरून पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना मिळत होती. त्यांच्यासह अनेक पोलीस अधिकाºयांच्या फौजफाट्याने यापूर्वीच जिल्हा कचेरी परिसराचा बंदोबस्त चोख केला.जिल्हा कचेरी परिसर निर्मनुष्यदंगा नियंत्रण पथक, विशेष फोर्स, वरुण वाहन येथे तैनात होते. जिल्हा कचेरीवर धडकलेल्या तमाम आंबेडकरी जनतेच्यावतीने राज्यपालांच्या नावे भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेचा निषेध करणारे निवेदन अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांना सादर करण्यात आले. रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई, भारिप-बमसंचे गुणवंत देवपारे, रामेश्वर अभ्यंकर, भंते संघरक्षित, भीम आर्मीचे मनीष साठे, बसपाचे सुदाम बोरकर, हिंमत ढोले, अमोल इंगळे, नगरसेविका शोभा शिंदे, नंदेश अंबाडकर, बंटी रामटेके, संजय खडसे, सुधीर तायडे, चरणदास इंगोले, सुनील घटाळे, रंजना इंगळे, रत्ना भोंगाळे, पंकज मेश्राम, सुनील रामटेके, मनोज वानखडे, रमेश आठवले, माया धांदे, कमल कांबळे, जगदीश गोवर्धन, स्वप्निल उके, पी.एस. खडसे, सुनंदा बनसोड, सुनीता नागदिवे आदींनी निवेदन सादर केले. तीन दिवसांत भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींना अटक करा, अन्यथा आंबेडकरी अनुयायी पुन्हा रस्त्यावर येतील, असा इशारा जिल्हा प्रशासनाला देण्यात आला. मार्चेकºयांचे निवेदन स्वीकारण्यासाठी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी आदींनी पुढाकार घेतला. जिल्हा कचेरीतून आंदोलक पुन्हा इर्विन चौकात दाखल झाले. भीमा कोरेगावप्रकरणी आरोपींना कठोर शासन व्हावे, अशी मागणी सुरूच होती. इर्विन चौकात बुधवारी सायंकाळपर्यंत आंबेडकरी समुदायाचे जथ्थेच्या जथ्थे एकत्र येत असल्याचे चित्र दिसून आले.