शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

सीपी साहेब, यांना जरा आवरा !

By admin | Updated: February 4, 2016 00:18 IST

शहरात शहर बसेस व आॅटोरिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाते.

नियमांचे उल्लंघन : सिटी बसेस, आॅटोरिक्षामध्ये क्षमताबाह्य वाहतूक अमरावती : शहरात शहर बसेस व आॅटोरिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाते. आरटीओसह वाहतूक शाखेचे पोलिसही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ‘सीपी साहेब, यांना जरा आवरा’ असा सूर सामान्य नागरिकांमधून उमटत आहेत. शहरात पाच हजारांवर आॅटोरिक्षा धावतात तर एकूण २३ शहर बसेस विविध मार्गांवर प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. शहराच्या लोकसंख्येसोबतच वाहनाची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शहरातील बहुतांश भागात सतत वर्दळ सुरुच असते. यामध्ये मुख्य मार्गावर वाहतुकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. प्रवासी आॅटोरिक्षा व शहर बसेसमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक सुरू असते. ही बाब प्रवाशांसाठी प्राणघातक सिध्द होऊ शकते. वास्तविक आॅटोरिक्षामधून केवळ तीन प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. मात्र, या नियमांच्या चिंधड्या उडवून आॅटारिक्षाचालक पाच-पाच आणि वेळ पडल्यास सात-सात प्रवाशांची वाहतूक करताना दृष्टीस पडतात. प्रवासी दिसताच रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी आॅटोरिक्षाचालक थांबतात. यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण होतो. यातून एखादा भयंकर अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. रस्त्याच्या मध्यभागी आॅटोरिक्षा अचानक प्रवासी घेण्यासाठी थांबल्यास मागून येणाऱ्या वाहनांना खोळंबून राहावे लागते. मग, सगळीच ताटकळणारी वाहने कर्णकर्कश्श हॉर्न वाजवतात. तरीही आॅटोरिक्षाचालक प्रवासी घेतल्याशिवाय वाहन पुढे दामटत नाहीत. विशेष म्हणजे हा सगळा प्रवास वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. आवश्यक असलेला गणवेश आणि बॅच क्रमांकसुध्दा बहुतांश आॅटोरिक्षा चालकांकडे दिसून येत नाही. मात्र, तरीही आॅटोरिक्षाचालकांवर थातूर-मातूर कारवाई केली जात असल्याने यात शासकीय कर्मचाऱ्यांचे हितसंबंध तर गुंतलेले नाहीत ना? असा संशय घेण्यास वाव आहे. हिच गत शहर बसेसची आहे.वाहतूक नियमांचे उल्लंघन करून शहरातील मुख्य चौकांमध्ये थांबून या बसेस प्रवासी घेतात. त्यामुळे मागून येणारी वाहतूक खोळंबते. शहरातील कोणत्याही मार्गावरून ओव्हरफ्लो शहर बसेस आपल्या दृष्टीस पडतात. बसस्थानक चौक, राजकमल चौक, राजापेठ चौक, जयस्तंभ चौक, पंचवटी चौक आदी ठिकाणी आॅटारिक्षा व शहर बसेसचा मनमानी कारभार उघड-उघड सुरू आहे. आॅटोरिक्षा पार्किंग नसल्यामुळे झुंबडशहरात आॅटोरिक्षा पार्किंगची संख्या कमी आहे. त्यामुळे बहुतांश आॅटोरिक्षा चालक एकाच ठिकाणी गर्दी करून असतात. राजकमल चौक, बसस्थानक, राजापेठ येथील चौकात आॅटोरिक्षाची गर्दी अधिक असते. त्यामुळे वाहतूक प्रभावित होते. वायू प्रदूषण वाढले शहरात पाच हजारांवर आॅटोरिक्षा असून ग्रामीण भागातील आॅटोरिक्षा सुध्दा शहरात येत आहेत. त्यातच अनेक कालबाह्य आॅटोरिक्षा सर्रास रस्त्यावर धावत आहे.रॉकेलचा वापरही होत असल्याने शहरात प्रदूषण वाढले आहे. या वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले आहेत.