शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

सीपी साहेब, यांना जरा आवरा !

By admin | Updated: February 4, 2016 00:18 IST

शहरात शहर बसेस व आॅटोरिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाते.

नियमांचे उल्लंघन : सिटी बसेस, आॅटोरिक्षामध्ये क्षमताबाह्य वाहतूक अमरावती : शहरात शहर बसेस व आॅटोरिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाते. आरटीओसह वाहतूक शाखेचे पोलिसही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ‘सीपी साहेब, यांना जरा आवरा’ असा सूर सामान्य नागरिकांमधून उमटत आहेत. शहरात पाच हजारांवर आॅटोरिक्षा धावतात तर एकूण २३ शहर बसेस विविध मार्गांवर प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. शहराच्या लोकसंख्येसोबतच वाहनाची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शहरातील बहुतांश भागात सतत वर्दळ सुरुच असते. यामध्ये मुख्य मार्गावर वाहतुकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. प्रवासी आॅटोरिक्षा व शहर बसेसमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक सुरू असते. ही बाब प्रवाशांसाठी प्राणघातक सिध्द होऊ शकते. वास्तविक आॅटोरिक्षामधून केवळ तीन प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. मात्र, या नियमांच्या चिंधड्या उडवून आॅटारिक्षाचालक पाच-पाच आणि वेळ पडल्यास सात-सात प्रवाशांची वाहतूक करताना दृष्टीस पडतात. प्रवासी दिसताच रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी आॅटोरिक्षाचालक थांबतात. यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण होतो. यातून एखादा भयंकर अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. रस्त्याच्या मध्यभागी आॅटोरिक्षा अचानक प्रवासी घेण्यासाठी थांबल्यास मागून येणाऱ्या वाहनांना खोळंबून राहावे लागते. मग, सगळीच ताटकळणारी वाहने कर्णकर्कश्श हॉर्न वाजवतात. तरीही आॅटोरिक्षाचालक प्रवासी घेतल्याशिवाय वाहन पुढे दामटत नाहीत. विशेष म्हणजे हा सगळा प्रवास वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. आवश्यक असलेला गणवेश आणि बॅच क्रमांकसुध्दा बहुतांश आॅटोरिक्षा चालकांकडे दिसून येत नाही. मात्र, तरीही आॅटोरिक्षाचालकांवर थातूर-मातूर कारवाई केली जात असल्याने यात शासकीय कर्मचाऱ्यांचे हितसंबंध तर गुंतलेले नाहीत ना? असा संशय घेण्यास वाव आहे. हिच गत शहर बसेसची आहे.वाहतूक नियमांचे उल्लंघन करून शहरातील मुख्य चौकांमध्ये थांबून या बसेस प्रवासी घेतात. त्यामुळे मागून येणारी वाहतूक खोळंबते. शहरातील कोणत्याही मार्गावरून ओव्हरफ्लो शहर बसेस आपल्या दृष्टीस पडतात. बसस्थानक चौक, राजकमल चौक, राजापेठ चौक, जयस्तंभ चौक, पंचवटी चौक आदी ठिकाणी आॅटारिक्षा व शहर बसेसचा मनमानी कारभार उघड-उघड सुरू आहे. आॅटोरिक्षा पार्किंग नसल्यामुळे झुंबडशहरात आॅटोरिक्षा पार्किंगची संख्या कमी आहे. त्यामुळे बहुतांश आॅटोरिक्षा चालक एकाच ठिकाणी गर्दी करून असतात. राजकमल चौक, बसस्थानक, राजापेठ येथील चौकात आॅटोरिक्षाची गर्दी अधिक असते. त्यामुळे वाहतूक प्रभावित होते. वायू प्रदूषण वाढले शहरात पाच हजारांवर आॅटोरिक्षा असून ग्रामीण भागातील आॅटोरिक्षा सुध्दा शहरात येत आहेत. त्यातच अनेक कालबाह्य आॅटोरिक्षा सर्रास रस्त्यावर धावत आहे.रॉकेलचा वापरही होत असल्याने शहरात प्रदूषण वाढले आहे. या वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले आहेत.