शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

सीपी साहेब, यांना जरा आवरा !

By admin | Updated: February 4, 2016 00:18 IST

शहरात शहर बसेस व आॅटोरिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाते.

नियमांचे उल्लंघन : सिटी बसेस, आॅटोरिक्षामध्ये क्षमताबाह्य वाहतूक अमरावती : शहरात शहर बसेस व आॅटोरिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाते. आरटीओसह वाहतूक शाखेचे पोलिसही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ‘सीपी साहेब, यांना जरा आवरा’ असा सूर सामान्य नागरिकांमधून उमटत आहेत. शहरात पाच हजारांवर आॅटोरिक्षा धावतात तर एकूण २३ शहर बसेस विविध मार्गांवर प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. शहराच्या लोकसंख्येसोबतच वाहनाची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शहरातील बहुतांश भागात सतत वर्दळ सुरुच असते. यामध्ये मुख्य मार्गावर वाहतुकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. प्रवासी आॅटोरिक्षा व शहर बसेसमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक सुरू असते. ही बाब प्रवाशांसाठी प्राणघातक सिध्द होऊ शकते. वास्तविक आॅटोरिक्षामधून केवळ तीन प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. मात्र, या नियमांच्या चिंधड्या उडवून आॅटारिक्षाचालक पाच-पाच आणि वेळ पडल्यास सात-सात प्रवाशांची वाहतूक करताना दृष्टीस पडतात. प्रवासी दिसताच रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी आॅटोरिक्षाचालक थांबतात. यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण होतो. यातून एखादा भयंकर अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. रस्त्याच्या मध्यभागी आॅटोरिक्षा अचानक प्रवासी घेण्यासाठी थांबल्यास मागून येणाऱ्या वाहनांना खोळंबून राहावे लागते. मग, सगळीच ताटकळणारी वाहने कर्णकर्कश्श हॉर्न वाजवतात. तरीही आॅटोरिक्षाचालक प्रवासी घेतल्याशिवाय वाहन पुढे दामटत नाहीत. विशेष म्हणजे हा सगळा प्रवास वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. आवश्यक असलेला गणवेश आणि बॅच क्रमांकसुध्दा बहुतांश आॅटोरिक्षा चालकांकडे दिसून येत नाही. मात्र, तरीही आॅटोरिक्षाचालकांवर थातूर-मातूर कारवाई केली जात असल्याने यात शासकीय कर्मचाऱ्यांचे हितसंबंध तर गुंतलेले नाहीत ना? असा संशय घेण्यास वाव आहे. हिच गत शहर बसेसची आहे.वाहतूक नियमांचे उल्लंघन करून शहरातील मुख्य चौकांमध्ये थांबून या बसेस प्रवासी घेतात. त्यामुळे मागून येणारी वाहतूक खोळंबते. शहरातील कोणत्याही मार्गावरून ओव्हरफ्लो शहर बसेस आपल्या दृष्टीस पडतात. बसस्थानक चौक, राजकमल चौक, राजापेठ चौक, जयस्तंभ चौक, पंचवटी चौक आदी ठिकाणी आॅटारिक्षा व शहर बसेसचा मनमानी कारभार उघड-उघड सुरू आहे. आॅटोरिक्षा पार्किंग नसल्यामुळे झुंबडशहरात आॅटोरिक्षा पार्किंगची संख्या कमी आहे. त्यामुळे बहुतांश आॅटोरिक्षा चालक एकाच ठिकाणी गर्दी करून असतात. राजकमल चौक, बसस्थानक, राजापेठ येथील चौकात आॅटोरिक्षाची गर्दी अधिक असते. त्यामुळे वाहतूक प्रभावित होते. वायू प्रदूषण वाढले शहरात पाच हजारांवर आॅटोरिक्षा असून ग्रामीण भागातील आॅटोरिक्षा सुध्दा शहरात येत आहेत. त्यातच अनेक कालबाह्य आॅटोरिक्षा सर्रास रस्त्यावर धावत आहे.रॉकेलचा वापरही होत असल्याने शहरात प्रदूषण वाढले आहे. या वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले आहेत.