शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

बकरी ईदसाठी गोवंश हत्या नाही

By admin | Updated: September 23, 2015 00:09 IST

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यामुळे गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बकरी ईद उत्सवात गोवंश हत्या होेणार नाही, असे आदेश गृहविभागाने काढले आहेत.

गृहविभागाचे आदेश: जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सतर्कतेच्या सूचना'अमरावती : राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यामुळे गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बकरी ईद उत्सवात गोवंश हत्या होेणार नाही, असे आदेश गृहविभागाने काढले आहेत. गोवंश हत्या करताना आढळल्यास संबंधितावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस विभागाला दिल्या आहेत.महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ अन्वये ४ मार्च २०१५ पासून राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आहे. गोवंशहत्या, वाहतूक, मांसविक्री, कत्तल, गोवंश खरेदी-विक्री या प्रकारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्याबंदी शिथिल करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. मात्र, एकदा कायदा लागू झाल्यानंतर त्यात बदल किंवा शिथिलता करता येत नसल्याची भूमिका शासनाने घेतली आहे. गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश गृहविभागाने प्रशासनाला दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत येणारे कत्तलखाने, पशुंच्या अवैध हत्या, पशु वाहतुकीवर बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश आहेत. महापालिकेचे सहायक पशू शल्यचिकित्सक सचिन बोंद्रे यांनी बकरी ईदच्या निमित्ताने मांस विक्रेत्यांना नोटीस बजावून कडक सूचना दिल्या आहेत. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या होणार नाही. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन, महापालिका, जिल्हा पशू संवर्धन विभागाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गोवंश हत्या करताना कोणी आढळल्यास कठोर कारवाई होईल.- किरण गित्ते, जिल्हाधिकारीबकरी ईद : शहरात आठ चेकपोस्टअमरावती : बकरी ईद निमित्त शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ८ चेकपोस्ट तयार करण्यात आले असून जनावरांच्या वाहतुकीकडे पोलीस लक्ष केंद्रीत करणार आहेत. पालकमंत्र्यांसोबत शहरातील वाहतुकीचा आढावा घेताना त्यांनी दिलेल्या निर्देशांवर अंमलबजावणी सुरु केल्याची माहिती पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. शहरातील विस्कळीत वाहतुकीसंदर्भात सोमवारी पालकमंत्री प्रवीण पोटे व पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी आढावा घेतला. पालकमंत्र्यांनी दिलेले निर्देश व सूचनांवर अंमलबजावणी करण्यात आली असून हळूहळू वाहतूक सुरळीत होईल, अशी ग्वाही पोलीस आयुक्त व्हटकर यांनी दिली. गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारणे, चौका-चौकात दिशादर्शक फलक लावणे अत्यावश्यक आहे. त्याकरिता पोलीस विभागाकडून महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येईल, असेही पोलीस आयुक्त व्हटकर यांनी सांगितले. सणासुदीच्या पार्श्वभूमिवर शहरात शांतता, सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रयत्नरत असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)