शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

बकरी ईदसाठी गोवंश हत्या नाही

By admin | Updated: September 23, 2015 00:09 IST

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यामुळे गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बकरी ईद उत्सवात गोवंश हत्या होेणार नाही, असे आदेश गृहविभागाने काढले आहेत.

गृहविभागाचे आदेश: जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सतर्कतेच्या सूचना'अमरावती : राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यामुळे गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बकरी ईद उत्सवात गोवंश हत्या होेणार नाही, असे आदेश गृहविभागाने काढले आहेत. गोवंश हत्या करताना आढळल्यास संबंधितावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस विभागाला दिल्या आहेत.महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ अन्वये ४ मार्च २०१५ पासून राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आहे. गोवंशहत्या, वाहतूक, मांसविक्री, कत्तल, गोवंश खरेदी-विक्री या प्रकारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्याबंदी शिथिल करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. मात्र, एकदा कायदा लागू झाल्यानंतर त्यात बदल किंवा शिथिलता करता येत नसल्याची भूमिका शासनाने घेतली आहे. गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश गृहविभागाने प्रशासनाला दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत येणारे कत्तलखाने, पशुंच्या अवैध हत्या, पशु वाहतुकीवर बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश आहेत. महापालिकेचे सहायक पशू शल्यचिकित्सक सचिन बोंद्रे यांनी बकरी ईदच्या निमित्ताने मांस विक्रेत्यांना नोटीस बजावून कडक सूचना दिल्या आहेत. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या होणार नाही. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन, महापालिका, जिल्हा पशू संवर्धन विभागाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गोवंश हत्या करताना कोणी आढळल्यास कठोर कारवाई होईल.- किरण गित्ते, जिल्हाधिकारीबकरी ईद : शहरात आठ चेकपोस्टअमरावती : बकरी ईद निमित्त शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ८ चेकपोस्ट तयार करण्यात आले असून जनावरांच्या वाहतुकीकडे पोलीस लक्ष केंद्रीत करणार आहेत. पालकमंत्र्यांसोबत शहरातील वाहतुकीचा आढावा घेताना त्यांनी दिलेल्या निर्देशांवर अंमलबजावणी सुरु केल्याची माहिती पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. शहरातील विस्कळीत वाहतुकीसंदर्भात सोमवारी पालकमंत्री प्रवीण पोटे व पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी आढावा घेतला. पालकमंत्र्यांनी दिलेले निर्देश व सूचनांवर अंमलबजावणी करण्यात आली असून हळूहळू वाहतूक सुरळीत होईल, अशी ग्वाही पोलीस आयुक्त व्हटकर यांनी दिली. गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारणे, चौका-चौकात दिशादर्शक फलक लावणे अत्यावश्यक आहे. त्याकरिता पोलीस विभागाकडून महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येईल, असेही पोलीस आयुक्त व्हटकर यांनी सांगितले. सणासुदीच्या पार्श्वभूमिवर शहरात शांतता, सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रयत्नरत असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)