शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नगरपरिषद अध्यक्षपदाचा गुंता कायम

By admin | Updated: January 23, 2016 00:41 IST

शेंदूरजनाघाट नगरपरिषदेमध्ये नेहमीच राजकीय हस्तक्षेपामुळे नगराध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे वाद निर्माण झाल्याचा इतिहास आहे.

शेंदूरजनाघाटमध्ये घडामोड : अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला वरूड : शेंदूरजनाघाट नगरपरिषदेमध्ये नेहमीच राजकीय हस्तक्षेपामुळे नगराध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे वाद निर्माण झाल्याचा इतिहास आहे. आता अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतरही नगराध्यक्षांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे तर्क-वितर्क काढण्यात येत आहे.सन २०११ च्या निवडणुकीत विदर्भ जनसंग्रामचे तुल्यबळ वर्चस्व असताना एका नगरसेवकाच्या मदतीशिवाय सत्ता काबीज करणे कठीण होते. परंतु विदर्भ जनसंग्राम, काँग्रेस अशी अभद्र युती होऊन १२ नगरसेवकांवर सत्ता प्राप्त झाली होती. यांनतर अडीच वर्षांचा काळ महिला राखीव असल्याने दावेदारी वाढली होती. हा गुंता सोडविण्याकरिता सव्वा सव्वा वर्षांच्या तडजोडीवर नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. परंतु मतदानात तफावत निर्माण होऊनही विदर्भ जनसंग्रामची महिला अध्यक्ष तर काँग्रेसचा उमेदवार उपाध्यक्षपदावर विराजमान झाला. राजकीय परिस्थिती बदलत जाऊन शब्दावर कायम राहून उपाध्यक्षाने राजीनामा दिला, पद सोडले. मात्र, नगराध्यक्षाने अद्यापही पद सोडले नसल्याने विविध तर्क-वितर्क काढण्यात येत आहे.शेंदूरजनाघाट नगर परिषद ‘क’ वर्गात येते. येथे १७ सदस्यीय नगरपरिषद आहे. सन २०११ मध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. तेव्हा काँग्रेसच्या मदतीने विदर्भ जनसंग्रामची सत्ता आली होती. अडीच वर्षांनंतर अध्यक्ष, उपाध्यक्षपद बदलले तेव्हा मात्र अंतर्गत कलहामुळे विदर्भ जनसंग्रामला एका मताची आवश्यकता भासल्याने अपक्षाच्या मदतीने वर्चस्व कायम राहिले. पक्षीय बलाबल तत्कालीन विदर्भ जनसंग्रामच्या ८, काँग्रेसच्या ४, राष्ट्रवादीच्या ४ आणि एक अपक्ष असे १७ नगरसेवक निवडून आले होते. नगराध्यक्षपदाकरिता ९ सदस्यांची गरज होती. ती पूर्ण करण्याकरिता कुण्या पक्षालाही बहुमत नसल्याने पहिल्यांदा काँग्रेससोबत युती करून ८ अधिक ४ असे १२ नगरसेवक आणि एक अपक्ष अशा १३ नगरसेवकांनी नगराध्यक्षपदाकरिता मतदान केले होते. यामुळेच सुभाष गोरडे अडीच वर्षांकरिता नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. परंतु उपाध्यक्षपदी काँग्रेसचे लिलाधर डोईजोड विराजमान झाले असले तरी यांना केवळ १२ मतेच मिळाल्याने अपक्ष नगरसेवक जयप्रकाश भोंडेकर स्वत: उपाध्यक्षपदाचे उमेदवार होते. यामुळे ेयांनी मतदान केले नव्हते. अडीच वर्षांनंतर नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने जनसंग्रामच्या तीन महिलांनी दावा करून राजकीय कलह निर्माण केला होता. यामध्ये जनसंग्रामच्या नगरसेवकांचे मतदान घेण्यात येऊन सरिता खेरडे यांना पाच तर अर्चना डाहाकेला एक, वैशाली हिवसेला दोन मते पडली होती. पक्षश्रेष्ठी आ. अनिल बोंडे यांनी सरिता खेरडे यांना सव्वा वर्षांच्या काळाकरिता तडजोडीने नगराध्यक्षपदाची उमेदवार म्हणून घोषित केले. उपाध्यक्षपदाचा यापेक्षाही वाद निर्माण झाला होता. जनसंग्रामसोबत काँग्रेसचे अडीच वर्षे लिलाधर डोईजोड तर अडीच वर्षे देवानंद जोगेकर होते. मात्र नंतरच्या अडीच वर्षांकरिता काँग्रेसच्या नगरसेवकांनी देवानंद जोगेकर यांच्या नावाला विरोध केल्याने राजकीय पेच निर्माण झाला होता. परंतु जनसंग्रामने दिलेला शब्द पाळण्याकरिता देवानंद जोगेकर यांच्या पाठीशी उभे राहून उपाध्यक्षपदी निवड करण्याचे ठरविले. जनसंग्रामसोबत ८ अधिक एक असे नऊ होत असताना अपक्ष नगरसेवकांची मदत घेऊन १० चा आकडा पार केला व बहुमतात उपाध्यक्षपद मिळविले. यातसुध्दा तत्कालीन उपाध्यक्ष देवानंद जोगेकर यांनी विद्यमान उपाध्यक्ष जयप्रकाश भोंडेकर यांच्यासोबत सव्वा वर्षाची तडाजोड केली. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक जोगेकर यांच्यासोबत राहिले असते तर काँग्रेसचे नगरसेवक देवानंद जोगेकर यांना अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला असता. तडजोडीने जोगेकर यांनी सव्वा वर्षानंतर राजीनामा देवून जयप्रकाश भोंडेकर यांच्याकरिता पद रिक्त केले. (तालुका प्रतिनिधी)