शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कापूस उत्पादनात २५ टक्के घट !

By admin | Updated: August 25, 2014 23:41 IST

पावसाअभावी खुंटलेली वाढ व रोगट हवामानामुळे उभे ठाकलेले रोग व किडीचे संकट लक्षात घेता कपाशीपासून आगामी काळात चांगले उत्पादन मिळण्याची आशा आतापासूनच धुसर झाल्याने शेतकऱ्यांच्या

अमरावती : पावसाअभावी खुंटलेली वाढ व रोगट हवामानामुळे उभे ठाकलेले रोग व किडीचे संकट लक्षात घेता कपाशीपासून आगामी काळात चांगले उत्पादन मिळण्याची आशा आतापासूनच धुसर झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. दरम्यान प्रतिकूल परिस्थितीमुळे कापूस उत्पादनात सुमारे २५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संरक्षित पाण्याची सोय असलेल्या जवळपास १० ते १५ टक्के शेतकरी मे महिन्यातच पूर्व हंगामी कपाशीची लागवड करतात. मागील वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने विदर्भातील शेतकऱ्यांनी यंदाही विहीरी व ट्यूबवेलच्या पाण्यावर पूर्व हंगामी कपाशीची लागवड केली. त्यातुलनेत दुुष्काळाचा सामना करणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड कमी प्रमाणात केलेली आहे. सद्या जिरायती कपाशी लागवडीला बऱ्यापैकी चालना मिळाली असली तरीही विदर्भात उशिरापर्यंत ३१ जुलै पर्यंत कपाशीची लागवड केल्या जाते. पावसाअभावी यंदा बऱ्याच भागात कपाशीची लागवड होऊ शकली नाही. काही भागात कपाशीची लागवड झाली असून कोवळे पीक कोमजून गेले. अशा विपरित परिस्थितीत कपाशीने सरासरी क्षेत्र गाठत सुमारे ३१ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे.पूर्व हंगामी कपाशीकडे चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेने पाहिले जाते. प्रत्यक्षात मर रोगाचा प्रादुर्भाव, रोगट हवामानामुळे पांढरी माशी व रस शोषणाऱ्या किडीने घातलेल्या थैमानामुळे पूर्व हंगामी कपाशीपासून पहिल्या टप्प्यात अपेक्षित उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता बळावली आहे. महागडी औषधे फवारणी करुन ही कीड व रोग नियंत्रणात येत नसल्याचा शेतकऱ्यांना अनुभव आहे. उशिरा लागवड झाल्यामुळे चांगल्या पावसाची नक्षत्रे उलटून गेल्यानंतरही जिरायती पिकांची वाढ झाली नाही. आता पिकांची वाढ होण्याची शक्यता नाही. काहीत वाढ झाली नसताना जिरायती कपाशीपासून एकरी २ क्ंिवटलही कापूस मिळतो की नाही याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात शंका उपस्थित होत आहे.