शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यात परप्रांतांतील कापूस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

स्थानिक शेतकऱ्याच्या सातबारावर परप्रांतातील कापूस मोजला जात आहे. या शासकीय कापूस खरेदीचा फायदा सर्वसामान्य कापूसउत्पादक शेतकऱ्याला कमी आणि व्यापाऱ्यालाच अधिक होत आहेत. अचलपूरसह चांदूर बाजार व लगतच्या तालुक्यातील, उत्पादकता बघता वाढलेली आवक कृत्रिम असून, परप्रांतातील कापसामुळे गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढीवर आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांच्या गाड्या अधिक : आवक वाढली, खरेदी थांबली

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : कापसाचे परप्रांतातील दर महाराष्ट्रातील शासकीय कापूस खरेदी केंद्रांपेक्षा कमी असल्यामुळे आंध्र प्रदेशसह लगतच्या प्रांतांतील कापूस मोठ्या प्रमाणात परतवाडा, अंजनगाव येथे दाखल होत आहे. परप्रांतातील कापसाचे हे ट्रकचे ट्रक शहरात रिते केले जात आहेत. स्थानिक कापसात पाला करू न (मिसळून) गाडी भरताना विशेष दक्षता घेत, हा कापूस शासकीय खरेदी केंद्रावर पाठवला जात असल्याची माहिती आहे.स्थानिक शेतकऱ्याच्या सातबारावर परप्रांतातील कापूस मोजला जात आहे. या शासकीय कापूस खरेदीचा फायदा सर्वसामान्य कापूसउत्पादक शेतकऱ्याला कमी आणि व्यापाऱ्यालाच अधिक होत आहेत. अचलपूरसह चांदूर बाजार व लगतच्या तालुक्यातील, उत्पादकता बघता वाढलेली आवक कृत्रिम असून, परप्रांतातील कापसामुळे गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढीवर आहे.गावखेड्यात शेतकऱ्यानी यापूर्वीच आपला कापूस कमी भावात गावातून जागी मोजून दिला. हा गावखेड्यात जाऊन व्यापाऱ्यानी घेतलेला कापूस परप्रांतातील कापसासोबत मिसळविल्या जात आहे. अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीत कापूस भरलेल्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. दररोज शंभर ते दोनशे गाड्यांहून अधिक गाड्या बाजार समितीच्या आवारात येत आहेत. अचलपूर-परतवाडा येथील शासकीय कापूस खरेदी केंद्रावर आतापर्यंत ४० हजार क्विंटल कापूस खरेदी केला गेला. लक्ष्मी आणि संतोष कॉटन इंडस्ट्रीजवळ हा कापूस मोजून घेण्यात आला. चांदूर बाजारला शासकीय खरेदी केंद्र नसल्यामुळे, जे केंद्र जवळ पडेल तेथे त्यांना कापूस नेण्याची मुभा देण्यात आली आहे.अचलपूरमध्ये डिसेंबर मध्ये केवळ ३ हजार ८०० क्विंटल कापसाची खरेदी होती, ती आज ४० हजार क्विंटल पर्यंत पोहोचली आहे. लगतच्या अंजनगावात ७० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.दोनवेळा खरेदी थांबविलीअचलपूर येथे ढगाळ वातावरणामुळे फेब्रुवारीमध्ये, तर जागेअभावी मार्चमध्ये शासकीय कापूस खरेदी थांबविण्यात आली आहे. आठ-दहा बैलगाड्या सोडल्या, तर कापूस बहुतांश वाहनातून दाखल झाला. मार्चमध्ये कापूस खरेदी थांबविल्यानंतर बाजार समितीच्या आवारात उभ्या कापसाच्या वाहनांचे पंचनामे करून ते मोजन घेतल्याची माहिती आहे.शासकीय खरेदी केंद्रावर दाखल कापूस परप्रांतातील नाही. आंध्रप्रदेशातील कापूस परतवाड्यात येत असला तरी तो शासकीय खरेदी केंद्रावर मोजण्यात आलेला नाही. निर्धारित आर्द्रता असलेला कापूसच प्रतवारीनुसार मोजून घेतला जात आहे.-विनोद देशमुख, ग्रेडर तथा केंद्र प्रमुख, अचलपूर

टॅग्स :agricultureशेती