शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कापूस ‘सेस’ वसुलीत लाखोंचा फटका

By admin | Updated: April 20, 2016 00:19 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाच्या रक्कमेवर नव्हे तर गोणी (बोंद्री)वर ‘सेस’ आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमरावती बाजार समिती : व्यापाऱ्यांसोबत हातमिळवणीचा आरोेपअमरावती : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाच्या रक्कमेवर नव्हे तर गोणी (बोंद्री)वर ‘सेस’ आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कापसापासून वर्षाकाठी मिळणाऱ्या लाखोंच्या ‘सेस’ला मुकावे लागत आहे. हा एकप्रकारे बाजार समितीच्या आर्थिक स्त्रोतावरच घाला असून संचालक मंडळ शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचे हित जोपासत असल्याचे चित्र आहे. राज्य शासनाच्या सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभागाच्या अधिसूचनेनुसार कापूस खरेदी योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितींना कापूस खरेदीसाठी बाजारशुल्क ठरवून देण्यात आले आहे. १०० रुपयांमागे किमान ५० पैसे तर कमाल १ रुपये या मर्यादेत शुल्क आकारणी करणे ही शासन नियमावली आहे. मात्र, बाजार समितीच्या संचालक मंडळाने १५ नोव्हेंबर २०१५ रोजी घेतलेल्या कापूस सभेत शेतकऱ्यांचे हित न जोपासता कापूस व्यापाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला. बाजार समितीत कापूस प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांनुसार खरेदी केला जात असताना कापसाच्या गोणीवर ‘सेस’ आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. संचालक मंडळांना कापूस व्यापाऱ्यांचा एवढा पुळका का, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. कापसाच्या रक्कमेवर आकारल्या जाणाऱ्या ‘सेस’च्या माध्यमातून वर्षभरात लाखो रुपये गोळा होणे अपेक्षित होते. मात्र, तुरळक रक्कम गोळा झाल्याची माहिती आहे. बाजार समिती सभापती, उपसभापतींसह संचालक मंडळाने नियम गुंडाळून कापसाच्या गोणीवर ‘सेस’ आकारण्याचा प्रकार केला आहे. १६ नोव्हेंबर २०१५ रोजी झालेल्या कापूससभेत १८ पैकी किमान १० संचालकांची उपस्थिती अपेक्षित असताना केवळ ८ संचालकांच्या उपस्थितीत कापसाच्या गोणीवर ‘सेस’ आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम ३१ (१) अन्वये शेतमालावर ‘सेस’ आकारता येतो. पंरतु शेतमालाच्या प्रक्रियेवर ‘सेस’ आकारता येत नाही. असे असतानासुध्दा बाजार समितीने कापसाच्या गाठींवर ‘सेस’ आकारला आहे. त्याकरिता बाजार समितीने उपविधीत बदल मात्र केला नाही. बाजार समितीचा कारभार चालविताना शासनाद्वारे निर्धारित नियमांचे उल्लंघन होत आहे. याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा बाजार समितीचे वाटोळे होण्यास अवधी लागणार नाही, अशी सहकार क्षेत्रात चर्चा आहे.