शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

कोरोनात ‘लिची’ची आंबट-गोड चव हरपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:13 IST

लॉकडाऊनचा फटका, ग्राहक मिळेना, थोक फळ विक्रेते हैराण अमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात फळ बाजाराचे आर्कषण ठरणाऱ्या बिहारच्या दुआबात परिसरात ...

लॉकडाऊनचा फटका, ग्राहक मिळेना, थोक फळ विक्रेते हैराण

अमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात फळ बाजाराचे आर्कषण ठरणाऱ्या बिहारच्या दुआबात परिसरात उत्पादित होणाऱ्या लिचीला यंदा ग्राहक मिळत नसल्याचे वास्तव आहे. उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी लिची उपयुक्त ठरत असली तरी हल्ली लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहे. परिणामी विक्रीसाठी आणल्या गेलेल्या लिचीला ग्राहकांची प्रतीक्षा आहे.

उन्हाळ्यात फळबाजारात आंबा विक्रीचा माेसम असतो. उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी नागरिक विविध प्रकारची फळे खाणे अथवा ज्युस घेण्यास पसंती दर्शवितात. अशातच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ३० मेपर्यंत कठोर संचारबंदी लागू केली आहे. अशातच मुस्लिम बांधवांचा रमजान महिना संपला असून, शुक्रवारी ईद साजरी केली जाणार आहे. मात्र, रमजान महिना कॅश करण्यासाठी फळविक्रेत्यांनी बिहार येथील लिची मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणली. तथापि, गल्लीबोळात

अथवा रस्त्यालगत लागणाऱ्या फळविक्रीच्या हातगाड्या बंद आहेत. त्यामुळे ग्राहकांपर्यंत फळे पोहोचत नाहीत. त्यामुळेच अनेकांच्या पसंतीला असलेल्या लिचीची आंबट - गोड चव घेता येत नाही. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, ईतवारा बाजार, मध्यवर्ती बस स्थानक परिसरासह ग्रामीण भागातही थोक फळ विक्रेत्यांना घाऊक विक्रेत्यांपर्यंत लिची पोहोचविता येत नाही. थोकमध्ये लिची प्रतिकिलो २०० रुपये दराने विकली जात आहे, तर घाऊकमध्ये २५० दर असल्याची माहिती आहे.

---------------------

बिहारच्या दुआबात, मुज्जफरपूर येथे उत्पादित होऊन ती देशभरात उन्हाळ्यातच विक्रीसाठी पाठविली जाते. विशेषत: एप्रिल, मे महिन्यात विक्रीसाठी आणली जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे लिची ग्राहकांपर्यंत पाेहोचली नाही. लिची नाशिवंत असल्याने खराब झाल्याने फेकण्यात आली. थोक फळ विक्रेत्यांचे नुकसान झाले आहे.

-राजा मोटवानी, थोक फळ विक्रेता, अमरावती.

----------------

रमजान महिन्यात उपवासात लिची वापरली जाते. मात्र, यंदा रमजान महिन्यात फळ विक्रीची दुकाने बंद होती. त्यामुळे जी फळे उपलब्ध झाली ते खावी लागली. लिची वेळेवर मिळाली नाही. उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी लिची हे फार उपयुक्त ठरते.

- अब्दुल रफिक, ग्राहक, अमरावती.