शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे आठ मृत्यू, ७५४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:16 IST

अमरावती : कोरोना संसर्गाने शुक्रवारी आठ जणांचा मृत्यू झाला, तर ७५४ पॉझिटिव्ह आढळून आले. १९८३ नमुन्यांच्या तपासणीतून हा आकडा ...

अमरावती : कोरोना संसर्गाने शुक्रवारी आठ जणांचा मृत्यू झाला, तर ७५४ पॉझिटिव्ह आढळून आले. १९८३ नमुन्यांच्या तपासणीतून हा आकडा पुढे आला आहे. जिल्ह्यात आता संक्रमितांची संख्या एकूण ३३ हजार ५८५ इतकी झाली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात होत असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

जिल्ह्यात कोरोना उद्रेक लक्षात घेता, त्यावर नियंत्रणासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह एकूणच यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असताना संक्रमितांची संख्या लक्षणीय ठरत आहे. कोरोना नियमांचे पालन होण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गत २४ तासांत कोरोनाने आठ बाधितांचा मृत्यू झाला. यात स्वस्तिकनगरातील ७० वर्षीय पुरुष, विलासगनरातील ५७ वर्षीय पुरुष, बेलपुऱ्यातील ६० वर्षीय पुरुष, दर्यापूर येथील ६३ वर्षीय पुरुष, महाजनपुऱ्यातील ६० वर्षीय पुरुष, द्वारकानगर (परतवाडा) येथील ५३ वर्षीय महिला, अमरावती येथील राष्ट्रसंत कॉलनी येथील २८ वर्षीय पुरुष व गजानननगर येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. एकंदरीत सात पुरुष आणि एक महिलेचा कोरोनाने बळी घेतला. आतापर्यंत ४९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शुक्रवारी एकूण ७५४ पॉझिटिव्ह आढळून आले असून, ५९४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गृह विलगीकरणात महापालिका क्षेत्रात २३५७, तर ग्रामीण भागात ११२६ रुग्ण आहेत. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ४७३२ इतकी आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने रिकव्हरी रेट ८४.४४ टक्के एवढा खालावला आहे. डब्लिंग रेट १०५ दिवसांवर आला आहे. मृत्युदर १.४७ टक्के आहे. एकूण २ लाख २० हजार ४८९ नमुने चाचणी झाली आहेत.