शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

कोरोनाचे आठ मृत्यू, ७५४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:16 IST

अमरावती : कोरोना संसर्गाने शुक्रवारी आठ जणांचा मृत्यू झाला, तर ७५४ पॉझिटिव्ह आढळून आले. १९८३ नमुन्यांच्या तपासणीतून हा आकडा ...

अमरावती : कोरोना संसर्गाने शुक्रवारी आठ जणांचा मृत्यू झाला, तर ७५४ पॉझिटिव्ह आढळून आले. १९८३ नमुन्यांच्या तपासणीतून हा आकडा पुढे आला आहे. जिल्ह्यात आता संक्रमितांची संख्या एकूण ३३ हजार ५८५ इतकी झाली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात होत असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

जिल्ह्यात कोरोना उद्रेक लक्षात घेता, त्यावर नियंत्रणासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह एकूणच यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असताना संक्रमितांची संख्या लक्षणीय ठरत आहे. कोरोना नियमांचे पालन होण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गत २४ तासांत कोरोनाने आठ बाधितांचा मृत्यू झाला. यात स्वस्तिकनगरातील ७० वर्षीय पुरुष, विलासगनरातील ५७ वर्षीय पुरुष, बेलपुऱ्यातील ६० वर्षीय पुरुष, दर्यापूर येथील ६३ वर्षीय पुरुष, महाजनपुऱ्यातील ६० वर्षीय पुरुष, द्वारकानगर (परतवाडा) येथील ५३ वर्षीय महिला, अमरावती येथील राष्ट्रसंत कॉलनी येथील २८ वर्षीय पुरुष व गजानननगर येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. एकंदरीत सात पुरुष आणि एक महिलेचा कोरोनाने बळी घेतला. आतापर्यंत ४९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शुक्रवारी एकूण ७५४ पॉझिटिव्ह आढळून आले असून, ५९४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गृह विलगीकरणात महापालिका क्षेत्रात २३५७, तर ग्रामीण भागात ११२६ रुग्ण आहेत. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ४७३२ इतकी आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने रिकव्हरी रेट ८४.४४ टक्के एवढा खालावला आहे. डब्लिंग रेट १०५ दिवसांवर आला आहे. मृत्युदर १.४७ टक्के आहे. एकूण २ लाख २० हजार ४८९ नमुने चाचणी झाली आहेत.