शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सर्व आस्थापनांच्या कर्मचा-यांची कोरोना चाचणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:08 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाची पूर्ववत परिस्थिती निर्माण होऊन पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय प्रशासनाला पर्याय राहणार नाही. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना आणखी ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाची पूर्ववत परिस्थिती निर्माण होऊन पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय प्रशासनाला पर्याय राहणार नाही. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना आणखी कठोर होऊ नये, यासाठी सर्व नागरिकांनी ‘कोविड आप्रोप्रिएट बिहेविअर’चे काटेकोर पालन करावे व सर्व आस्थापनांनी त्यांच्या सर्व कर्मचा-यांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी रात्री उशिरा दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात जिल्ह्यातील सर्व व्यापारी अशोसिएशन, ऑटोचालक, दुकाने, हॉकर्स, खासगी वाहतूक संघटनांच्या पदाधिका-यांची बैठकीत प्रतिबंधात्मक आदेशासंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, मनपा उपायुक्त रवि पवार यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

लक्षणे नसलेल्या व गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींकडून अनेकदा नियम पाळले जात नाहीत. अशांकडून संक्रमणाचा धोका वाढतो. त्यामुळे त्यांच्यावर कडक दंडात्मक कार्यवाही व्हावी. या व्यक्तींशी संबंधित यंत्रणेने नियमित संपर्क ठेवावा. त्यांच्यावर घरावर ठळक अक्षरात फलक लावून कुटूंबातील सर्व सदस्यांची तत्काळ कोरोना चाचणीसाठी तजवीज करावी. गृह विलगीकरणाचे नियम न पाळणाºयांकडून बंधपत्र लिहून घ्यावे. एवढे केल्यावर ऐकून न घेता उल्लंघन करतांना दुस-यांदा आढळून आल्यास त्याच्याकडून २५ हजार दंड वसूल करण्यात येईल. तसेच संबंधिताच्या मालमत्ता करमध्ये दंड नमूद केल्या जावून वसूल केल्या जाईल. त्याचे काटेकोर पालन होत नसल्यास किंवा संबंधितांनी यासाठी नकार दिल्यास त्यांना कोविड सेंटरला भरती करावे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

बॉक्स

जोखमीच्या क्षेत्रांत चाचण्या अन् सर्वेक्षण

केंद्रीय पथकाने बुधवारी भेट दिली व काही जोखमीची क्षेत्रे आढळून आल्याचे निरीक्षण नोंदविले. त्यांच्या सूचनेनुसार अशा परिसरात रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांचे प्रमाण वाढविणे व गृहभेटींतून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मास्क, सोशल डिस्टन्स व स्वच्छतेचे नियम न पाळणाºयांवर दंडात्मक कार्यवाहीसाठी पथके गठित करण्यात आली आहेत.

बॉक्स

दोन-तीन दिवसांत पुणे लॅबचा अहवाल

हवामान बदल, वाढती थंडी यामुळे रुग्ण संख्या वाढीचे कारण सांगितले जाते. संसर्ग हा एकदुस-यापुरता मर्यादित न राहता अख्खे कुटुंब संक्रमित झाल्याचेही दिसून येत आहे. विषाणूच्या संसर्गक्षमतेत वाढ आदी शास्त्रीय कारणे जाणून घेण्यासाठी काही नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल दोन- तीन दिवसांत प्राप्त होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.