शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

सर्व आस्थापनांच्या कर्मचा-यांची कोरोना चाचणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:08 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाची पूर्ववत परिस्थिती निर्माण होऊन पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय प्रशासनाला पर्याय राहणार नाही. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना आणखी ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाची पूर्ववत परिस्थिती निर्माण होऊन पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय प्रशासनाला पर्याय राहणार नाही. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना आणखी कठोर होऊ नये, यासाठी सर्व नागरिकांनी ‘कोविड आप्रोप्रिएट बिहेविअर’चे काटेकोर पालन करावे व सर्व आस्थापनांनी त्यांच्या सर्व कर्मचा-यांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी रात्री उशिरा दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात जिल्ह्यातील सर्व व्यापारी अशोसिएशन, ऑटोचालक, दुकाने, हॉकर्स, खासगी वाहतूक संघटनांच्या पदाधिका-यांची बैठकीत प्रतिबंधात्मक आदेशासंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, मनपा उपायुक्त रवि पवार यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

लक्षणे नसलेल्या व गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींकडून अनेकदा नियम पाळले जात नाहीत. अशांकडून संक्रमणाचा धोका वाढतो. त्यामुळे त्यांच्यावर कडक दंडात्मक कार्यवाही व्हावी. या व्यक्तींशी संबंधित यंत्रणेने नियमित संपर्क ठेवावा. त्यांच्यावर घरावर ठळक अक्षरात फलक लावून कुटूंबातील सर्व सदस्यांची तत्काळ कोरोना चाचणीसाठी तजवीज करावी. गृह विलगीकरणाचे नियम न पाळणाºयांकडून बंधपत्र लिहून घ्यावे. एवढे केल्यावर ऐकून न घेता उल्लंघन करतांना दुस-यांदा आढळून आल्यास त्याच्याकडून २५ हजार दंड वसूल करण्यात येईल. तसेच संबंधिताच्या मालमत्ता करमध्ये दंड नमूद केल्या जावून वसूल केल्या जाईल. त्याचे काटेकोर पालन होत नसल्यास किंवा संबंधितांनी यासाठी नकार दिल्यास त्यांना कोविड सेंटरला भरती करावे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

बॉक्स

जोखमीच्या क्षेत्रांत चाचण्या अन् सर्वेक्षण

केंद्रीय पथकाने बुधवारी भेट दिली व काही जोखमीची क्षेत्रे आढळून आल्याचे निरीक्षण नोंदविले. त्यांच्या सूचनेनुसार अशा परिसरात रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांचे प्रमाण वाढविणे व गृहभेटींतून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मास्क, सोशल डिस्टन्स व स्वच्छतेचे नियम न पाळणाºयांवर दंडात्मक कार्यवाहीसाठी पथके गठित करण्यात आली आहेत.

बॉक्स

दोन-तीन दिवसांत पुणे लॅबचा अहवाल

हवामान बदल, वाढती थंडी यामुळे रुग्ण संख्या वाढीचे कारण सांगितले जाते. संसर्ग हा एकदुस-यापुरता मर्यादित न राहता अख्खे कुटुंब संक्रमित झाल्याचेही दिसून येत आहे. विषाणूच्या संसर्गक्षमतेत वाढ आदी शास्त्रीय कारणे जाणून घेण्यासाठी काही नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल दोन- तीन दिवसांत प्राप्त होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.