शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

९,२१८ शिक्षकांची २३ जानेवारीपासून कोरोना टेस्ट, तीन टप्प्यांत नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:14 IST

पाचवी ते आठवी दरम्यानच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू, कोरोना नियमावलींचे पालन अमरावती : शालेय शिक्षण विभागाने आता २७ जानेवारी ...

पाचवी ते आठवी दरम्यानच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू, कोरोना नियमावलींचे पालन

अमरावती : शालेय शिक्षण विभागाने आता २७ जानेवारी २०२१ पासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा परिषद, महापालिका शिक्षण विभागातील यंत्रणेने नियाेजनास सुरुवात केली आहे. शाळा सुरू होण्याच्या तीन दिवसांपूर्वी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होणार असून, तीन टप्प्यांत नियोजन करण्यात येणार आहे.

नववी ते बारावीपर्यंतचे अध्यापन २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. शाळांमध्ये संख्या कमी असली तरी कोरोना नियमावलींचे पालन करुन नियमितपणे शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी काळजी म्हणून सर्व वर्गखोल्या, शाळा परिसरात जंतुनाशक फवारणी करून घेण्यात आली होती तसेच शिक्षकांची तालुकास्तरावर आरोग्य विभागामार्फत कोरोना चाचणी करण्यात आली हाेती. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, यासाठी पालकांकडून संमतिपत्र भरून घेण्यात आले होते. शाळा सुरू करण्यासाठी संस्थेची परवानगी घेण्यात आली होती. हीच प्रक्रिया ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग राबविणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली.

-----------------------------

जिल्ह्यातील शाळांची संख्या

पाचवी ---------------

सहावी --------------------

सातवी ------------------

आठवी -----------------

--------------------

विद्यार्थी संख्या ---- १,५७,०२२

जिल्ह्यातील शिक्षक संख्या---९,२१८

-----------------

आरोग्य विभागाला कोरोना चाचणीसाठी देणार पत्र

पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. त्याअनुषंगाने शिक्षकांची कोरोना चाचणी करून घ्यावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाकडून आरोग्य यंत्रणेला त्यासंबंधी पत्र दिले जाणार आहे. २३ ते २६ जानेवारी यादरम्यान तीन टप्प्यांत शिक्षकांची कोरोना चाचणीचे नियोजन करण्यात येणार आहे.

--------------

‘‘ शासन परिपत्रकानुसार कोरोना नियमावलींचे पालन करून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्येक शिक्षकाची कोरोना चाचणी केली जाईल. त्यांना अहवालानुसार कर्तव्य बजावावे लागणार आहे. पालकांच्या संमतिपत्राशिवाय मुलांना शाळांत प्रवेश दिला जाणार नाही.

- प्रिया देशमुख, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), अमरावती.