शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

कोरोनामुळे उघडले डोळे; शहरात वाढली रुग्णालये, सुविधाही वाढल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:11 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ माघारत असला तरी दुसऱ्या लाटेने जिल्हा व आरोग्य यंत्रणेच्या तोंडचे पाणी पळविले होते. या ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ माघारत असला तरी दुसऱ्या लाटेने जिल्हा व आरोग्य यंत्रणेच्या तोंडचे पाणी पळविले होते. या निमित्ताने जिल्ह्यातील आरोग्य सुविधेत मात्र, चांगलीच भर पडली आहे. याचा भविष्यात सर्वांनाच लाभ होणार आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ४ एप्रिलला निष्पन्न झाला. त्यानंतर कोरोना संसर्गाचा ग्राफ वाढीस लागला. पहिला रुग्ण ४ एप्रिल रोजी नोंद झाल्यानंतर संसर्ग वाढायला लागला. पहिली लाट ऑगस्ट ते सप्टेंबर २०२० पर्यंत राहिली. दरम्यान जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या उपचाराबाबत सुविधा वाढविण्यात आल्या. त्यानंतर दुसऱ्या लाटेचे नियोजन करताना डिसेंबरपासून प्रत्येक सुविधेत वाढ करण्यात आली आहे. कोरोनात्या गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड, आसीयू, व व्हेंटिलेटर महत्त्वाचे आहे.

जिल्ह्यात शासकीय व खासगी अशा दोन्ही प्रकारातील रुग्णालयात सद्यस्थितीत १,१५० ऑक्सिजन बेडची सुविधा आहे. याशिवाय जिल्हा कोविड रुग्णालय, डाॅ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व दयासागर रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती होत असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

बॉक्स

मार्चपासून वाढले ग्रामीण भागात रुग्ण

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे वर्षभरात महापालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्तांची नोंद जास्त होती. मात्र, मार्च २०२१ नंतर शहरात संक्रमितांची संख्या माघारली व ग्रामीणमध्ये वाढली. यात अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, मोर्शी, वरूड, धारणी आदी तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट बनले. या तालुकालगतच्या अन्य जिल्ह्यात कोरोनाचा ब्लास्ट झाला व कोरोनाच्या नव्या मुटेशनचा जिल्ह्यात शिरकाव झाला. याशिवाय जिल्हा सीमेलगतच्या मध्यप्रदेशातूनही उपचारार्थ रुग्ण जिल्ह्यात आल्यानेही जिल्ह्यातील संसर्ग वाढल्याचे सांगण्यात आले.

बॉक्स

वरूड तालुक्यात सर्वाधिक ८,१८२ रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९५,९८४ आहेत. यात ग्रामीणमध्ये ५१,२५० संक्रमितांची नोंद झालेली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या माहितीनुसार अमरावती तालुक्यात २,६८०, भातकुली १,७०३, मोर्शी ४,३८३, अंजनगाव सुर्जी ४,११५, अचलपूर ७,७५२, चांदूर रेल्वे २,७०४, चांदूर बाजार ३६४८, चिखलदरा १,७७३, धारणी २,५१९, दर्यापूर ३,०२६, धामणगाव रेल्वे ३,०८२१, तिवसा ३,१९२ व नांदगाव खंडेश्वर २,५०० रुग्णांची नोंद आाहे.

कोट

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा तयार करण्यात आल्या. आता संसर्ग जरी कमी झाला तरी भविष्यात त्या कामात येणार आहे. यात ऑक्सिजन बेड, प्लांट, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, मुलांसठी बेड, टेस्टिंग वाढविण्यात आलेल्या आहेत. याशिवाय लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे.

- शैलेश नवाल,

जिल्हाधिकारी

पाईटर

कोरोना आधी व नंतर

सरकारी रुग्णालये कोविड सेंटर

१५ १७

खासगी रुग्णालये, कोविड सेंटर

१९ ४७

ऑक्सिजन निर्मिती प्लांट

२ १६

आयसीयू बेडची संख्या

१८० ४६६

व्हेंटिलेटर

३५