शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:10 IST

पान २ ची लिड फोटो पी २७ धामणगाव फोल्डर धामणगाव रेल्वे येथील घटना : संसर्ग वाढताच मोहन राऊत धामणगाव ...

पान २ ची लिड

फोटो पी २७ धामणगाव फोल्डर

धामणगाव रेल्वे येथील घटना : संसर्ग वाढताच

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे : तेरा दिवसांपूर्वी वडील तर मायलेक केवळ सहा तासाच्या अंतरात कोरोनाच्या नियतीने हिरावून घेतले. दरम्यान तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रकोप आताही कायम असल्याने सर्वांनी सतर्क राहण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.

धामणगाव शहरातील रहिवासी प्रगतशील शेतकरी असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने बळी घेतला. वडिलांचा तेरा दिवसांपूर्वी तर आई आणि मुलाचा एकाच दिवशी बुधवारी यवतमाळ येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला. विजय देशमुख, ----------------देशमुख व ---------------- देशमुख अशी मृतांची नावे आहेत. अख्खे देशमुख कुटुंबच कोरोनाचे बळी ठरले आहेत.

गत आठवड्यात सोनेगाव खर्डा येथील दोन चुलत भावांपैकी एकाचा नागपूर तर दुसऱ्याचा अमरावती येथे एकाच दिवशी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तालुक्यातील दहा कोरोना रुग्ण अमरावती, नागपूर, यवतमाळ येथील खासगी व सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

धामणगाव तालुक्यातील ५८ गावात कोरोनाचा शिरकाव

शहर व तालुक्यातील २ हजार ३६३ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली. यात ५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या तालुक्यात २५५ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. या कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असला तरी आकडेवारी कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. मागील १४ दिवस जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या कडक निर्बंधाचे पालन ग्रामीण भागात पाहिजे त्या प्रमाणात झाले नसल्याने काही गावात आजही कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही.

कोरोनाला सहज घेणे बेततेय जीवावर

मागील १५ दिवसांत कोरोना रुग्णाचा चढता आलेख, यात १५ वर्ष आतील रुग्णात होणारी झपाट्याने वाढ, सोबतच मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने कोरोना आजाराला सहज घेणे जीवावर बेतत आहे. प्रत्येक ग्रामस्थांनी घराबाहेर येऊन चाचण्या करून घ्याव्यात, यासाठी येथील तहसीलदार गौरवकुमार भळगाठींया हे घरोघरी जाऊन तपासणीसाठी आग्रह करीत आहे. तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर हे गावागावात चाचणी शिबिरे घेत आहेत. तर शहरात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे हे प्रत्येक चौकात चाचणी घेत आहेत. दोन दिवसाआड एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू होत असताना आजाराची भयावह ग्रामस्थांच्या केव्हा लक्षात येणार असा प्रश्न निर्माण होत आहे.