शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोरोनाने हिरावला एकमेव आधार, कुटुंबाची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST

अमरावती : कोरोना संसर्गामुळे ज्या बालकांनी पालक गमाविले त्यांना मदतीची घोषणा चार दिवसांपूर्वी शासनाने केली. मात्र, ज्या पालकांनी एकमेव ...

अमरावती : कोरोना संसर्गामुळे ज्या बालकांनी पालक गमाविले त्यांना मदतीची घोषणा चार दिवसांपूर्वी शासनाने केली. मात्र, ज्या पालकांनी एकमेव अपत्य कोरोनामुळे गमावले, त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा माता-पित्यांना मदतीबाबत अद्याप कोणतेच शासन धोरण नसल्याने हे कुटुंब संकटात सापडले आहे. आम्हाला मदत केव्हा, अशा या पालकांचा सवाल आहे.

किल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाबाधितांची संख्या ९४ हजारांच्या घरात आहे. यामध्ये कित्येकांनी आपल्या जवळचे नातलग गमावले आहे. कुटुंबाची कुटुंबं दुसऱ्या लाटेत पाॅझिटिव्ह आलीत. यात काहींनी एकुलता एक मुलगा कोरोनात गमावलेला. दुसऱ्या लाटेत अनेक तरुणांना जीव गमवावा लागला. दुखणे अंगावर काढणे, चाचणीला उशीर होणे. याशिवाय अन्य कोमार्बिडीटी आजार अशी अनेक कारणे आहेत. मात्र, ज्या कुटुंबाने कर्ता पुरुष गमावला त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे अशा परिवारांना शासन मदत मिळायला पाहिजे, अशी समाजभावना आहे.

पाईंटर

कोरोनाचे एकूण रुग्ण : ९४,०८१

उपचारानंतर बरे : ८९,१६०

सध्या उपचार सुरू : ३,४२०

संक्रमितांचे मृत्यू : १,५०१

बॉक्स

या कुटुंबावर कोसळले आभाळ

१) एकुलता एक मुलगा गमाविल्याने सून व नातवंडाची जबाबदारी वृद्ध पालकांवर आलेली आहे. कर्ता मुलगा गमाविल्याने कुटुंबाचा आधार गमाविलेला आहे.

२) मुलगा गमाविल्याने उतरत्या वयात वृद्ध माता-पित्यांवर आभाळ कोसळले आहे. येणाऱ्या काळातील अडचणींमुळे त्यांना आता शासनाचा आधार हवा आहे.

३) जिल्ह्यात किती कुटुंबांनी त्यांचा एकुलता एक मुलगा गमावला अशा परिवारांची माहिती जिल्हा प्रशासनाजवळ उपलब्ध नाही. त्यामुळे याविषयी तात्काळ सर्व्हेक्षण होणे महत्त्वाचे आहे.

बॉक्स

या कुटुंबांना शासनाधार महत्त्वाचे

कोरोना संकटात कुटुंबातील अनेक सदस्य संक्रमित झाल्याने जवळ येत नव्हते, होते ते संपले आहे. उपचारही महागडा आहे. त्यात कुटुंबाचा कर्ता गमावला. त्यामुळे या कुटुंबाला सर्व काही शून्यातून उभारावे लागणार आहे. आजारपणात कर्ज अंगावर झाले. जगायचे कसे हा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर निर्माण झालेला आहे. या कुटुंबाला शासनाने मदत द्यावी, व्यवसायासाठी अनुदान व द्यावे व अशा परिवाराचे तात्काळ सर्वेक्षण करण्याची गरज आहे.