शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

पुन्हा कोरोना कहर, बुधवारी 359 पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 05:01 IST

१ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२१ या दरम्यान दरदिवशी कोरोना संक्रमितांची संख्या वाढती आहे. त्रिसूत्रीचे पालन करा, एवढ्यावरच प्रशासनाची जनजागृती सुरू आहे. मात्र, नागरिकांना कर्तव्याची जाणीव आणि कोरोना नियमांचे पालन करावे, यासाठी ठोस पावले उचलली जात नाही, असा जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासनाचा ढिम्म कारभार सुरू आहे. कोरोना लस आली नि बेपर्वाई झाली, असे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वागणे आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, केंद्रीय आरोग्य पथकाच्या दौऱ्यानंतरही सुधारणा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. बुधवारी ३५९ संक्रमित रुग्ण आढळल्याची नोंद झाली. हा नवीन वर्षात कोरोनाचा  ‘ब्लास्ट’ ठरला आहे. कोरोना संसर्ग राेखण्यासाठी  जिल्हा प्रशासनाकडून फारशा उपाययोजना करण्यात येत नाही. रविवारी झालेल्या केंद्रीय आरोग्य पथकाच्या दौऱ्यानंतरही काहीच सुधारणा नाही, हे स्पष्ट झाले.  गत १० दिवसांत २ हजार १९ संक्रमित रुग्ण आढळले आहेत.१ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२१ या दरम्यान दरदिवशी कोरोना संक्रमितांची संख्या वाढती आहे. त्रिसूत्रीचे पालन करा, एवढ्यावरच प्रशासनाची जनजागृती सुरू आहे. मात्र, नागरिकांना कर्तव्याची जाणीव आणि कोरोना नियमांचे पालन करावे, यासाठी ठोस पावले उचलली जात नाही, असा जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासनाचा ढिम्म कारभार सुरू आहे. कोरोना लस आली नि बेपर्वाई झाली, असे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वागणे आहे. राज्यात १४ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग कायम असून, यात अमरावती जिल्हा आघाडीवर असताना प्रशासन नेमके काय करीत आहे, हे अनाकलनीय आहे. संक्रमित रुग्ण आणि मृत्यू संख्या वाढत आहे. नवीन वर्षात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कोणत्याही ठोस उपाययाेजना केल्या नाहीत. केवळ कागदोपत्री आढावा, बैठकी, अहवाल इतकीच प्रशासकीय खानापूर्ती सुरू आहे. आतापर्यंत २३ हजार  ८३५ संक्रमितांची संख्या आणि ४२७ जणांचा बळी गेले असताना जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर का नाही, याबाबत  अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.१० रुग्णालयांत उपचाराची सुविधासंक्रमित रूग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने १० रुग्णालयांची सुविधा केली आहे. यात अंबादेवी दवाखाना, ॲक्झाॅन हाॅस्पिटल, बेस्ट हॉस्पिटल,  दयासागर दवाखाना, नांदगाव खंडेश्वर येथील ट्रामा केअर सेंटर, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय दवाखाना, हिल टॉप कोविड हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अचलपूर ट्रामा केअर सेंटर, अमरावती येथील महावीर हॉस्पिटलचा समावेश आहे.

२० पथके आहे कुठे?वार्षिक नियोजन आढावा बैठकीच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी चार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात २० पथके जाहीर केली. ना. पवार   परत जाताच ना पथक, ना कारवाई असा कारभार सुरू आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी केवळ पथके गठित झाल्याचे जाहीर करून जिल्हा प्रशासनाने वेळ मारून नेली, हे आता स्पष्ट झाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या