शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्यांवर कोरोना वरचढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:12 IST

गजानन मोहोड अमरावती : जिल्ह्यात अस्मानी अन् सुलतानी संकटामुळे वर्षभरात २९५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यावर कोरोना संसर्ग भारी पडला ...

गजानन मोहोड

अमरावती : जिल्ह्यात अस्मानी अन् सुलतानी संकटामुळे वर्षभरात २९५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यावर कोरोना संसर्ग भारी पडला आहे. १० महिन्यांतील या कोरोना संकटामुळे तब्बल ४२३ नागरिकांचे बळी गेले. या दोन्ही प्रकारांत ७९८ नागरिकांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

दोन वर्षांपासून राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत असताना या कालावधीत जिल्हा प्रशासनाकडून कुठलेही ठोस पावले उचलली गेलेली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांत वाढ होत असल्याची जिल्ह्याची शोकांतिका आहे. सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, शेतमालास भाव नाही, यातून वाढणारे बँकाचे व सावकारांचे कर्ज, या कर्जाच्या वसुलीसाठी सततचा तगादा यामुळे शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य भारी पडत आहे. यामध्ये मुला-मुलींचे शिक्षण, लग्न व जगावे कसे, या विवंचनेतून शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे जिल्ह्याचे चित्र आहे. या दृष्टचक्रात अडकलेल्या २९५ शेतकऱ्यांनी २०२० मध्ये मृत्यूचा घोट घेतल्याचे वास्तव आहे. अशाप्रकारे शेतकऱ्याने सुटका करुन घेतली असली त्याच्या पश्चात उर्वरित कुटुंबाच्या समस्या वाढल्या आहेत. कर्जाचा बोजा वारसाच्या नावे चढला, तर शासनाकडून केवळ एक लाखाची मदत मिळाली. यामध्येही ३० हजार रोख व ७० हजारांचा बाँड असे स्वरूप आहे. सन २००५ पासून या मदतीत अजूनही भरीव वाढ झालेली नाही.

एप्रिल महिन्यापासून कोरोना संकटाची भर यात पडली. या नऊ महिन्यांच्या कालावधीत ४२३ संक्रमित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन्ही प्रकारांत ७९८ नागरिकांना हकनाक जीव गमवावा लागला. जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणा थिट्या पडत असल्यामुळेच संकटे नागरिकांच्या जिवावर उठली आहेत.

बॉक्स

अर्धेअधिक प्रकरणे मदतीपासून अपात्र

जिल्ह्यात सन २०२० मध्ये एकूण २९५ शेतकरी आत्महत्या झाल्या. यापैकी १४० प्रकरणेच शासकीय मदतीसाठी पात्र ठरली आहेत. ८१ प्रकरणे अपात्र व ६६ प्रकरणे चौकशीसाठी प्रशासनाचे लालफीतशाहीत अडकली आहेत.

बॉक्स

बैठकांसाठी जिल्हा प्रशासन गंभीर नाही

शेतकरी आत्महत्यांची प्रकरणांच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे. या समितीमध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसोबत प्रशासनाचे अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, या समितीची बैठक चार-चार महिने होत नसल्यामुळे प्रकरणे प्रलंबित राहतात व वारसाला शासकीय मदतीस विलंब होत असल्याची धक्कादायक माहिती आहे.

-------------------मृत्यूची जोडगोळी अशी

शेतकरी आत्महत्या कोरोना बळी

जानेवारी : २४ ००

फेब्रुवारी : २७ ००

मार्च : १४ ००

एप्रिल : १३ ०७

मे : २९ ०८

जून : २९ ०९

जुलै : ३१ ३७

ऑगस्ट : २५ ७०

सप्टेंबर : ३० १५६

ऑक्टोबर : ३१ ७७

नोव्हेंबर : २५ १३

डिसेंबर : १७ ०४

बॉक्स

कॉमर्बिड आजारानेही कोरोना बळी

जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत जे बळी गेले आहेत, त्यामध्ये ८० टक्के रुग्णांना बीपी, शुगर, हृदयरोगासारखे अन्य आजार असल्याचे आरोग्य विभागाचे ‘डेथ ऑडिट’मध्ये स्पष्ट झाले. याशिवाय अंगावर लक्षणे काढणे, उशिरा उपचार आदी कारणांमुळेही कोरोनाचे मृत्युसंंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते.