शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

शेतकरी आत्महत्यांवर कोरोना वरचढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:12 IST

गजानन मोहोड अमरावती : जिल्ह्यात अस्मानी अन् सुलतानी संकटामुळे वर्षभरात २९५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यावर कोरोना संसर्ग भारी पडला ...

गजानन मोहोड

अमरावती : जिल्ह्यात अस्मानी अन् सुलतानी संकटामुळे वर्षभरात २९५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यावर कोरोना संसर्ग भारी पडला आहे. १० महिन्यांतील या कोरोना संकटामुळे तब्बल ४२३ नागरिकांचे बळी गेले. या दोन्ही प्रकारांत ७९८ नागरिकांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

दोन वर्षांपासून राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत असताना या कालावधीत जिल्हा प्रशासनाकडून कुठलेही ठोस पावले उचलली गेलेली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांत वाढ होत असल्याची जिल्ह्याची शोकांतिका आहे. सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, शेतमालास भाव नाही, यातून वाढणारे बँकाचे व सावकारांचे कर्ज, या कर्जाच्या वसुलीसाठी सततचा तगादा यामुळे शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य भारी पडत आहे. यामध्ये मुला-मुलींचे शिक्षण, लग्न व जगावे कसे, या विवंचनेतून शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे जिल्ह्याचे चित्र आहे. या दृष्टचक्रात अडकलेल्या २९५ शेतकऱ्यांनी २०२० मध्ये मृत्यूचा घोट घेतल्याचे वास्तव आहे. अशाप्रकारे शेतकऱ्याने सुटका करुन घेतली असली त्याच्या पश्चात उर्वरित कुटुंबाच्या समस्या वाढल्या आहेत. कर्जाचा बोजा वारसाच्या नावे चढला, तर शासनाकडून केवळ एक लाखाची मदत मिळाली. यामध्येही ३० हजार रोख व ७० हजारांचा बाँड असे स्वरूप आहे. सन २००५ पासून या मदतीत अजूनही भरीव वाढ झालेली नाही.

एप्रिल महिन्यापासून कोरोना संकटाची भर यात पडली. या नऊ महिन्यांच्या कालावधीत ४२३ संक्रमित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन्ही प्रकारांत ७९८ नागरिकांना हकनाक जीव गमवावा लागला. जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणा थिट्या पडत असल्यामुळेच संकटे नागरिकांच्या जिवावर उठली आहेत.

बॉक्स

अर्धेअधिक प्रकरणे मदतीपासून अपात्र

जिल्ह्यात सन २०२० मध्ये एकूण २९५ शेतकरी आत्महत्या झाल्या. यापैकी १४० प्रकरणेच शासकीय मदतीसाठी पात्र ठरली आहेत. ८१ प्रकरणे अपात्र व ६६ प्रकरणे चौकशीसाठी प्रशासनाचे लालफीतशाहीत अडकली आहेत.

बॉक्स

बैठकांसाठी जिल्हा प्रशासन गंभीर नाही

शेतकरी आत्महत्यांची प्रकरणांच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे. या समितीमध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसोबत प्रशासनाचे अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, या समितीची बैठक चार-चार महिने होत नसल्यामुळे प्रकरणे प्रलंबित राहतात व वारसाला शासकीय मदतीस विलंब होत असल्याची धक्कादायक माहिती आहे.

-------------------मृत्यूची जोडगोळी अशी

शेतकरी आत्महत्या कोरोना बळी

जानेवारी : २४ ००

फेब्रुवारी : २७ ००

मार्च : १४ ००

एप्रिल : १३ ०७

मे : २९ ०८

जून : २९ ०९

जुलै : ३१ ३७

ऑगस्ट : २५ ७०

सप्टेंबर : ३० १५६

ऑक्टोबर : ३१ ७७

नोव्हेंबर : २५ १३

डिसेंबर : १७ ०४

बॉक्स

कॉमर्बिड आजारानेही कोरोना बळी

जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत जे बळी गेले आहेत, त्यामध्ये ८० टक्के रुग्णांना बीपी, शुगर, हृदयरोगासारखे अन्य आजार असल्याचे आरोग्य विभागाचे ‘डेथ ऑडिट’मध्ये स्पष्ट झाले. याशिवाय अंगावर लक्षणे काढणे, उशिरा उपचार आदी कारणांमुळेही कोरोनाचे मृत्युसंंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते.