शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

कोरोनाने हिरावले ५१ बालकांचे पालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोनाने ५१ बालकांचे पालक हिरावले. यामध्ये ४८ जणांनी वडील, सहा जणांनी आई, तर तिघांनी आई-वडील दोघेही गमावले ...

अमरावती : कोरोनाने ५१ बालकांचे पालक हिरावले. यामध्ये ४८ जणांनी वडील, सहा जणांनी आई, तर तिघांनी आई-वडील दोघेही गमावले आहेत. अशा निराधार झालेल्या बालकांची माहिती आरोग्य यंत्रणा व कृती दलाद्वारे जिल्हा प्रशासनास उपलब्ध केली. या बालकांच्या यथायोग्य संगोपनासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे काळजी घेतली जाणार आहे.

जिल्हा बाल कल्याण अधिकारी भूषण भंडांगे यांच्या मार्गदर्शनातील पथकाद्वारे मुलांचा शोध घेण्यात आलेला आहे. यातील सर्व बालके हे काका,काकू, आजी, आजोबा, मामा, मामी आदींकडे सध्या वास्तव्याला असल्याचे दिसून आले. अनाथ झालेली तीन मुले आजी-आजोंबाकडे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. ही मंडळी जर या बालकांना ठेवावयास तयार नसतील, तर त्यांना रुक्मिणीनगर व देसाईनगरातील बाल संगोपनगृहात ठेवण्यात येणार असल्याचे भडांगे यांनी सांगितले.

कोरोना विषाणूमुळे अनेक बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत. अशा बालकांची काळजी व संरक्षण करीत त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन, त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी जिल्ह्यात कृती दल गठीत करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बाल समितीच्या निर्देशानुसार कोरोना प्रादुर्भाव काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील मुले तसेच कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यात येणार आहे.

पाईंटर

पिता गमाविलेले बालके : ४१

आई हिरावलेली बालके : ०६

आई-वडील दोघेही मृत झालेली बालके : ०३

बॉक्स

असा घेतला गेला बालकांचा शोध

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गावातील ग्राम समिती, अंगणवाडी सेविकांच्या गृहभेटीद्वारे तसेच ५० वर्षांपर्यंतच्या मृत व्यक्तींचा डेटा जमा करण्यात आला. यानंतर त्या कुटुंबांशी संपर्क करण्यात आल्याचे बाल कल्याण अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अशी सर्व बालके सुरक्षित आहेत व जर त्यांना सांभाळ कोणी करीत नसल्यास त्यांना बाल संगोपनगृहात ठेवले जाणार आहे.

बॉक्स

दरमहा १,१०० रुपयांची मदत

कोरोना संसर्गामुळे ज्या बालकांचे माता, पिता किंवा दोन्ही हिरावले गेले, त्यांना शासनाकडून १,१०० रुपये दरमहा आर्थिक मदत मिळणार आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण होईतोवर या बालकांना ही मदत मिळेल. यासाठी मृत पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र, मुलाचा रहिवासी दाखला, छायाचित्र, आधार कार्ड व तहसीलदारांचे प्रमाणपत्र व बँक खातेक्रमांक द्यावा लागणार आहे.

कोट

कोरोना संसर्गामुळे ५१ बालकांच्या पालकांचा मृत्यू झाला. टास्क फोर्सद्वारे या मुलांचा शोध घेण्यात आला. या बालकांच्या यथायोग्य संगोपनाची काळजी घेतली जाणार आहे.

- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी