शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

कोरोनाने हिरावले ८९७ महिलांच्या कपाळावरील कुंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:10 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता जरी कमी झालेला असला तरी फेब्रुवारी ते मेअखेरपर्यंत ७०,४६९ पॉझिटिव्ह व १,०४३ रुग्णांचा ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता जरी कमी झालेला असला तरी फेब्रुवारी ते मेअखेरपर्यंत ७०,४६९ पॉझिटिव्ह व १,०४३ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,५१६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. यामध्ये ३१ मे पर्यंत साधारणत: ८९७ महिलांना आपल्या कपाळावरील कुंकू पुसण्याचा दुदैवी प्रसंग कोरोनामुळे आलेला आहे. या महिलांना शासन योजनेचा लाभ मिळावा, यादृष्टीने आता महिला व बालविकास विभागाद्वारा सर्व्हे प्रारंभ करण्यात आलेला आहे.

शेतकरी आत्महत्याप्रवण असणाऱ्या अमरावती जिल्ह्यात यंदा ७८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याने या महिलांवर वैधव्य आले असतानाच यात कोरोना संकटाने घाला घातला. या संकटामुळे जिल्ह्यातील ८९७ महिलांच्या कपाळावरील कुंकू हिरावल्याचा दुर्देवी प्रसंग ओढावलेला आहे. काळाने ही वेळ आणल्यामुळे या महिलांना शासनाधार देणे महत्त्वाचे आहे. काही महिलांची मुले कमावती असली तरी खरा आधार, हिंमत ही पतीचीच असते.

जिल्ह्यात ४ एप्रिलला पहिल्या कोरोना मृताची नोंद झाली होती. त्यानंतर सातत्याने कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे चक्र सुरूच आहे. तेव्हापासून ३१ मेपर्यंत जिल्ह्यात ९८७ पुरुष व ४६७ महिलांचे मृत्यू झाले व यामध्ये साधारणपणे १० टक्के मृत्यूमध्ये पती कोरोनामुळे हिरावल्याचा प्रसंग ओढावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. या महिलांना आधार मिळावा व कोरोनामुळे वैधव्य आलेल्या महिलांची प्रत्यक्ष संख्या समोर यावी, त्यांची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती व्हावी, या उद्देशाने आता जिल्ह्यात सर्व्हेक्षण सुरू झालेले आहे.

पाईंटर

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण : ९४,७५०

बरे झालेल्या रुग्णांची संख्या : ९०,६९८

उपचार सुरू असणारे रुग्ण : २,५३६

एकूण मृत्यू : १,५१६

महिलांचे मृत्यू (३१ मे पर्यंत) : ४६७

बॉक्स

येथे करावा अर्ज

कोरोनामुळे वैधव्य आलेल्या महिलांना स्वयंरोजगार मिळावा, त्यांना घरगुती उद्योग सुरू करता यावा, काही शासन योजनांचा लाभ मिळावा याकरिता महिला व बालकल्याण विभागाच्या तालुका व जिल्हा कार्यालयाकडे अर्ज करावा लागणार आहे. याशिवाय शासन योजनेच्या निकषानुसार पात्र महिलेला संजय गांधी निराधार योजना, भूमिहीन पेन्शन योजनांसह तत्सम योजनेच्या लाभासाठी तहसील कार्यालयात अर्ज करावा लागणार असल्याचे सांगण्यात आले.

कोट

प्रत्येक तालुक्यात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत याविषयीचा सर्व्हे करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्याचा डाटाबेस तयार होईल. यात पात्र महिलांना शासन योजना, स्वयंरोजगारासाठी अर्ज करता येणार आहे.

- प्रशांत थोरात,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण)

बॉक्स

७० महिलांना तारुण्यात वैधत्व

१) २१ ते ४० या वयोगटात साधारणपणे ८२ महिलांच्या कपाळावरील कुंकू कोरोना संसर्गाने हिरावले आहे. या महिलांना स्वयंरोजगारासाठी योजनेचा लाभ मिळणे व अर्थसहाय्य करावयास पाहिजे, अशी समाजभावना आहे.

२) ४१ ते ६० वयोगटात साधारणपणे ३२८ महिलांचा पती कोरोना संसर्गाने हिरावला आहे. या महिलांना शासनाधार मिळणे महत्त्वाचे आहे. या महिलांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन घरगुती उद्योगाला प्रोत्साहित करणे महत्त्वाचे आहे.

३) ६० वर्षांवरील ४७७ महिलांच्या रथाचे एक चाक काळाने हिरावले. या महिलांना शासनाने निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा व यात कोणतीही अट नसावी, अशी मागणी आता समोर येत आहे.

४) कोरोनामुळे वैधव्य आलेल्या महिलांंचे समुपदेशन होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात तयार होत असलेल्या डाटाबेसनंतर या महिलांची सद्यस्थिती शासनासमोर आल्यानंतर काय धोरणात्मक निर्णय होते, याकडे लक्ष लागले आहे.