शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा कोरोना ‘ब्लास्ट’; बुधवारी ३५९ ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. बुधवारी ३५९ संक्रमित रुग्ण आढळल्याची नोंद झाली. त्यामुळे नवीन वर्षात ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. बुधवारी ३५९ संक्रमित रुग्ण आढळल्याची नोंद झाली. त्यामुळे नवीन वर्षात कोरोनाचा ‘ब्लास्ट’ ठरला आहे. कोरोना संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून फारशा उपाययोजना करण्यात येत नाही. रविवारी केंद्रीय आरोग्य पथकाच्या दौऱ्यानंतरही काहीच सुधारणा नाही, असे चित्र आहे. गत १० दिवसांत २ हजार १९ संक्रमित रूग्ण आढळले आहे.

१ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२१ या दरम्यान दरदिवशी कोरोना संक्रमितांची संख्या वाढती आहे. त्रिसूत्रीचे पालन करा, एवढ्यावरच प्रशासनाची जनजागृती सुरू आहे. मात्र, नागरीकांना कर्तव्याची जाणीव आणि कोरोना नियमांचे पालन करावे, यासाठी ठोस पावले उचलली जात नाही, असा जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासनाचा ढिम्म कारभार सुरू आहे. कोरोना लस आली नि प्रशासन सुसाट झाले, असे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वागणे आहे. राज्यात १४ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग कायम असून, यात अमरावती जिल्हा आघाडीवर असताना प्रशासन नेमके काय करीत आहे, हे कळू शकत नाही. संक्रमित रुग्ण आणि मृत्यू संख्या वाढत आहे. नवीन वर्षात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कोणत्याही ठोस उपाययाेजना केल्या नाहीत. केवळ कागदोपत्री आढावा, बैठकी, अहवाल इतकीच प्रशासकीय खानापूर्ती सुरू आहे. आतापर्यंत २३ हजार ८३५ संक्रमितांची संख्या आणि ४२७ जणांचा बळी गेले असताना जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर का नाही? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

-----------------

१० रुग्णालयात उपचाराची सुविधा

संक्रमित रूग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने १० रूग्णालयांची सुविधा केली आहे. यात अंबादेवी दवाखाना, ॲक्झाॅन हाॅस्पिटल,बेस्ट हॉस्पिटल, दयासागर दवाखाना, नांदगाव खंडेश्वर येथील ट्रामा केअर सेंटर, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय दवाखाना, हिल टॉप कोविड हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अचलपूर ट्रामा केअर सेंटर, अमरावती येथील महावीर हॉस्पिटलचा समावेश आहे.

--------------------

चार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणातील २० पथके आहे कुठे?

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे सोमवारी वार्षिक नियोजन आढावा बैठकीला येण्याच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात २० पथके जाहीर केले. मात्र, उपमुख्यमंत्री मुंबईला परत जाताच ना पथक, ना कारवाई, असा बेफिकीरी कारभार सुरू आहे. केवळ पथके गठित झाल्याचे जाहीर करून जिल्हा प्रशासनाने तूर्त वेळ मारून नेली, हे आता स्पष्ट होते.

---------------------

१ ते १० फेब्रवारी कोरोना रुग्ण आलेख

१ फेब्रुवारी-------------------- ९२

२ फेब्रुवारी-------------------- ११८

३ फेब्रुवारी-------------------- १७९

४ फेब्रुवारी-------------------- १५८

५ फेब्रुवारी-------------------- २३३

६ फेब्रुवारी-------------------- २७०

७ फेब्रुवारी-------------------- १९२

८ फेब्रुवारी-------------------- २३५

९ फेब्रुवारी-------------------- १८३

१० फेब्रुवारी-------------------- ३५९