शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने दुरावली रक्ताच्या नात्याची माणसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST

जिल्ह्यात ६८५ जणांचा बळी, स्वतंत्र अंत्यसंस्काराची व्यवस्था अमरावती : कोरोना संक्रमिताचा मृत्यू झाल्यास प्रिय, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनाही अंत्यसंस्काराला उभे ...

जिल्ह्यात ६८५ जणांचा बळी, स्वतंत्र अंत्यसंस्काराची व्यवस्था

अमरावती : कोरोना संक्रमिताचा मृत्यू झाल्यास प्रिय, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनाही अंत्यसंस्काराला उभे राहता येत नाही. अंतिमसमयी ती दुरावतात. अशा कोरोना संक्रमितांच्या अंत्यसंस्कारासाठी हिंदू स्मशानभूमितील कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. वर्षभरात कोरोनाने दगावलेल्या तब्बल ६८५ मृतदेहांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत.

कोरोनाच्या कहराला मार्च महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात जवळपास ५१ हजार १०० जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी यात कोरोनावर ४७ हजार ५१७ जणांनी या संसर्गावर मात केली आहे. कोरोनामुळेच मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण हे नगण्य आहे. अन्य आजार बळावल्यानेदेखील अनेकांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यात प्रामुख्याने उच्च रक्तचाप, मधुमेह ही कारणे आहेत. रुग्णाचा मृत्यू झाल्यावर अनेक नातेवाईक स्मशानभूमीच्या दाराशी हजर होतात; परंतु अंत्यसंस्काराच्या वेळी बाहेरच थांबून ते आम्हाला अंत्यसंस्कार करण्यास सांगत असल्याचे स्मशानभूमीचे कर्मचारी सांगतात. अंतिमसमयी मृतदेहाच्या तोंडात आम्हाला पाणी टाकावे लागते. दररोज मृतदेहाचा वाढता आकडा पाहून मनाची घालमेल होते, असे सांगताना या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

------

गेल्या वर्षभरात कोरोनामुळे झालेले मृत्यू ६८५

हिंदू स्मशानभूमीत केलेले अंत्यविधी : ६३०

९२ टक्के स्मशानभूमी कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार

-------------

बॉक्स

पाच माणसांना परवानगी; मृतांच्या नशिबी तेही नाही

गत काही महिन्यांत अमरावतीतील कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. वर्षभरात ६८५ पेक्षा अधिक मृतदेहांवर अमरावती पालिकेच्या पथकाने अंत्यसंस्कार केले. यावेळी ५०० पेक्षा अधिक नातेवाइकांनी मृतदेहाला पाणी पाजण्यासाठीदेखील पुढे येण्यास नकार दिला. त्यामुळे अशा मृतदेहांवर आम्हीच शक्य तेवढे रीतीरिवाज पाळून अंत्यसंस्कार केले आहेत. अनेक जण अंत्यसंस्कार होईपर्यंत थांबत असले तरी स्मशानभूमीपासून शंभर फूट दूर राहूनच मृतदेहाचे अंत्यदर्शन घेत असल्याचे दिसून आले.

बॉक्स

ग्रामीण भागात मृत्यू वाढले

अमरावती जिल्ह्यात मृत्यूंची संख्याही लक्षणीय आहे. जवळपास आतापर्यंत कोरोनाने १००२ मृत्यू झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांत अचलपूर, वरूड, मोर्शी, धामणगाव रेल्वे कोरोनाचा हाॅटस्पॉट झाला आहे.

कोट

वर्षभरापासून आम्ही १८ जण कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करीत होतो; परंतु गेल्या दोन महिन्यांत अचानक मृतांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथील विलास नगर, शंकर नगर, एसआरपीएफ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी १२ माणसे अतिरिक्त दिली आहेत. त्यामुळे आमच्यावरील ताण हलका झाला आहे.

- एकनाथ इंगळे, प्रबंधक, हिंदू स्मशानभूमी

कोट

कोरोना मृतांमध्ये सर्वधर्मीयांचा समावेश आहे. त्यामुळे कधी दफन, तर कधी दाह संस्कार करावे लागतात. अनेक मृतांचे नातेवाईक दुरून शोक व्यक्त करतात, तर काहींचे नातेवाईक अंत्यविधीलाही येत नाहीत. त्यावेळी आम्ही स्वत:च विधी उरकतो.

- किसन लांडगे, कर्मचारी हिंदू स्मशानभूमी.