शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

कोरोनाने दुरावली रक्ताच्या नात्याची माणसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST

जिल्ह्यात ६८५ जणांचा बळी, स्वतंत्र अंत्यसंस्काराची व्यवस्था अमरावती : कोरोना संक्रमिताचा मृत्यू झाल्यास प्रिय, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनाही अंत्यसंस्काराला उभे ...

जिल्ह्यात ६८५ जणांचा बळी, स्वतंत्र अंत्यसंस्काराची व्यवस्था

अमरावती : कोरोना संक्रमिताचा मृत्यू झाल्यास प्रिय, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनाही अंत्यसंस्काराला उभे राहता येत नाही. अंतिमसमयी ती दुरावतात. अशा कोरोना संक्रमितांच्या अंत्यसंस्कारासाठी हिंदू स्मशानभूमितील कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. वर्षभरात कोरोनाने दगावलेल्या तब्बल ६८५ मृतदेहांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत.

कोरोनाच्या कहराला मार्च महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात जवळपास ५१ हजार १०० जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी यात कोरोनावर ४७ हजार ५१७ जणांनी या संसर्गावर मात केली आहे. कोरोनामुळेच मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण हे नगण्य आहे. अन्य आजार बळावल्यानेदेखील अनेकांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यात प्रामुख्याने उच्च रक्तचाप, मधुमेह ही कारणे आहेत. रुग्णाचा मृत्यू झाल्यावर अनेक नातेवाईक स्मशानभूमीच्या दाराशी हजर होतात; परंतु अंत्यसंस्काराच्या वेळी बाहेरच थांबून ते आम्हाला अंत्यसंस्कार करण्यास सांगत असल्याचे स्मशानभूमीचे कर्मचारी सांगतात. अंतिमसमयी मृतदेहाच्या तोंडात आम्हाला पाणी टाकावे लागते. दररोज मृतदेहाचा वाढता आकडा पाहून मनाची घालमेल होते, असे सांगताना या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

------

गेल्या वर्षभरात कोरोनामुळे झालेले मृत्यू ६८५

हिंदू स्मशानभूमीत केलेले अंत्यविधी : ६३०

९२ टक्के स्मशानभूमी कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार

-------------

बॉक्स

पाच माणसांना परवानगी; मृतांच्या नशिबी तेही नाही

गत काही महिन्यांत अमरावतीतील कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. वर्षभरात ६८५ पेक्षा अधिक मृतदेहांवर अमरावती पालिकेच्या पथकाने अंत्यसंस्कार केले. यावेळी ५०० पेक्षा अधिक नातेवाइकांनी मृतदेहाला पाणी पाजण्यासाठीदेखील पुढे येण्यास नकार दिला. त्यामुळे अशा मृतदेहांवर आम्हीच शक्य तेवढे रीतीरिवाज पाळून अंत्यसंस्कार केले आहेत. अनेक जण अंत्यसंस्कार होईपर्यंत थांबत असले तरी स्मशानभूमीपासून शंभर फूट दूर राहूनच मृतदेहाचे अंत्यदर्शन घेत असल्याचे दिसून आले.

बॉक्स

ग्रामीण भागात मृत्यू वाढले

अमरावती जिल्ह्यात मृत्यूंची संख्याही लक्षणीय आहे. जवळपास आतापर्यंत कोरोनाने १००२ मृत्यू झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांत अचलपूर, वरूड, मोर्शी, धामणगाव रेल्वे कोरोनाचा हाॅटस्पॉट झाला आहे.

कोट

वर्षभरापासून आम्ही १८ जण कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करीत होतो; परंतु गेल्या दोन महिन्यांत अचानक मृतांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथील विलास नगर, शंकर नगर, एसआरपीएफ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी १२ माणसे अतिरिक्त दिली आहेत. त्यामुळे आमच्यावरील ताण हलका झाला आहे.

- एकनाथ इंगळे, प्रबंधक, हिंदू स्मशानभूमी

कोट

कोरोना मृतांमध्ये सर्वधर्मीयांचा समावेश आहे. त्यामुळे कधी दफन, तर कधी दाह संस्कार करावे लागतात. अनेक मृतांचे नातेवाईक दुरून शोक व्यक्त करतात, तर काहींचे नातेवाईक अंत्यविधीलाही येत नाहीत. त्यावेळी आम्ही स्वत:च विधी उरकतो.

- किसन लांडगे, कर्मचारी हिंदू स्मशानभूमी.