शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
2
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
3
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
4
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
5
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
6
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
7
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
8
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
9
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
10
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
11
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
12
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
13
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
14
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
15
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
16
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
17
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
18
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
19
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
20
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

कोरोना : १४ दिवसांत ७८ वर बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचे ११ महिन्यांच्या काळात ६०० व मार्च महिन्याच्या १४ दिवसांत ७८ वर संक्रमितांचा मृत्यू झाल्याने ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचे ११ महिन्यांच्या काळात ६०० व मार्च महिन्याच्या १४ दिवसांत ७८ वर संक्रमितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्याला हादरा बसला आहे. याच काळात ४२ हजारांवर कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ४ एप्रिल २०२० रोजी आढळला. हा रुग्ण ‘होमडेड’ होता. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल ६०० चे वर कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. फेब्रुवारीपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला. १ फेब्रुवारी ते १४ मार्च या ४२ दिवसांमध्ये तब्बल २०,५१८ कोरोनाग्रस्तांची व १८१ मृत्यूची नोंद झालेली आहे.

कोरोनाने मृत्यूसंख्येत कमी येण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल स्वत: लक्ष देऊन आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात अंगावर दुखणे काढणे घातक ठरत आहे. याशिवाय २० प्रकारचे कोमर्बिड आजाराच्या रुग्णाला झालेला कोरोनाचा संसर्गदेखील एकप्रकारे गंभीर मानला जात आहे. आरोग्य विभागाद्वारा करण्यात आलेल्या ‘डेथऑडिट’मध्ये हे कारण अगदी ठळकपणे नोंदविण्यात आले आहे. याशिवाय संक्रमितांच्या मृत्यूसंख्येत ५० ते ७० या वयोगटातील अधिक रुग्ण असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.

बॉक्स

मार्च महिन्यात अंत्यसंस्काराला ‘वेटींग‘

या महिन्यात १ मार्चला १०, २ ला १२ रुग्णांचे मृत्यू झाले. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा एकही दिवस निरंक नाही. १५ मार्चपर्यंत मृत्यूची संख्या ही ८० वर पोहोचली आहे. मृत्यूची संख्या वाढतीच असल्याने शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला वेटींगवर राहण्याची वेळ आलेली आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झालेले मृत व्यक्ती व जिल्हा प्रशासनाने त्याच दिवसी जाहीर केलेले त्याच दिवसातील मृत्यूसंख्या यात तफावत असल्याची चर्चा सुरू आहे.