शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

कोरोना : १४ दिवसांत ७८ वर बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचे ११ महिन्यांच्या काळात ६०० व मार्च महिन्याच्या १४ दिवसांत ७८ वर संक्रमितांचा मृत्यू झाल्याने ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचे ११ महिन्यांच्या काळात ६०० व मार्च महिन्याच्या १४ दिवसांत ७८ वर संक्रमितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्याला हादरा बसला आहे. याच काळात ४२ हजारांवर कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ४ एप्रिल २०२० रोजी आढळला. हा रुग्ण ‘होमडेड’ होता. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल ६०० चे वर कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. फेब्रुवारीपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला. १ फेब्रुवारी ते १४ मार्च या ४२ दिवसांमध्ये तब्बल २०,५१८ कोरोनाग्रस्तांची व १८१ मृत्यूची नोंद झालेली आहे.

कोरोनाने मृत्यूसंख्येत कमी येण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल स्वत: लक्ष देऊन आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात अंगावर दुखणे काढणे घातक ठरत आहे. याशिवाय २० प्रकारचे कोमर्बिड आजाराच्या रुग्णाला झालेला कोरोनाचा संसर्गदेखील एकप्रकारे गंभीर मानला जात आहे. आरोग्य विभागाद्वारा करण्यात आलेल्या ‘डेथऑडिट’मध्ये हे कारण अगदी ठळकपणे नोंदविण्यात आले आहे. याशिवाय संक्रमितांच्या मृत्यूसंख्येत ५० ते ७० या वयोगटातील अधिक रुग्ण असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.

बॉक्स

मार्च महिन्यात अंत्यसंस्काराला ‘वेटींग‘

या महिन्यात १ मार्चला १०, २ ला १२ रुग्णांचे मृत्यू झाले. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा एकही दिवस निरंक नाही. १५ मार्चपर्यंत मृत्यूची संख्या ही ८० वर पोहोचली आहे. मृत्यूची संख्या वाढतीच असल्याने शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला वेटींगवर राहण्याची वेळ आलेली आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झालेले मृत व्यक्ती व जिल्हा प्रशासनाने त्याच दिवसी जाहीर केलेले त्याच दिवसातील मृत्यूसंख्या यात तफावत असल्याची चर्चा सुरू आहे.