शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

कोरोना,११ मृत्यू, ५२० पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोना संसर्गात बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. बुधवारी पुन्हा ११ कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात नऊ मृत ...

अमरावती : कोरोना संसर्गात बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. बुधवारी पुन्हा ११ कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात नऊ मृत जिल्ह्यातील, तर दोन नागपूरमधील आहेत. जिल्ह्यात बाधितांच्या मृत्यूची संख्या ८१३ झालेली आहे. याशिवाय ५२० नव्या रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५८,३८५ झालेली आहे.

जिल्ह्यात बुधवारी ३,१०८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ५२० अहवाल पॉझिटिव्ह व १६.७३ टक्के पॉझिटिव्हची नोंद झालेली आहे. दोन दिवसांत चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हचे प्रमाण पुन्हा वाढायला लागले आहे. ही जिल्ह्यासाठी चिंतेची बाब आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंची दुकानांचा अवधी चार तासांवर आणला, तरीही रस्त्यांवरची गर्दी कमी होत नाही. त्यामुळे अमरावतीला पाचही झोनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे. यात आतापर्यंत दीड हजारांच्या चाचण्या करण्यात आल्या व यात ३५ वर नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना उपचारार्थ कोरोना केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आलेले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी बैठक घेऊन कुठलाही ताप असो, डॉक्टरांनी रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले.

बॉक्स

२४ तासांतील कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

जिल्ह्यात २४ तासांत उपचारादरम्यान येथील ६० वर्षीय पुरुष, (उत्तम नगर), ५५ वर्षीय पुरुष, (गौरखेडा, नांदगाव खंडेश्वर), ७५ वर्षीय पुरुष, (बैतुल), ६० वर्षीय महिला, (कारंजा घाडगे), ५२ वर्षीय महिला, (धामणगाव रेल्वे), ६५ वर्षीय पुरुष, (मोर्शी), ३० वर्षीय महिला, (कठोरा), ७५ वर्षीय पुरुष, (सावरडी), ६० वर्षीय महिला, (भातकुली) याशिवाय नागपूर जिल्ह्यातील ७५ वर्षीय महिला, (काटोल) व ६० वर्षीय पुरुष (काटोल) या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

बॉक्स

कोरोना जिल्हास्थिती

जिल्ह्यात उपचारानंतर बरे वाटल्याने ४५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. आतापर्यत ५८,३८५ रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहे. ही ८२.५२ टक्केवारी आहे. सद्यस्थितीत ५,८८९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यात महापालिका क्षेत्रात २,१८२ व जिल्हा ग्रामीणमध्ये ३,६५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण दुपटीचा कालावधी ११४ दिवसांवर मृत्यूदर १.३९ टक्के असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.