शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
3
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
4
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
5
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
6
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
7
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
8
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
9
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
10
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
11
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
12
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
13
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
14
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
15
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
16
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
17
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
18
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
19
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
20
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
Daily Top 2Weekly Top 5

कंट्रोलरुमद्वारे पीएचसी, उपकेंद्रात समन्वय ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:09 IST

अमरावती : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बेड, उपचार साधनसामग्री याबाबत वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला माहिती देणे आवश्यक आहे. ...

अमरावती : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बेड, उपचार साधनसामग्री याबाबत वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला माहिती देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात साथीचे वेळीच नियंत्रण होणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून कामे करावीत, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी दिले.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची पालकमंत्री ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झूम ॲपद्वारे बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढू नये म्हणून सजग राहून कामे करणे आवश्यक आहे. यापूर्वी आपण तपासणी व जनजागृतीसाठी गावोगाव विविध सर्वेक्षण मोहीम राबविली. त्यानुसार संपर्क व सर्वेक्षणात नियमितता ठेवावी. कंट्रोलरुमद्वारे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे यांच्याशी समन्वय ठेवावा. उपलब्ध साधनसामग्री यंत्रणा सातत्याने कार्यान्वित असण्याबाबत सर्वांनी दक्षता बाळगावी. आवश्यक तेथे खाटांची गरज, उपलब्धता व इतर सामग्री यासाठी प्रशासनाशी सतत समन्वय ठेवावा. कोरोना प्रतिबंधासाठी आपण सर्व वर्षभर लढत आहोत. आरोग्य क्षेत्रातील सर्वांनी आघाडीवर राहून जीवाची पर्वा न करता काम केले आहे. रुग्णसेवेपेक्षा मोठे कार्य नाही. आतापर्यंत सर्वांनी मिळून चांगले काम केले आहे. यापुढेही करूया, त्यासाठी सर्वांनी दक्षता बाळगूया, असेही आवाहन त्यांनी केले.

बॉक्स

वेळीच औषधोपचार आवश्यक

कोरोनाची लक्षणे जाणवताच ‘प्रिव्हेंटिव्ह’ औषधोपचार वेळीच सुरू करावे. जेणेकरून आजारावर वेळीच नियंत्रण मिळवणे शक्य होईल. याबाबत आरोग्यतज्ज्ञांनीही यापूर्वीच सूचित केले आहे. आपण स्वत: याबाबत बैठक घेऊन चर्चा केली होती. त्यानुसार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना परिपत्रकाद्वारे सूचना द्यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी टीएचओंना दिले.

बॉक्स

केंद्रांवर टोकन सिस्टीम राबवा

तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या उपचार सुविधा, तसेच लसीकरण आदींचे सनियंत्रणासाठी तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने प्रत्येक बाब वेळोवेळी तपासून त्यानुसार कार्यवाही करावी व जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेवावा. लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये, यासाठी टोकन सिस्टीम राबविण्यात यावी. जेणेकरून गर्दी टळेल व नागरिकांचाही वेळ वाचेल, असे त्या म्हणाल्या.