शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

आता महाविद्यालय स्तरावर होणार दीक्षांत समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 22:41 IST

विद्यापीठ स्तरावर होणारा दीक्षांत समारंभ आता महाविद्यालय स्तरावर घेण्यात येईल, असा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतला आहे.

ठळक मुद्देअमरावती विद्यापीठाचा निर्णय : येत्या शैक्षणिक सत्रापासून अंमलबजावणी

आॅनलाईन लोकमतअमरावती : विद्यापीठ स्तरावर होणारा दीक्षांत समारंभ आता महाविद्यालय स्तरावर घेण्यात येईल, असा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक सत्रापासून होईल, अशी माहिती आहे.विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात आचार्य पदवी, गुणवत्ता यादीत स्थान पटकवणारे तसेच पारितोषिक विजेते अशा मोजक्याच विद्यार्थ्यांचा गौरव होतो. उर्वरित पदवीधरांना जागेवर उभे राहून पदवी मिळाल्याची घोषणा केली जाते. त्यानंतर एका रांगेत लिपिक दर्जाच्या कर्मचाºयांकडून पदवी दिली जाते. यामुळे प्रत्येक पदवीधराचा सन्मान व्हावा, यासाठी महाविद्यालय स्तरावर पदविदान समारंभाचे आयोजन करण्याचा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी घेतला आहे. त्यामुळे समारंभात येणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा प्रवास खर्च, गैरसोय तसेच पदवीसाठी लागणारा खर्च थांबेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या निर्णयास २१ आॅगस्ट २०१५ रोजी तत्त्वत: मान्यता प्रदान करण्यात आली आहे.दरम्यान, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पदवी समारंभ यंदा २३ फेब्रुवारी रोजी होत आहे. अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना विद्यापीठात पदवी प्रदान केली जाणार आहे. विद्यापीठ स्तरावर दरवर्षी होणाºया दीक्षांत समारंभात २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च येतो. दीक्षांत समारंभासाठी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरु राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक जयंत वडते आदी चमू जोमाने कार्यरत आहे.समारंभाचा खर्च विद्यापीठ देणारयेत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयस्तरावर होणाºया पदविदान समारंभाचा खर्च विद्यापीठाकडून विद्यार्थीनिहाय मिळेल. समारंभाचे स्वरूप, आयोजन, पाहुणे आदी बाबी प्राचार्यांना ठरवाव्या लागतील.लीड कॉलेजवर जबाबदारीची शक्यतामहाविद्यालय स्तरावर दीक्षांत समारंभ घेण्याबाबत एकमत झाले आहे. मात्र, जिल्ह्याच्या ठिकाणी लीड कॉलेजमध्ये समारंभाच्या आयोजनबाबतही मंथन सुरू आहे.महाविद्यालय स्तरावर पदविदान समारंभ आयोजनाबाबत नियमावली तयार करण्याची प्रक्रिया युद्धस्तरावर सुरू आहे. ८ ते १० दिवसांत नियमावली तयार होताच, त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल. विद्यार्थ्यांचा अभिमान जोपासण्यासाठी हे पाऊल उचलले.- राजेश जयपूरकर,प्र-कुलगुरू, संत गाडगेबाबा विद्यापीठ