शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

फळे, भाजीपाला विक्रीवर ‘डीडीआर’चे नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 00:53 IST

शेतकऱ्यांना त्यांनी पिकविलेली फळे व भाजीपाला बाजार समितीच्या बाहेर विकण्यास आता मुभा राहणार आहे.

संभ्रम कायम : शेतकऱ्यांना बाजार समितीबाहेर मालविक्रीस मुभा अमरावती : शेतकऱ्यांना त्यांनी पिकविलेली फळे व भाजीपाला बाजार समितीच्या बाहेर विकण्यास आता मुभा राहणार आहे. परंतु हा व्यवसाय जिल्हा उपनिबंधक व सहायक निबंधकांच्या नियंत्रणाखाली राहील. कायद्यामधील बदलाचा प्रस्ताव शासनाने राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याने बाजार समितीबाहेरील शेतकऱ्यांची मालविक्री १०० टक्के नियंत्रणमुक्त नाही, हे स्पष्ट झाले आहे. अशा व्यवहारात व्यापाऱ्याकडून फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांनी दाद कुणाकडे मागायची, हा प्रश्न निर्माण झाला. यासाठी काही तरी नियमन असावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केल्यामुळे याची दखल शासनाने घेतली आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र कृषी उत्पन्न व पणन् अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे बाजार समितीचा अडसर दूर होऊन शेतकऱ्यांची फळे व भाजीपाला ग्राहकांच्या दारात विक्रीची मुभा मिळाली आहे. आतापर्यंत या व्यवहारावर बाजार समित्यांचे नियंत्रण होते. मात्र, बाजार समितीमध्ये गैरव्यवहार व शेतकऱ्यांची कोंडी होत असल्याने बाजारसमितीच्या कचाट्यामधून शेतकऱ्यांना मोकळे करावे, अशी मागणी होत असल्याने शासनाने बाजार समितीचे नियंत्रण सैल केले. त्यानुसार शेतकरी वाटेल तेथे माल विकू लागला. मात्र, त्यावर कुणाचेही नियंत्रण न राहिल्यास त्याची दलालाकडून फसवणूक होण्याची भीती व्यक्त झाली. अडतचे ८ ते १० टक्के वाचणार अमरावती : त्यामुळे शासनाने कायद्यात बदल करताना बाजार समितीच्या बाहेरील शेतमाल विक्रीवर जिल्हा उपनिबंधक व सहायक निबंधकांचे नियंत्रण राहील, अशी तरतूद केली आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर शेतमाल विकता येणार आहे. त्यामुळे अडत, दलाल, हमाल, तोलारी यासाठीची १० टक्क्यांपर्यंतची रक्कम वाचणार आहे. मध्यस्थांची साखळी नसल्याने ग्राहकांना शेतमाल योग्य भावाने मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने कायद्यातील बदलास मंजुरी दिली आहे. त्यानुसार संबंधित घटकांची मते जाणून घेऊन हा अध्यादेश राज्यपालांकडे पाठविला आहे. - चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री