शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

फळे, भाजीपाला विक्रीवर ‘डीडीआर’चे नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 00:53 IST

शेतकऱ्यांना त्यांनी पिकविलेली फळे व भाजीपाला बाजार समितीच्या बाहेर विकण्यास आता मुभा राहणार आहे.

संभ्रम कायम : शेतकऱ्यांना बाजार समितीबाहेर मालविक्रीस मुभा अमरावती : शेतकऱ्यांना त्यांनी पिकविलेली फळे व भाजीपाला बाजार समितीच्या बाहेर विकण्यास आता मुभा राहणार आहे. परंतु हा व्यवसाय जिल्हा उपनिबंधक व सहायक निबंधकांच्या नियंत्रणाखाली राहील. कायद्यामधील बदलाचा प्रस्ताव शासनाने राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याने बाजार समितीबाहेरील शेतकऱ्यांची मालविक्री १०० टक्के नियंत्रणमुक्त नाही, हे स्पष्ट झाले आहे. अशा व्यवहारात व्यापाऱ्याकडून फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांनी दाद कुणाकडे मागायची, हा प्रश्न निर्माण झाला. यासाठी काही तरी नियमन असावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केल्यामुळे याची दखल शासनाने घेतली आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र कृषी उत्पन्न व पणन् अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे बाजार समितीचा अडसर दूर होऊन शेतकऱ्यांची फळे व भाजीपाला ग्राहकांच्या दारात विक्रीची मुभा मिळाली आहे. आतापर्यंत या व्यवहारावर बाजार समित्यांचे नियंत्रण होते. मात्र, बाजार समितीमध्ये गैरव्यवहार व शेतकऱ्यांची कोंडी होत असल्याने बाजारसमितीच्या कचाट्यामधून शेतकऱ्यांना मोकळे करावे, अशी मागणी होत असल्याने शासनाने बाजार समितीचे नियंत्रण सैल केले. त्यानुसार शेतकरी वाटेल तेथे माल विकू लागला. मात्र, त्यावर कुणाचेही नियंत्रण न राहिल्यास त्याची दलालाकडून फसवणूक होण्याची भीती व्यक्त झाली. अडतचे ८ ते १० टक्के वाचणार अमरावती : त्यामुळे शासनाने कायद्यात बदल करताना बाजार समितीच्या बाहेरील शेतमाल विक्रीवर जिल्हा उपनिबंधक व सहायक निबंधकांचे नियंत्रण राहील, अशी तरतूद केली आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर शेतमाल विकता येणार आहे. त्यामुळे अडत, दलाल, हमाल, तोलारी यासाठीची १० टक्क्यांपर्यंतची रक्कम वाचणार आहे. मध्यस्थांची साखळी नसल्याने ग्राहकांना शेतमाल योग्य भावाने मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने कायद्यातील बदलास मंजुरी दिली आहे. त्यानुसार संबंधित घटकांची मते जाणून घेऊन हा अध्यादेश राज्यपालांकडे पाठविला आहे. - चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री