शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

तर कंत्राटदारास दरदिवशी दोन हजार रूपये दंड

By admin | Updated: August 30, 2015 00:11 IST

जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत नांदगाव खंडेश्वर येथे सुरू असलेली विकासकामे विहित मुदतीत आणि मुदतवाढ दिल्यानंतरही पूर्ण झाली नसल्याने ...

जिल्हा परिषद : बांधकाम समितीचा निर्णयअमरावती : जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत नांदगाव खंडेश्वर येथे सुरू असलेली विकासकामे विहित मुदतीत आणि मुदतवाढ दिल्यानंतरही पूर्ण झाली नसल्याने जिल्हा परिषद बांधकाम समितीने संबंधित कंत्राटदाराला दरदिवशी दोन हजार रूपयांप्रमाणे दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी वित्त विभागाला प्रस्ताव दिल्यानंतरही यावर कुठलीही अंमलबजावणी केली नसल्याने आता पुन्हा बांधकाम समितीने दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.तीर्थक्षेत्र विकास आराखडयामार्फत सुमारे ३ कोटी रूपयांच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी ‘ग्रीनअर्थ’ या कंपनीला काम पूर्ण करण्यासाठी १८ आॅगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत संपूनही रस्त्याचे अर्र्धेच काम झाले आहे. उर्वरित काम सुरू असले तरी कामाची गती मंद असल्याने कंत्राटदाराला कळविण्यात आले. त्यानंतरही यात सुधारणा झाली नाही. जिल्हा परिषद बांधकाम विषय समितीने शुक्रवारी पार पडलेल्या सभेत या कंत्राटदाराला १८ आॅगस्टपासून दर दिवशी दोन हजार रूपयांप्रमाणे दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील कारवाई करण्याचे निर्देश बांधकाम सभापती गिरीश कराळे यांनी मुख्यलेखा वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे यांना दिले आहेत. या बैठकीला सभापती गिरीश कराळ, विक्रम ठाकरे, विनोद डांगे, प्रवीण घुईखेडकर, निशांत जाधव, मोहन सिंगवी, ममता भांबुरकर, प्रेमा खलोकार, पी.जी.भागवत, उपअभियंता गावंडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)