शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या अवहेलनांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ

By admin | Updated: September 12, 2015 00:20 IST

महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे महिलांना सुरक्षितता मिळावी, ...

चांदूरबाजार : महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे महिलांना सुरक्षितता मिळावी, यासाठी केंद्र व राज्य सरकार नवनव्या उपाययोजना राबवीत आहे. मात्र या सर्व योजना कागदावर धूळ खात असल्याचे चित्र आहे. शासकीय, निमशासकीय कार्यरत महिलांची अवहेलना होत असल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महिला तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. असे असतानाही तालुक्यात ती कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. यामुळे न्यायालयाचा अवमान होत असल्याची बाब महिलांमधील चर्चेतून व्यक्त होत आहे.तालुक्यातील व शहरातील महत्त्वाचे ठिकाण समजले जाणारे शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये महिला निवारण समित्या कागदपत्रीच स्थापन झाल्या आहेत. ज्याठिकाणी या समित्या आहेत तिथे तक्रारीच नाहीत. त्यामुळे बदनामी होण्याच्या भीतीपोटी त्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहोचवीत नाहीत. कार्यालयातील महिलांच्या शोषणाचे प्रकार मात्र अधिकाऱ्यांच्या दबावामुळे दडपल्या जातात. शासकीय-निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सदस्यांची तपासणी करण्यासाठी सरकारने नियुक्त केलेल्या समित्यांच्या शिफारशीची अंमलबजावणी व त्याअनुषंगाने सर्व कार्यालये व संस्थांमध्ये महिला तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याचे आदेश आहेत. त्यात सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना समित्या स्थापन करायच्या आहेत.या समित्या काही ठिकाणी गठित करण्यात आल्या नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे राज्य शासनाच्या विविध कार्यालयांकडून सर्रास अवमान होत असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान सर्व शासकीय कार्यालये, महाविद्यालये, शाळा, सर्व शासकीय व निमशासकीय रुग्णालये, सार्वजनिक उपक्रमांसह सर्व राज्य सरकारी-निमसरकारी कार्यालय तथा संस्थांमध्ये तातडीने महिला तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र बहुतांश ठिकाणी समित्यांचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)