शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

सतत दरवाढ, भंगार गाड्या, वाढते अपघात

By admin | Updated: June 1, 2015 00:42 IST

राज्य शासनाकडून विविध सवलतीपोटी येणे असलेली हजार कोटींची रक्कम, १७.५ टक्के प्रवासी कर, पथकरात दरवर्षी गेलेले....

वर्धापन दिन ‘एसटी’चा : तोट्यातून बाहेर काढण्यासाठी व्हावेत प्रयत्न सुरेश सवळे चांदूरबाजारराज्य शासनाकडून विविध सवलतीपोटी येणे असलेली हजार कोटींची रक्कम, १७.५ टक्के प्रवासी कर, पथकरात दरवर्षी गेलेले १५० कोटी रुपये, शासनकर आणि वाहनकर आदींच्या बोझ्याखाली पिचलेल्या एसटीचा वर्धापन दिन सोमवारी जंगी स्वरुपात साजरा करण्याचे डोहाळे परिवहन मंडळाला लागले आहेत. वर्धापन दिनानिमित्त वर्षातून एक दिवस प्रत्येक प्रवाशाला गुलाबपुष्प देण्याऐवजी त्यांच्या सुखसोयींकडे महामंडळाने लक्ष पुरवावे, असा सूर उमटत आहे. १ जून १९४८ ला अहमदनगर ते पुणे दरम्यान राज्य परिवहन मंडळाची पहिली बस धावली होती. त्यामुळे हा दिवस वर्धापन दिन (परिवहन दिन) म्हणून एसटी महामंडळाद्वारे दरवर्षी साजरा केला जातो. यंदा महामंडळ ६७ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. एकीकडे थकबाकी आणि विविध करांमुळे वाढत चाललेल्या संचित तोट्यात डिझेलच्या वाढत्या दरांमुळे वारंवार होणारी भाडेवाढ प्रवाशांसाठी जीवघेणी ठरते आहे. इतकेच नव्हे तर राज्यात १६ हजार ६४८ बसगाड्यांमधून दररोज ७० लाख प्रवाशांची वाहतूक आगारासह बसस्थानक असलेल्या २५७ ठिकाणावरुन केली जात आहे. अनेक गाड्या भंगार झाल्या आहेत. कित्येक गंभीर अपघात घडले आहेत. अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. भंगार गाड्यांची समस्या आ वासून उभी आहे. असे असताना वर्धापन दिन साजरा करून प्रवाशांना एक दिवस ‘फूल’ देऊन वर्षभर ‘फूल’ बनविणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.