शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
3
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
4
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
5
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
6
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
7
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
8
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
9
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
10
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
11
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
12
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
13
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
14
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
15
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
16
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
17
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
18
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
19
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
20
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा

शासनादेशाचा हा तर अवमानच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 22:30 IST

मागील वर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बाजार समित्यांमध्ये बेभाव विकल्या गेलेल्या सोयाबीनसाठी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने १० जानेवारी २०१७ ला घेतला होता.

ठळक मुद्दे‘डेडलाईन’ संपली : ३८ हजार शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील वर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बाजार समित्यांमध्ये बेभाव विकल्या गेलेल्या सोयाबीनसाठी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने १० जानेवारी २०१७ ला घेतला होता. हे अनुदान २६ आॅक्टोबरला उपलब्ध करून कुठल्याही परिस्थितीत ३१ आॅक्टोबरपूर्वी शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले गेले. वाटपाची ‘डेडलाइन’ संपली असताना जिल्हास्तरावर निधीच उपलब्ध झालेला नाही. हा तर शासनादेशाचाच अवमान असल्याचा सूर उमटत आहे.गेल्या हंगामात बाजार समित्यांमध्ये ३८ हजार ७९१ शेतकºयांचे ६ लाख ८ हजार २८८ क्विंटल सोयाबीन हमीपेक्षा किती तरी कमी भावाने विकले गेले. यासाठी आवश्यक असणारे १२ कोटी १६ लाख ५७ हजार ५२० रुपयांचे प्रस्ताव पणन आयुक्तस्तरावर मंजूर आहेत. मात्र, वर्षभरापासून शासनाने अनुदान उपलब्ध केले नव्हते. आकस्मिक निधीतून अनुदान उपलब्ध करण्याचा शासनादेश सहकार व पणन विभागाने २६ आॅक्टोबरला काढला.१ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत बाजार समितीमध्ये विक्री करण्यात आलेल्या सोयाबीनला २५ क्विंटल मर्यादेत प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान शासन देणार आहे. यासाठी४५ हजार ४७ प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयांना सादर झाले होते. या प्रस्तावांची तालुका व जिल्हास्तरीय समितीने पडताळणी केलेली आहे. शासनादेश असताना निधीच उपलब्ध न केल्याने शेतकºयांची भलावण केल्याचा आरोप होत आहे.गतवर्षीच्या खरिपात सोयाबीनचे पेरणीक्षेत्र तीन लाख हेक्टर होते तसेच सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे उत्पादकता वाढली. मात्र, हंगामात बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली तसा व्यापाºयांनी भाव पाडला. अगदी दोन हजार रुपयांनी खरेदी केल्यामुळे उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. त्यामुळे शासनाने आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बाजार समित्यांमध्ये विक्री झालेल्या सोयाबीनला अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, १० महिन्यानंतरही निधी उपलब्ध झालेला नाही.