शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

धारणीत कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:13 IST

धारणी : नगरपंचायतीत पाण्याचे भरपूर स्त्रोत उपलब्ध असून, जवळपास सर्व प्रभागांत एक दिवसाआड पाणीपुरवठा नियमितपणे केला जात असताना ...

धारणी : नगरपंचायतीत पाण्याचे भरपूर स्त्रोत उपलब्ध असून, जवळपास सर्व प्रभागांत एक दिवसाआड पाणीपुरवठा नियमितपणे केला जात असताना आता मात्र त्याला फाटा देण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार, शहरातील अनेक प्रभागांमध्ये जाणूनबुजून तीन ते चार दिवस पाणीपुरवठा केला जात नाही. जनतेला होणारा त्रास दूर करण्यासाठी आम्ही किती प्रयत्नशील आहोत, हे भासविण्यासाठी इच्छुक व माजी नगरसेवकांकडून टँकरद्वारे पाणी वितरित होत असल्याचा भास निर्माण केला जात आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळीत झाली असून, विनाकारण नागरिकांना टँकरमधून पाणी घेण्याची वेळ आलेली आहे.

वास्तविक पाहता शहरातील पाणीपुरवठा योजना व्यवस्थित असून कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. मात्र, नगरपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागल्यामुळे पाण्यालासुद्धा आता मुद्दा बनविण्यात येत असून त्यामागे कटकारस्थान सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. नगरपंचायतीचे प्रशासक तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी लक्ष द्यावे, अशी धारणीकरांची अपेक्षा आहे.