शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट पूर्वनियोजित : ॲड. यशोमती ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 05:00 IST

त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेचे चुकीचे वर्णन करून तेढ निर्माण करणाऱ्या या पोस्ट ताबडतोब काढून टाकाव्यात, अशा सूचना सायबर विभागाने दिल्या आहेत. या सर्व प्रकारांमध्ये जनतेच्या धार्मिक भावना भडकवून महाराष्ट्रात असंतोष निर्माण करुन अस्थिरता निर्माण करावी आणि त्याचा फायदा मतांचे ध्रुवीकरणसाठी करावा, यासाठी हा सर्व पूर्वनियोजित कट होता, असा दावा पालकमंत्री ठाकूर यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात १२ आणि १३ नोव्हेंबरला झालेली दंगल आणि हिंसाचाराच्या घटना या पूर्वनियोजित होत्या, असा दावा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. हिंसाचाराच्या घटनांसंबंधी भाजपा नेत्यांनी पोलिसांसमोर समर्पण केल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. अमरावतीमध्ये गेल्या शुक्रवारी आणि शनिवारी घडलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता, अशा पद्धतीची माहिती आणि अहवाल नोडल एजन्सी असलेल्या सायबर विभागाने दिला आहे. या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय विखारी पोस्ट आणि प्रचार दोन्ही बाजूंच्या कट्टरवादी विचारांच्या लोकांमार्फत करण्यात आला, असे सायबर विभागाच्या अहवालावरून  दिसून येते. कारण यामुळे ध्रुवीकरण होऊन त्याचा फायदा कोणाला होईल, हे स्पष्टच आहे, अशी पुस्तीही ठाकूर यांनी जोडली. दरम्यान सायबर विभागाने दिलेल्या अहवालानुसार १२ व १३ नोव्हेंबरला #AmravatiVoilence हा हॅशटॅग वापरून अवघ्या काही मिनिटांतच चार हजार ट्विट्स तसेच पोस्ट करण्यात आले तसेच ट्विटर, फेसबूक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून केलेल्या पोस्ट या अत्यंत भडक आणि भावना भडकवणाऱ्या होत्या, तर त्यासोबत जोडण्यात आलेल्या चित्रफिती या चुकीची माहिती देऊन विशिष्ट समाजाच्या भावना भडकवणाऱ्या होत्या. त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेचे चुकीचे वर्णन करून तेढ निर्माण करणाऱ्या या पोस्ट ताबडतोब काढून टाकाव्यात, अशा सूचना सायबर विभागाने दिल्या आहेत. या सर्व प्रकारांमध्ये जनतेच्या धार्मिक भावना भडकवून महाराष्ट्रात असंतोष निर्माण करुन अस्थिरता निर्माण करावी आणि त्याचा फायदा मतांचे ध्रुवीकरणसाठी करावा, यासाठी हा सर्व पूर्वनियोजित कट होता, असा दावा पालकमंत्री ठाकूर यांनी केला आहे.घडलेल्या हिंसाचारामागे दोन्ही बाजुंच्या कट्टरवादी गटांचा एकत्रितरीत्या समावेश होता तसेच या माध्यमातून नेमका कुणाला फायदा होणार, हे जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे, असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता सामाजिक एकोपा व शांतता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर